BMC News : 'मध्य वैतरणा प्रकल्प राबवताना तुमचे पर्यावरण प्रेम कुठे होते?'

मुंबई : मुंबई महापालिकेच्यावतीने गारगाई पाणी प्रकल्पाच्या कामाला गती देण्यासाठी स्थायी समिती व महापालिका सभागृहात मंजुरी देण्यात आली. परंतु ही मंजुरी देताना विरोधकांनी पर्यावरणाच्या नावाखाली याला विरोध करण्याचा प्रयत्न केला.पण सन २००९मध्ये मुंबई ३ अ या प्रकल्पांतर्गत मध्य वैतरणा पाणी प्रकल्प हा त्यांच्या सत्तेच्या काळात पूर्ण झाला. पण त्यावेळेला हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी १ लाख ८७ हजार झाडे कापली गेली. तेव्हा त्यांचे हे पर्यावरण प्रेम कुठे होते असा सवाल करत भाजप नगरसेवक नितेश सिंह यांनी विरोधकांचा समाचार घेतला.


मुंबई महापालिकेच्या सन २०२६-२७च्या अर्थसंकल्पावर भाषण करताना भाजपचे स्वीकृत नगरसेवक नितेश सिंह यांनी पाण्यावरून नगरसेवक चिंतेत आहे. कुणी म्हणतेय पाण्यावरून युध्द पेटेल तर मला तर आत्ताच पाण्यावरून भीती वाटायला लागली असे सांगत पाण्यावरून विरोध करणे हे योग्य नसून आपण मुंबईकरांना जेवढे पाणी देतो तेवढे कमी पडत आहे, मग मागणी आणि पुरवठ्यातील तुट कशी भरुन काढणार असा सवाल सिंह यांनी केला.


यावेळी त्यांनी कुर्ला विभागातील पाणी समस्येवर लक्ष केंद्रीत करताना आपल्या घरीही टँकरने पाणी करण्याची वेळ आल्याचे निदर्शनास आणून देण्याचा प्रयत्न केला. ही सर्व मेहरबानी टँकर माफियांनी असून मुंबईत ३० टक्के अनधिकृत जलजोडण्या आहेत.या अनधिकृत जलजोडण्या तोडल्यास तब्बल ७०० दशलक्ष लिटर पाणी वाचू शकेल.पण याला महापालिकेचे अधिकारी तयार नाहीत. जलअभियंता विभागाचे अधिकारी आपल्याच धुंदीत आहे. ते एसी कार्यालयात बसून करतो, बघतो, सांगतो, जेईला सांगतो, रात्री येणार पाणी अशीच कारणे देतात. त्यामुळे आता या टँकर माफियांची टोळी संपुष्टात आणण्यासाठी अनधिकृत जलजोडण्या तोडून टाकायला हव्यात, आणि जर या अनधिकृत जलजोडण्या तोडण्याची हिंमतच नाही तर अधिकृत तरी करू टाका, निदान त्या पाण्यापासूनचा महसूल महापालिकेच्या तिजोरीत जमा होईल.


यावेळी त्यांनी मुंबईतील विहिरींचे सर्वेक्षण करण्याची सूचना महापौरांना करून जेवढ्या विहिरी आहेत, त्यातील झोपडपट्टी भागांमध्ये असलेल्या विहिरी तपासून आपण त्यातील पाणी विकू शकतो हे पाहावे. या विहिरींच्या आसपास रासायनिक प्रक्रिया कारखाने, त्यांचे सांडपाणी येत नसेल तर त्या विहिरींमधील पाणी आर ओ प्लांट लावून त्याचा वापर पिण्यासाठी करण्यात यावा अशी मागणी नितेश सिंह यांनी केली.

Comments
Add Comment

संपूर्ण कोकणाला जलवाहतुकीने जोडणार

 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; येत्या ३ वर्षांत मुंबई-महानगरात २७ जेट्टी कार्यान्वित करणार मुंबई : "मुंबई महानगर

ओबीसी समाजाच्या विकासासाठी केंद्र-राज्य समन्वयातून योजनांची अंमलबजावणी करण्यात यावी

 ओबीसी समाजाचा विकास राज्याच्या सर्वांगीण प्रगतीचा पाया;ओबीसी सक्षमीकरणासाठी शासन कटिबद्ध मुंबई: ओबीसी

दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराला 'अ' वर्ग पर्यटन स्थळाचा दर्जान

मुंबई : पुण्यातील प्रसिद्ध दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराला 'अ' वर्ग पर्यटन स्थळाचा दर्जा देण्यात आला आहे. मंगळवारी,

नदीजोड प्रकल्पांची कामे कालमर्यादेत पूर्ण करा -ना.विखे पाटील

कोकण-गोदावरीसह चार महत्त्वाच्या योजनांचा घेतला आढावा मुंबई: राज्यातील महत्त्वाच्या नदीजोड प्रकल्पांची कामे

गेटवे परिसरातील डिझेल बोटी होणार इलेक्ट्रिक; हरित आणि इंधन बचतीसाठी राज्य सरकारचा पुढाकार

इलेक्ट्रिक बोटींसाठी मुंबई बँकेने विशेष कर्ज योजना आणावी - मंत्री नितेश राणे इलेक्ट्रिक बोटिंसाठी मुंबई बँक

Palghar Accident : काळजाचा ठोका चुकवणारं दृश्य! एकाच रांगेत १२ मृतदेह, बापूगावात महिलांचा हृदय पिळवटून टाकणारा आक्रोश

पालघर : आनंदाने नटलेले घर, साखरपुड्याच्या निमित्ताने जमलेले सर्व नातेवाईक आणि उत्साहाचे वातावरण... पण नियतीच्या