Santosh Deshmukh Massajog Sarpanch Election Result : बीड - मस्साजोगच्या निवडणुकीचा निकाल झाला जाहीर

बीड : संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या मस्साजोगच्या ग्रामपंचायत पोटनिवडणुकीचा निकाल आज अखेर जाहीर झाला, अत्यंत चुरशीच्या झालेल्या या लढतीत स्वरूपानंद देशमुख यांनी विजय मिळवला आहे.



मस्साजोगमध्ये कोणी मारली बाजी?


बीड जिल्ह्यासह संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या केज तालुक्यातील मस्साजोग सरपंचपदाच्या पोटनिवडणुकीचा निकाल आज जाहीर झाला. मस्साजोगमध्ये २ उमेदवार निवडणुकीच्या रींगणात उतरले होते. दोन्ही उमेदवारांनी निवडणुक जिंकण्यासाठी प्रयत्नानांची पराकाष्ठा केली. अखेर जनतेने निकाल दिला. नुकताच मस्साजोग सरपंच पदाचा पोटनिवडणुकीच्या निकाल जाहीर झाला त्यात स्वरूपानंद देशमुख हे ९२ मतांनी विजयी झाले आहेत.



बिनविरोध निवडणुकीची विनंती


सरपंच संतोष देशमुख यांची ९ डिसेंबर २०२४ रोजी निर्घृण हत्या करण्यात आली. या घटनेमुळे संपूर्ण गावात अण्णांच्या निधनामुळे पोकळी निर्माण झाली होती. गाव पोरकं झालं होत. त्यांनी केलेल्या विकासाचा आणि त्यांच्या स्वप्नांचा विचार करून ही निवणूक बिनविरोध व्हावी अशी विनंती देशमुख कुटुंबाकडून करण्यात आली होती, परंतु स्वरूपानंद देशमुख निवडणुकीच्या मैदानात उतरले.


२८ एप्रिल रोजा मतदान प्रक्रिया पार पडली होती, या निवडणुकीत गावकऱ्यांनी चांगला प्रतिसाद दिल्यामुळे गावात ८४ टक्के मतदान पार पडले. स्वरूपानंद देशमुख हे अखेर पर्यंत आपला अर्ज मागे घेण्यास तयार नव्हते. शेवटी ही निवडणुकी अतिशय अटीतटीची झाली असून या निवडणुकीत ९२ मतांनी बाजी मारली.


अश्विनी देशमुख यांना संतोष देशमुख यांच्या पश्चात सहानुभूतीच्या आधारे मत मिळतील असा अंदाज वर्तवला जात होता परंतु जनतेच्या मनात काहीतरी वेगळेच होते.



संतोष देशमुखांच्या न्यायासाठी लढणार


मी याआधी देखील संतोष देशमुख यांच्या न्यायाच्या लढाईत सामील होतो. इथून पुढे देखील मी संतोष देशमुख यांच्या न्यायासाठी लढणार अशी प्रतिक्रिया स्वरूपानंद देशमुख यांनी दिली आहे. माझ्यासाठी काम करणाऱ्या तरुण पोरांचा हा विजय आहे. हा स्वाभिमानी जनतेचं अविजय आहे, येत्या काळात गावातील काम कोण करू शकतो? हे जनतेने ओळखले अन् मला विजयी केले अशी प्रतिक्रिया स्वरूपानंद देशमुख यांनी विजयानंतर दिली.

Comments
Add Comment

BMC News : मुंबईत १७४ धोकादायक इमारती, ७२ इमारती केल्या रिक्त

रेल्वे लगतच्या इमारतींवरही विशेष लक्ष मुंबई : मुंबईत एकूण १७४ इमारती या अति धोकादायक जागा झाल्या असून त्यात १४१

BMC News : मुंबईतील १७४० किलोमीटर रस्त्यांचे सिमेंट काँक्रिटीकरण

मुंबईतील ७५ टक्क्यांपेक्षा अधिक झालेले रस्ते ३१ मेपर्यंत पूर्ण करणार मुंबई : मुंबई महापालिकेच्यावतीने सध्या

Water Cut In Mumbai : मुंबईत येत्या १५ मे पासून दहा टक्के पाणीकपात

महापालिका आयुक्त आश्विनी भिडे यांनी केले घोषणा अल निनोच्या प्रभावामुळे पाऊस लांबणीवर, महापालिकेचे १७

BMC News : मुंबईतील नालेसफाईचे काम सुमारे ३९ टक्के

यंदा मध्य रेल्वेच्या रुळांवर पाणी साचण्याचे प्रमाण होणार कमी दादर, माटुंगा रोड येथीलही तुंबई होणार कमी मुंबई

Ashwini Bhide : महापालिका आयुक्त आश्विनी भिडे सकाळीच पोहोचल्या रस्त्यावर स्वच्छतेच्या कामाचा घेतला आढावा

मुंबई : मुंबई महानगरपालिका आयुक्त आश्विनी भिडे यांनी मुंबई शहर विभागातील वडाळा आणि पूर्व उपनगरे विभागातील

Anant Ambani : हिप्पोंना मारु नका, वनतारामध्ये पाठवा; अनंत अंबानी यांची कोलंबिया सरकारला विनंती

मुंबई : उद्योगपती अनंत अंबानी यांचे प्राणीप्रेम पुन्हा एकदा समोर आले आहे. दक्षिण अमेरिकेतील कोलंबिया देशात