Desalinate Seawater : समुद्राचे खारे पाणी गोडे करण्याच्या प्रकल्पाला केंद्रीय मंत्रालयाची मंजुरी

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबईची वाढती तहान भागविण्यासाठी मुंबई महापालिकेच्या खाऱ्या पाण्याचे रासायनिक प्रक्रिया करून गोड्या पाण्यात रूपांतर करण्याच्या प्रकल्पाला केंद्रीय मंत्रालयाने मंजुरी दिली आहे. मुंबई महापालिका सभागृहात सभागृहनेते गणेश खणकर यांनी निवेदन करीत, केंद्रीय मंत्रालयाने मंजुरी दिल्याबाबतची घोषणा केली. यावेळी दोन्ही बाजूच्या नगरसेवकांनी बाके वाजवून याचे स्वागत केले..


मुंबईची वाढती लोकसंख्या आणि दररोज होणारा अपुरा पाणीपुरवठा आणि पाण्याची मागणी यातील तफावत दूर करण्यासाठी आणि मुंबईकरांची पाण्याची गरज भागविण्यासाठी सत्ताधारी भाजप - शिवसेना महायुतीने साडेपाच हजार कोटी रुपये खर्चाच्या गारगाई धरण प्रकल्पाला मंजुरी दिली. तर, या धरण प्रकल्पात लाखो झाडांची कत्तल होणार असून खर्चिक प्रकल्प असल्याने आणि पर्यावरण धोक्यात येणार असल्याचे कारण उबाठाने गारगाई धरण प्रकल्पाला विरोध करीत कमी खर्च असलेल्या समुद्राचे खारे पाणी गोडे करण्याच्या प्रकल्पाला मंजुरी देण्याची मागणी लावून धरली होती.


समुद्राचे खारे पाणी प्रक्रिया करून गोडे करण्याच्या प्रकल्पाला केंद्र सरकारच्या पर्यावरण, वन आणि जलवायू परिवर्तन मंत्रालय विभागाने मंजुरी दिली आहे. सागरी किनारा क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरणाची मंजुरी मिळाल्यानंतर अवघ्या २० दिवसांत याबाबात मंजुरी मिळाल्यामुळे आता हा प्रकल्प मार्गी लागण्यास मदत होणार आहे. हा प्रकल्प डिसेंबर २०२९ पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.


पश्चिम उपनगरातील मनोरी येथे समुद्राचे खारे पाणी २०० दशलक्ष लिटर इतके प्रक्रिया करून शुद्ध करून ते पिण्यायोग्य बनविण्यात येणार आहे. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात आणखी २०० दशलक्ष लिटर इतके समुद्राचे खारे पाणी प्रक्रिया करून शुद्ध करण्यात येणार असून त्यामुळे मुंबईसाठी जवळजवळ ४०० दशलक्ष लिटर पाणी समुद्राच्या पाण्यापासून उपलब्ध करण्यात येणार आहे. अर्थात त्यासाठी चार वर्षांचा. कालावधी लागणार आहे. मनोरी येथील प्रकल्पाचा बांधकाम खर्च ४ हजार कोटीवर जाणार असून देखभाल व प्रचालनासह आणि विजेचा खर्च पाहता एकूणच ९७३७ कोटी रुपयांपर्यंत खर्च अपेक्षित आहे.

Comments
Add Comment

Chakan-Talegaon Industrial Belt : चाकण-तळेगाव औद्योगिक पट्ट्याचा कायापालट होणार? खड्ड्यांसाठी प्री-कास्ट, जिओ पॉलिमर टेक्नो पॅचचा वापर

मुंबई : चाकण-तळेगाव औद्योगिक क्षेत्रातील उद्योग आणि स्थानिक नागरिकांच्या समस्यांवर तातडीने उपाययोजना

BJP Yuva Morcha : ‘वंदे मातरम्’च्या अवमानाच्या निषेधार्थ भाजयुमो मुंबईचे जोरदार आंदोलन

मुंबई : १५ ऑगस्ट रोजी झालेल्या ध्वजारोहण कार्यक्रमादरम्यान काँग्रेस नेत्या सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांनी

Maharashtra New Doctors Appointed : राज्यात १,४४० डॉक्टरांची लवकरच नियुक्ती - आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर

- आरोग्यमंत्र्यांनी साधला सहा लाखाहून अधिक नागरिकांची जनसंवाद मुंबई : राज्यात उपलब्ध झालेल्या १,४४० डॉक्टरांची

Prakash Abitkar : आरोग्य समित्यांच्या माध्यमातून जनतेच्या आरोग्य समस्या जाणून घेणार

मुंबई : राज्यातील आरोग्य व्यवस्था अधिक लोकाभिमुख, पारदर्शक आणि उत्तरदायी करण्यासाठी आरोग्य विभागाच्या विविध

Maharashtra Agriculture Department : महाराष्ट्राच्या कृषी विभागाची दमदार कामगिरी; केंद्र सरकारकडून राष्ट्रीय पुरस्काराने होणार सन्मान

- कृषीमंत्री दत्तात्रय भरणे स्वीकारणार पुरस्कार मुंबई : प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना (PMFME)

FDA Notice to SRK : ‘विमल इलायची’ जाहिरातीवर FDAचा दणका; अजय, शाहरुख आणि टायगरला नोटीस

मुंबई : बॉलिवूड अभिनेते अजय देवगण, शाहरुख खान आणि टायगर श्रॉफ यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. महाराष्ट्राचे