मोठी बातमी: विधान परिषदेची निवडणूक बिनविरोध होणार, महत्त्वाचे कारण समोर

Maharashtra Vidhan Parishad Election : महाराष्ट्रात विधान परिषद निवडणुकीचे वारे जोरदार रंगात असताना मोठी बातमी समोर आली आहे. महाराष्ट्रात होत असलेली विधान परिषदेची निवडणूक बिनविरोध होणार असल्याचे जवळपास आता निश्चित झाले आहे. भारत निवडणूक आयोगाकडून महाराष्ट्रातील विधान परिषद निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला. महाराष्ट्र विधान परिषदेच्या 9 जागांसाठी नियमित निवडणूक तर एका जागेची पोटनिवडणूक पार पडणार आहे. विधान परिषदेच्या 10 जागांसाठी 12 मे रोजी मतदान होणार आहे. 12 मे रोजी सकाळी 9 वाजल्यापासून दुपारी 4 वाजेपर्यंत मतदान होईल. तर 12 मे रोजीच निकाल जाहीर होणार आहे.


मविआचं सूत्र जुळलं , काँग्रेसचा अंबादास दानवेंना पाठिंबा


उद्धव ठाकरेंनी अंबादास दानवेंना उमेदवारी दिल्यामुळे काँग्रेसकडून नाराजी व्यक्त करण्यात आली होती. काँग्रेसने उमेदवार देण्याबाबत चर्चा सुरू केली होती. पण ठाकरेंच्या शिष्टमंडळाने काँग्रेस नेत्यांची भेट घेत समजूत काढली. अखेर काँग्रेसकडून विधान परिषद निवडणूक न लढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे आणि ठाकरेसेनेचे अनिल देसाई यांची संयुक्त पत्रकार परिषद झाली. यामध्ये हर्षवर्धन सपकाळ यांनी ठाकरेंनी दिलेल्या उमेदवाराला पाठिंबा असल्याचे जाहीर केले.


महत्त्वाचे कारण समोर


विधान परिषदेच्या 10 जागांसाठीची निवडणूक बिनविरोध होणार असल्याचं निश्चित झालं आहे. कुठल्याही पक्षाने अकरावा उमेदवार न दिल्याने विधान परिषदेची निवडणूक बिनविरोध होणार आहे. तीन अपक्ष उमेदवारांनी अर्ज दाखल केला असला तरी त्यांना 10 आमदारांची सूचक म्हणून सही नसल्याने या संबंधित अपक्ष उमेदवारांचे अर्ज बाद ठरवले जातील. भाजपकडून 6, शिवसेनेकडून 2, राष्ट्रवादी काँग्रेसकडून 1 आणि मविआकडून 1 उमेदवारांचा अर्ज दाखल झाला आहे.


भाजपकडून विधान परिषदेसाठी कुणाला संधी


प्रमोद जठार
सुनील कर्जतकर
माधवी नाईक
संजय भेंडे
विवेक कोल्हे
प्रज्ञा सातव


शिवसेना ठाकरे गटाकडून विधान परिषदेसाठी कुणाला संधी


महाविकास आघाडी-
अंबादास दानवे (उद्धव बाळासाहेब ठाकरे)


शिवसेना शिंदे गटाकडून विधान परिषदेसाठी कुणाला संधी


बच्चू कडू
नीलम गोऱ्हे


राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून विधान परिषदेसाठी कुणाला संधी


झिशान सिद्दीकी



विधान परिषदेतील या 9 आमदारांचा कार्यकाळ संपणार


उद्धव ठाकरे (शिवसेना - उबाठा)
नीलम गोऱ्हे (शिवसेना)
अमोल मिटकरी (राष्ट्रवादी - अजित पवार गट)
शशिकांत शिंदे (राष्ट्रवादी - शरद पवार गट)
गोपीचंद पडळकर (भाजप)
रणजितसिंह मोहिते-पाटील (भाजप)
राजेश राठोड (काँग्रेस)
रमेश कराड (भाजप)
प्रवीण दटके (भाजप)

Comments
Add Comment

Watercut In Mumbai : अमर महल ते वडाळा, परळ तसेच ट्रॉम्बे आणि तुर्भेपर्यंतचा जलबोगदा होणार सुरु

येत्या ५ ते ६ मे रोजी ३० तासांची जोडणी कामांसाठी पाणीकपात मुंबई : अमर महल ते वडाळा, परळ तसेच ट्रॉम्बे व तुर्भे

1 May Maharashtra Day : १ मे : दादर-शिवाजी पार्क परिसराच्या वाहतुकीत मोठे बदल; घराबाहेर पडण्यापूर्वी वाचा पर्यायी मार्ग!

मुंबई : उद्या, शुक्रवार १ मे रोजी 'महाराष्ट्र दिनानिमित्त' दादरच्या ऐतिहासिक शिवाजी पार्क मैदानावर राज्य

Bacchu Kadu, Nilam Gorhe : अखेर विधानपरिषद निवडणुकीसाठी उमेदवार झाले जाहीर; शिवसेनेच्या या नेत्यांना मिळणार उमेदवारी

मुंबई : महाराष्ट्रात विधानपरिषद निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली आहे. अशातच या निवडणुकीसाठी बच्चू कडू यांचा पक्ष

BMC News : विरोधकांचा होता निर्धार पक्का, सत्ताधाऱ्यांना बसला धक्का

-वडाळ्यातील गृहनिर्माण संस्थेच्या प्रस्तावाला प्राधान्याने मंजुरी विरोधकांनी हाणून पाडली मुंबई (विशेष

BMC News : मुंबई महापालिकेचे १६५ सहायक अभियंते बनले कार्यकारी अभियंता, सभागृहात प्रस्तावाला मंजुरी

मुंबई (सचिन धानजी) मुंबई महापालिकेतील कार्यकारी अभियंता पदाची अनेक पदे रिक्त असू स्थापत्य शहर समितीच्या बैठकीत

Patra Chawl Residents : पत्रा चाळ रहिवाशांना म्हाडाकडून १० टक्के भाडेवाढ देण्याचा निर्णय

मुंबई : गोरेगावमधील पत्रा चाळ रहिवाशांच्या विविध प्रश्नांबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरवार ३०