HSC RESULT : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा बारावीचा निकाल कधी जाहीर होणार ?

मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा बारावीचा निकाल कधी जाहीर होणार ? हा प्रश्न अनेकांना सतावत आहे. मोठ्या प्रमाणात तर्कवितर्क सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर सूत्रांनी अतिशय महत्त्वाची माहिती दिली आहे. यंदा महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा बारावीचा निकाल शुक्रवार १५ मे २०२६ किंवा त्याआधी जाहीर होईल, असे सूत्रांचे म्हणणे आहे.

डिजीलॉकरच्या अधिकृत वेबसाईटवर "Class 12th Result 2026 Coming Soon" असा संदेश दिसू लागला आहे. निकालाची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असल्यामुळे डिजीलॉकरच्या अधिकृत वेबसाईटवर बारावीचा निकाल लवकरच असा संकेत देणारा संदेश दिसू लागल्याचे मत अनेकजण व्यक्त रत आहेत. पण सूत्रांनी बारावीचा निकाल शुक्रवार १५ मे २०२६ किंवा त्याआधी जाहीर होईल, असे सांगितले. तर काही मीडिया रिपोर्टनुसार बारावीचा निकाला २५ मे च्या आधी जाहीर होईल. अद्याप मंडळाने बारावीच्या निकालाच्या अधिकृत तारखेची घोषणा केलेली नाही. पण येऊ लागलेल्या रिपोर्टमुळे बारावीची परीक्षा दिलेल्यांची धाकधूक वाढण्यास सुरुवात झाली आहे.

बारावीचा निकाल ऑनलाईन तपासण्यासाठीच्या निवडक वेबसाईट : mahresult.nic.in , hscresult.mkcl.org , results.digilocker.gov.in , mahahsscboard.in

बारावीचा निकाल बघण्यासाठी आधी ही तयारी करा

विद्यार्थ्यांनी बारावीचा निकाल बघण्यासाठी सोबत हॉल तिकिटातील सर्व माहिती ठेवावी. ऑनलाईन निकाल बघण्यासाठी हॉल तिकिटावरील सीट नंबर अर्थात आसन क्रमांक किंवा बैठक क्रमांक तसेच अर्जावर नोंदवलेले आईचे नाव व्यवस्थित टाईप करावे लागेल. महाराष्ट्र बोर्ड एकाच वेळी विज्ञान, कला, वाणिज्य आणि व्यावसायिक शाखांचे निकाल जाहीर करणार आहे. मागील वर्षी विज्ञान शाखेचा निकाल सर्वाधिक ९७.३५% लागला होता. यावर्षीही निकालाचा टक्का वाढण्याची शक्यता आहे.
Comments
Add Comment

Chandrashekhar Bawankule : संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाची १,०५३ एकर वनजमीन सुरक्षित! महसूलमंत्री बावनकुळेंच्या निर्णयाने वन विभागाचा हक्क कायम

मुंबई : संजय गांधी राष्ट्रीय उद्यानालगतच्या (Sanjay Gandhi National Park forest) महत्त्वाच्या वनक्षेत्राबाबत राज्य सरकारने मोठा

Special Trains : मुंबई आणि मडगाव दरम्यान धावणार ४ साप्ताहिक विशेष गाड्या; प्रवाशांना मोठा दिलासा

मुंबई: आठवड्याच्या अखेरीस आणि आगामी सणासुदीच्या काळात प्रवासाचे नियोजन करणाऱ्या प्रवाशांसाठी मध्य रेल्वेने एक

Gold medal-winning athlete : सुवर्णपदक विजेता खेळाडू राज ठाकरेंवर भडकला; अडीच तास ताटकळत ठेवूनही भेट न झाल्याने नाराजी

मुंबई : क्रीडा क्षेत्रात देशाचे आणि राज्याचे नाव उज्ज्वल करणाऱ्या खेळाडूंना अनेकदा प्रशासकीय आणि राजकीय

Shrinivas Vinayak Kulkarni : मराठी साहित्यातील तेजस्वी पर्व संपले; मौज नियतकालिकाचे संपादक आणि 'डोह'कार श्री. वि. कुलकर्णी यांना मुख्यमंत्र्यांनी वाहिली श्रद्धांजली

मुंबई : ज्येष्ठ साहित्यिक, 'डोह'कार म्हणून ओळखले जाणारे श्रीनिवास विनायक कुलकर्णी म्हणजेच श्री. वि. कुलकर्णी (Shrinivas

Mangal Prabhat Lodha : म्हाडासाठी राखीव घरे न देणाऱ्या विकासकांवर कडक कारवाई करा; गरज पडल्यास कारागृहात पाठवा - मंत्री मंगल प्रभात लोढा

नागरिक आणि म्हाडा मधील संवाद अधिक प्रभावी करण्यासाठी सल्लागार समिती स्थापन करण्याच्या मंत्री लोढा यांच्या

Samagra Shiksha Abhiyan : २२ वर्षांचा संघर्ष अखेर संपला! समग्र शिक्षा अभियानातील ३,२७६ कंत्राटी कर्मचाऱ्यांना सेवाशाश्वती; राज्य सरकारचा ऐतिहासिक निर्णय

मुंबई : तब्बल २२ वर्षांपासून समग्र शिक्षा अभियानांतर्गत (Samagra Shiksha Abhiyan) कंत्राटी तत्त्वावर कार्यरत असलेल्या ३,२७६