मुंबई : भारत आणि चीनला “नरकाचे खड्डे” असे संबोधणारी सोशल मीडियावरील पोस्ट शेअर केल्यानंतर इराणने तीव्र आक्षेप घेत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची खिल्ली उडवली आहे.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शेअर केलेल्या या वांशिक स्वरूपाच्या वक्तव्यावर मुंबईस्थित इराणी वाणिज्य दूतावासाने त्यांच्यावर जोरदार टोला लगावला आहे. मुंबईतील इराणच्या महावाणिज्य दूतावासाने एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर महाराष्ट्राच्या समृद्ध सांस्कृतिक आणि भौगोलिक वारशाचे दर्शन घडवणारा एक व्हिडिओ शेअर केला.मुंबईतील इराणच्या महावाणिज्य दूतावासाने दावा केला की, महाराष्ट्राचा दौरा ट्रम्प यांच्यासाठी “सांस्कृतिक विषनाशक” ठरू शकतो. इराणी दूतावासाने लिहिले, “कधी भारतात येऊन बघा, मग बोला. कदाचित कुणीतरी ट्रम्प यांच्यासाठी एकतर्फी सांस्कृतिक विश्रांती यात्रा बुक करायला हवी, त्यामुळे कदाचित निरर्थक बडबड कमी होईल.”
इराणमध्ये सध्या कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) द्वारे तयार करण्यात आलेला एक व्हिडिओ मोठ्या चर्चेत आहे, ज्यामध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प ...
हा वाद तेव्हा सुरू झाला, जेव्हा ट्रम्प यांनी अमेरिकन राजकीय भाष्यकार आणि रेडिओ होस्ट मायकेल सॅव्हेज यांच्या पॉडकास्टची पोस्ट पुन्हा शेअर केली. या पॉडकास्टमध्ये भारत, चीन आणि इतर देशांना “नरकाचे खड्डे” असे संबोधण्यात आले होते.अमेरिकेच्या जन्मसिद्ध नागरिकत्व कायद्यात बदल करण्याची मागणी करत आपल्या वांशिक भाषणात सॅव्हेज यांनी आरोप केला होता की, या दोन्ही आशियाई देशांतील लोक अमेरिकेत “गर्भधारणेच्या नवव्या महिन्यात बाळ जन्माला घालण्यासाठी” येतात आणि कायद्यानुसार त्यांना “तात्काळ” अमेरिकन नागरिकत्व मिळते.
वॉशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी घोषणा केली की इस्रायल आणि लेबनॉन यांच्यातील युद्धविराम आणखी तीन आठवड्यांसाठी वाढवण्यात ...
दरम्यान भारताने या टिप्पण्यांचा निषेध करत त्यांना अज्ञानपूर्ण, अयोग्य आणि अश्लाघ्य म्हटले. परराष्ट्र मंत्रालयाने ट्रम्प यांचे नाव न घेता जारी केलेल्या निवेदनात म्हटले की, या टिप्पण्या “निश्चितच भारत-अमेरिका संबंधांची खरी प्रतिमा दर्शवत नाहीत. हे संबंध दीर्घकाळापासून परस्पर आदर आणि सामायिक हितसंबंधांवर आधारित आहेत.” तथापि, नंतर परिस्थिती सावरण्याच्या प्रयत्नात अमेरिकन दूतावासाने एक निवेदन जारी केले. त्यात म्हटले की, ट्रम्प यांचे मत आहे की भारत हा एक महान देश आहे आणि त्याचे नेतृत्व माझ्या एका चांगल्या मित्राकडे आहे.