Mamata Banerjee : ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी घातक”- सर्वोच्च न्यायालय

ममता बॅनर्जी सरकारकडून केंद्रीय यंत्रणांच्या चौकशीत होणारा हस्तक्षेप लोकशाहीसाठी घातक आहे. तसेच पश्चिम बंगाल प्रशासनाचे वर्तन देखील योग्य नसल्याची घणाघाती टीका सर्वोच्च न्यायालयाने केली आहे.


पश्चिम बंगालमध्ये स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन (एसआयआर) मोहिमेदरम्यान न्यायिक अधिकाऱ्यांना घेराव घालून त्यांना बंधक बनविण्याच्या घटनेवर सर्वोच्च न्यायालयाने तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली. न्या. पी. के. मिश्रा आणि न्या. एन. वी. अंजारिया यांच्या खंडपीठाने या प्रकरणाची सुनावणी करताना राज्यातील सध्याची सामाजिक व राजकीय परिस्थिती “असामान्य” असल्याचे म्हटले. त्यांनी स्पष्ट केले की, केवळ सैद्धांतिक कायदेशीर मुद्द्यांवर चर्चा करून वास्तव परिस्थितीकडे दुर्लक्ष करता येणार नाही. न्यायालयाने निरीक्षण नोंदवले की, ही अत्यंत गंभीर आणि असामान्य परिस्थिती आहे. अनेक न्यायिक अधिकाऱ्यांना बंधक बनविण्यात आले होते. अशा वास्तवाकडे आम्ही दुर्लक्ष करू शकत नसल्याचे न्यायालयाने म्हंटले आहे.



सुनावणीदरम्यान न्यायालयाने पश्चिम बंगाल प्रशासनावरही टीका केली. विशेषतः मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या हस्तक्षेपाबाबत न्यायालयाने नाराजी व्यक्त केली. केंद्रीय यंत्रणेद्वारे सुरू असलेल्या चौकशीत हस्तक्षेप करणे हे लोकशाहीसाठी धोकादायक असल्याचे न्यायालयाने नमूद केले. यासोबतच सुप्रीम कोर्टाने असेही स्पष्ट केले की, “हे राज्य आणि केंद्र यांच्यातील वाद नसून, चौकशी सुरू असताना कोणत्याही मुख्यमंत्र्याने संबंधित कार्यालयात प्रवेश करून हस्तक्षेप करणे अयोग्य आहे. असे कृत्य लोकशाही व्यवस्थेला धक्का देणारे असल्याचे कोर्टाने म्हंटले आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी गुरुवारी 23 तारखेला होण्याची शक्यता आहे.

Comments
Add Comment

Ind vs Nz Schedule : क्रिकेट चाहत्यांसाठी आनंदाची बातमी! असा असेल भारतीय संघाचा न्युझीलंड दौरा

मुंबई : भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी अपडेट समोर आली आहे. न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाने भारताच्या आगामी

Solapur Sucide News : पत्नीसाठी शेवटचा संदेश रेकॉर्ड केला, नंतर घेतला टोकाचा निर्णय; सोलापूरमध्ये धक्कादायक घटना!

सोलापूर : सोलापूर (Solapur) शहरात एकाच दिवशी तिघांनी आत्महत्या (Sucide) केल्याच्या धक्कादायक घटनांमुळे खळबळ उडाली आहे.

Crime News : समृध्दी महामार्गावर लुटमार करणारी आंतरजिल्हा टोळी जेरबंद

अहिल्यानगर : समृद्धी महामार्गावर लूटमार करणारी आंतरजिल्हा टोळीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केले

फोन घेताना सावधान ! 'जुने फोन नवे करून' विक्री ; कुठे सुरु आहे धक्कादायक प्रकार ?

जामखेड : जामखेड शहरात सध्या मोबाईल ग्राहकांची आर्थिक लूट आणि फसवणूक करणारा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

Mahayuti : महायुतीमधील बंडखोरांनी तातडीने अर्ज मागे घ्यावेत

रवींद्र चव्हाणांचे आवाहन; एकत्र पत्रकार परिषद घेत महायुतीने जाहीर केली अधिकृत उमेदवारांची यादी मुंबई : स्थानिक

Team India New Coach: अफगाणिस्तान दौऱ्यापूरर्वी टीम इंडियात मोठे बदल; टीम इंडियाला मिळाला नवा फिरकी गुरू !

मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळा द्वारा (बीसीसीआय) भारतीय पुरुष वरिष्ठ संघाच्या फिरकी गोलंदाजी प्रशिक्षकपदी