Mamata Banerjee : ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी घातक”- सर्वोच्च न्यायालय

ममता बॅनर्जी सरकारकडून केंद्रीय यंत्रणांच्या चौकशीत होणारा हस्तक्षेप लोकशाहीसाठी घातक आहे. तसेच पश्चिम बंगाल प्रशासनाचे वर्तन देखील योग्य नसल्याची घणाघाती टीका सर्वोच्च न्यायालयाने केली आहे.


पश्चिम बंगालमध्ये स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन (एसआयआर) मोहिमेदरम्यान न्यायिक अधिकाऱ्यांना घेराव घालून त्यांना बंधक बनविण्याच्या घटनेवर सर्वोच्च न्यायालयाने तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली. न्या. पी. के. मिश्रा आणि न्या. एन. वी. अंजारिया यांच्या खंडपीठाने या प्रकरणाची सुनावणी करताना राज्यातील सध्याची सामाजिक व राजकीय परिस्थिती “असामान्य” असल्याचे म्हटले. त्यांनी स्पष्ट केले की, केवळ सैद्धांतिक कायदेशीर मुद्द्यांवर चर्चा करून वास्तव परिस्थितीकडे दुर्लक्ष करता येणार नाही. न्यायालयाने निरीक्षण नोंदवले की, ही अत्यंत गंभीर आणि असामान्य परिस्थिती आहे. अनेक न्यायिक अधिकाऱ्यांना बंधक बनविण्यात आले होते. अशा वास्तवाकडे आम्ही दुर्लक्ष करू शकत नसल्याचे न्यायालयाने म्हंटले आहे.



सुनावणीदरम्यान न्यायालयाने पश्चिम बंगाल प्रशासनावरही टीका केली. विशेषतः मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या हस्तक्षेपाबाबत न्यायालयाने नाराजी व्यक्त केली. केंद्रीय यंत्रणेद्वारे सुरू असलेल्या चौकशीत हस्तक्षेप करणे हे लोकशाहीसाठी धोकादायक असल्याचे न्यायालयाने नमूद केले. यासोबतच सुप्रीम कोर्टाने असेही स्पष्ट केले की, “हे राज्य आणि केंद्र यांच्यातील वाद नसून, चौकशी सुरू असताना कोणत्याही मुख्यमंत्र्याने संबंधित कार्यालयात प्रवेश करून हस्तक्षेप करणे अयोग्य आहे. असे कृत्य लोकशाही व्यवस्थेला धक्का देणारे असल्याचे कोर्टाने म्हंटले आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी गुरुवारी 23 तारखेला होण्याची शक्यता आहे.

Comments
Add Comment

Pune Crime : प्रियसीनेच केली प्रियकराची हत्या : धक्कादायक प्रकार उघडकीस

पुणे(pune) : पुण्यामध्ये एक धक्कादायक आणि विचीत्र असा प्रकार उघडकीस आला आहे . आजकालच्या जीवनात कोणावर विश्वास

Weather Update : महाराष्ट्रासाठी पुढचे २४ तास महत्त्वाचे ! राज्यातील 3० जिल्ह्यांना यलो अलर्ट; लवकरच मान्सूनचे आगमन होणार ?

Mumbai : मुंबईसह राज्यातील काही भागात मंगळवारी (२३ जून ) ला पावसानी हजेरी लावली. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या

Nitesh Rane : ओसरगाव टोलनाक्यावर 'एमएच-०७' वाहनांना टोलमाफी

 पालकमंत्री नितेश राणे यांची वाढदिवसानिमित्त सिंधुदुर्गवासीयांना मोठी भेट; स्वतंत्र मार्गिका, व्यावसायिक

Fire Accident :लखनऊ कोचिंग क्लास आगप्रकरणी चौघांना अटक, चार अधिकारी निलंबित

लखनऊ(Lucknow) : अलीगंज (सेक्टर-डी) येथे एका कोचिंग सेंटरला लागलेल्या भीषण आगीच्या दुर्घटनेने संपूर्ण उत्तर प्रदेश

Rohit Sharma : रोहित शर्माला पद्मश्री तर टेनिसपटू विजय अमृतराज यांना पद्मभूषण

नवी दिल्ली : भारतीय संघाचा माजी कर्णधार रोहित शर्मा(rohit sharma) यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

Chandrashekhar Bawankule : अहिल्यानगरमध्ये दारुगोळा, स्फोटके, संरक्षण साहित्य, सौरऊर्जा प्रकल्प

शेती महामंडळाची साडेचार हजार एकर जमीन देण्यास महसूल विभागाची मान्यता मुंबई : अहिल्यानगर जिल्ह्यातील हरेगाव मळा