Godavari to Narmada : असा होणार गोदा ते नर्मदा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जलयात्रेचा समारोप समारंभ

मुंबई : जलव्यवस्थापन अधिक गतिमान, लोकाभिमुख आणि जनसहभागातून प्रभावी करण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आलेल्या ‘जल व्यवस्थापन कृती पंधरवडा’ उपक्रमाअंतर्गत सुरू करण्यात आलेल्या ‘गोदा ते नर्मदा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जलयात्रेचा समारोप समारंभ मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री डॉ.मोहन यादव यांच्या उपस्थितीत संपन्न होणार असल्याची माहिती जलसंपदा मंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.


जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली ‘विचार, वारसा आणि विकास’ या त्रिसूत्रीवर आधारित सुरू करण्यात आलेली जलयात्रा श्रीक्षेत्र महेश्वर येथे पोहचणार आहे.राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमास जलसंपदा मंत्री गिरीष महाजन मंत्री जयकुमार रावल मध्यप्रदेशचे खासदार सुमेरसिंह सोळंकी,खा.गजेंद्रसिंह पटेल खा.ज्ञानेश्वर पाटील खा.रामराव वडकुते आ.राजकुमार मेव आ.बालकृष्ण पाटीदार आ.गोपीचंद पडळकर यांच्यासह स्थानिक पदाधिकारी उपस्थित राहाणार आहेत.


जलसंवर्धनाबाबत जनजागृती, लोकसहभाग आणि शाश्वत पाणी व्यवस्थापनाची संकल्पना अधिक बळकट करणे असा मुख्य उद्देश घेवून निघालेली जलयात्रा नासिक अहील्यानगर छत्रपती संभाजीनगर चाळीसगाव धुळे जिलह्यातून मध्यप्रदेशकडे रवाना होणार आहे.यात्रेचे सर्व ठिकाणी झालेले उत्साहपूर्ण स्वागत लोकांनी दाखवलेला सहभाग यामुळे जलयात्रा लोकचळवळ झाल्याचे समाधान आहेमहेश्वर येथे यात्रेच्या सांगता समारंभाची भव्य तयारी विभागाने केली असून सांगता समारंभ भव्य दिव्य आणि सांसकृतिक परंपरेला साजेसा होईल असे नियोजन करण्यात आल्याचे मंत्री विखे पाटील म्हणाले.

Comments
Add Comment

Chandrashekhar Bawankule : शेती, शेतरस्त्याच्या भांडणात आता ई-मेलवर मिळालेली नोटीस ग्राह्य

- महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा निर्णय; बाधित शेतकऱ्यांना मिळणार 'मोफत' पोलीस संरक्षण मुंबई : ग्रामीण

Devendra Fadnavis : नीती आयोगाच्या निर्देशांकांवर पुढील ४ वर्षांत परिणामकारक कामाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश

शाश्वत विकास उद्दिष्टांमध्ये महाराष्ट्र देशात अव्वल

Pavana Dam : पवना धरण ९३ टक्क्यांहून अधिक भरले; नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा

मावळ : मावळ तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे पवना धरणातील पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ

Ashadhi Wari Charan Seva : ‘चरणसेवा’ने जपले लाखो वारकऱ्यांचे आरोग्य; १४ जिल्ह्यांतील ४.९६ लाख वारकऱ्यांना थेट लाभ

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून राबविण्यात आलेल्या उपक्रमाचा २४ जुलै रोजी समारोप; १४०

Maharashtra Cyber ​​Cell : महाराष्ट्र सायबर सेल कात टाकणार

- केंद्र सरकारच्या धर्तीवर 'हायटेक' रचना; सर्व यंत्रणा येणार एका छताखाली मुंबई : वाढत्या सायबर गुन्ह्यांवर वेगाने

Nitesh Rane : चिपी विमानतळाला जलमार्गांनी जोडणार

मंत्री नितेश राणे यांची घोषणा; १५ ऑगस्टपासून नवी मुंबई-चिपी विमानसेवा सुरू होणार मुंबई : "सिंधुदुर्ग जिल्ह्याचा