MLC Election : विधान परिषदेसाठी भाजपची १४ नावांची सुधारित यादी दिल्लीला

मुंबई : विधान परिषदेच्या १० जागांसाठी येत्या १२ मे रोजी होणाऱ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये घडामोडींना वेग आला आहे. प्रदेश कोअर कमिटीने पाठवलेली ३० नावांची लांबलचक यादी दिल्लीतील पक्षश्रेष्ठींनी नाकारल्यानंतर, आता भाजपने १४ नावांची सुधारित आणि छोटी यादी केंद्राकडे पाठवली आहे. यामध्ये प्रामुख्याने मुंबई वगळता राज्यातील पाच विभागांतील संघटनात्मक आणि जातीय समीकरणे साधणाऱ्या चेहऱ्यांना संधी मिळण्याचे संकेत आहेत.


विधान परिषदेच्या नऊ नियमित आणि एका पोटनिवडणुकीच्या जागांपैकी भाजपच्या वाट्याला ६ जागा येणार आहेत. त्यासाठी इच्छुकांची मोठी गर्दी झाल्याने सुरुवातीला ३० नावांची यादी पाठवण्यात आली होती. मात्र, निम्मी नावे कापून सुधारित यादी पाठवा, असा संदेश दिल्लीतून आल्याने १४ नावे निश्चित करून प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी यादी दिल्लीला पाठवून दिली आहे. उमेदवारी न मिळाल्यास होणारे 'नाराजीनाट्य' टाळण्यासाठी भाजप अर्जाच्या शेवटच्या दिवशी, म्हणजेच ३० एप्रिल रोजीच अधिकृत यादी जाहीर करण्याची शक्यता आहे.


पराभूत नेत्यांना तूर्तास 'नो एन्ट्री'


पक्षातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, लोकसभा किंवा विधानसभा निवडणुकीत पराभूत झालेल्या नेत्यांना विधान परिषदेवर पाठवायचे नाही, असे धोरण भाजपने स्वीकारले आहे. त्याऐवजी संघटनेत दीर्घकाळ काम करणाऱ्या नव्या चेहऱ्यांवर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. या शर्यतीत प्रामुख्याने डॉ. उपेंद्र कोठेकर, माधवी नाईक, रवी अनासपुरे, राजेश पांडे, दयाशंकर तिवारी यांची नावे चर्चेत आहेत. विवेक कोल्हे, जगदीश मुळीक आणि अर्चना पाटील चाकूरकर यांच्या नावांचीही चाचपणी सुरू आहे. राजकीय गणिते आणि जातीय समतोल साधताना भाजप कोणाच्या गळ्यात उमेदवारीची माळ टाकणार, याकडे आता राज्यातील इच्छुकांचे लक्ष लागले आहे. दिल्लीतील बैठकीनंतर पुढील काही तासांत पाच नावांवर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.


महायुती आणि मविआमध्ये अद्याप 'वेट अँड वॉच'


अर्ज भरण्यासाठी अवघे दोन दिवस शिल्लक असतानाही महायुती किंवा महाविकास आघाडीने आपल्या उमेदवारांची अधिकृत घोषणा केलेली नाही. संख्याबळानुसार महायुतीला नऊ तर मविआला एक मिळेल. त्यात भाजप ५, शिवसेनेला (शिंदे गट) २ आणि राष्ट्रवादीच्या (अजित पवार गट) एका जागेचा समावेश आहे. प्रज्ञा सातव यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या पोटनिवडणुकीच्या जागेवर त्यांनाच पुन्हा उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता आहे.

Comments
Add Comment

Dhule News : शिरपूर-चोपडा मार्गावर भीषण अपघात; दोन जिवलग मित्रांचा जागीच मृत्यू

Dhule News : धुळे जिल्ह्यातुन एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. जिल्ह्यातील शिरपूर-चोपडा मार्गावर झालेल्या भीषण अपघातात

Vikroli Crime : 'गाणी हळू वाजव' एवढंच बोलला अन्... ; दोन सख्या भावांमध्ये रक्तरंजित खेळ; दोघांचा मृत्यू

मुंबई : मुंबईतील विक्रोळी पार्कसाईट परिसरात कौटुंबिक वादातून घडलेल्या हल्ल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. राहुल

Jalgaon Gold Rate : सोने चांदीचे भाव गगनाला ! जळगाव शहरातील सुवर्ण बाजारपेठेत मोठी उलथापालथ

Jalgaon Gold Rate : जळगाव शहरातील सुवर्ण बाजारपेठेत (Jalgaon Gold Market) गेल्या काही दिवसांपासून सोने, चांदीच्या दरात कमी-अधिक फरकाने

Tiranga Rally : भाजप प्रत्येक जिल्ह्यात काढणार 'तिरंगा रॅली'

- ९ ते १७ ऑगस्टदरम्यान आयोजन; १० ऑगस्टला मुंबईत २५ हजार तरुणांसह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सहभागी होणार मुंबई :

Rickshaw-Taxi Driver : 15 ऑगस्टनंतर 'या' रिक्षा-टॅक्सी चालकांवर कारवाईची शक्यता; मुदतवाढ मिळणार नाही

मुंबई : राज्यात रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषेचे मूलभूत ज्ञान अनिवार्य करण्याच्या निर्णयाची

Ahilyanagar : शेततळ्यात बुडून दोन शेतकऱ्यांचा दुर्दैवी मृत्यू; परिसरात हळहळ

Ahilyanagar : अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यात एक मन हेलावणारी घटना घडली आहे. कोपरगाव तालुक्यातील बाहदराबाद