APMC Market : कलिंगड खाल्ल्याने मृत्यूच्या घटनेचा फटका; वाशी APMC मध्ये कलिंगड विक्री ठप्प! व्यापारी आणि शेतकरी चिंतेत

नवी मुंबई : मुंबईतील पायधुनी परिसरात कलिंगड खाल्ल्यानंतर एकाच कुटुंबातील चार जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेनंतर नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून, त्याचे गंभीर पडसाद आता नवी मुंबईतील वाशी येथील APMC (कृषी उत्पन्न बाजार समिती) घाऊक फळ बाजारात उमटताना दिसत आहेत. बाजारात कलिंगडाची आवक होऊनही ग्राहकांकडून मागणी नसल्याने विक्री जवळपास ठप्प झाली आहे.



विक्रीवर झालेला परिणाम


वाशीच्या घाऊक बाजारपेठेत आज साधारणपणे ३,३२५ क्विंटल कलिंगडाची आवक झाली आहे. मात्र, पायधुनी येथील घटनेमुळे ग्राहकांनी कलिंगड खरेदीकडे पाठ फिरवली आहे. फळांच्या मागणीत मोठी घट झाल्याने व्यापाऱ्यांची चिंता वाढली आहे. कलिंगडाचा दर १२ ते १८ रुपये किलो इतका कमी असूनही त्याला अपेक्षित उठाव मिळत नसल्याचे चित्र बाजारात पाहायला मिळत आहे.



व्यापाऱ्यांची मागणी


या घटनेमुळे कलिंगड व्यावसायिकांवर संक्रांत आली असून, अनेक दिवसांचा माल पडून राहिल्याने मोठ्या आर्थिक नुकसानीची भीती व्यक्त केली जात आहे. यासंदर्भात बोलताना एका फळ व्यापाऱ्याने सांगितले की, पायधुनी येथील घटनेनंतर बाजारात भीतीचे वातावरण आहे. लोक कलिंगड खरेदी करायला धजत नाहीत. ही परिस्थिती पाहता शासनाने या प्रकरणाचा सखोल तपास करून लवकरात लवकर स्पष्ट अहवाल जाहीर करावा. जेणेकरून ग्राहकांच्या मनातील भीती दूर होईल आणि बाजार पुन्हा पूर्वपदावर येईल. सध्या ग्राहक कलिंगड खाणे टाळत असल्याने याचा थेट फटका शेतकरी आणि व्यापाऱ्यांना बसत आहे. प्रशासन यावर काय भूमिका घेते आणि ग्राहकांचा विश्वास पुन्हा कसा मिळवला जातो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Comments
Add Comment

SIR in Mumbai : 'मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षणाच्या प्रक्रियेत राजकीय पक्षांचे सहकार्य आवश्यक'

मुंबई : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशांनुसार, मतदार याद्यांचे विशेष सखोल पुनरीक्षण (स्पेशल इंटेन्सिव्ह

Illegal Water Connections : बांधकामांच्या ठिकाणच्या १०७ जलजोडण्यावर पालिकेची कारवाई

४१८ अनधिकृत जलजोडण्या खंडित, १०२ बुस्टर जप्त मुंबई : पावसाळा लांबणीवर पडल्याने मुंबईत १५ मे २०२६ पासून १० टक्के

Ghatkopar : घाटकोपर परिसरातील पदपथांवरील ४ अनधिकृत दुकाने आणि ३ वाचनालयांवर कारवाई

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : घाटकोपर परिसरातील संत ज्ञानेश्वर मार्ग, पंतनगर येथील पदपथांवर अडथळा निर्माण करणाऱ्या ४

Pune Traffic Update : पुणे पालखी सोहळ्यादरम्यान वाहतुकीत बदल, जिल्हाधिकाऱ्यांकडून पर्यायी मार्गांची घोषणा

पुणे : श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे ८ जुलै २०२६ रोजी श्रीक्षेत्र आळंदी येथून प्रस्थान होणार आहे. या

Ford Employees : नारळ दिलेल्या कर्मचाऱ्यांनाच पुन्हा बोलावण्याची फोर्डवर वेळ, एआयचा प्रयोग ठरला अपुरा

नवी दिल्ली : विविध उद्योगांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय)चा वापर झपाट्याने वाढत असून अनेक कंपन्या

India in Venezuela : व्हेनेझुएलामधील भारताची मदत मोहीम अधिक तीव्र; चोवीस तास मोफत वैद्यकीय सेवा सुरू

व्हेनेझुएला : ऑपरेशन ‘अमिस्ताद’ (Amistad)अंतर्गत भूकंपग्रस्त व्हेनेझुएलामध्ये तैनात भारतीय लष्कराचे फील्ड