लग्न जमेना म्हणून तरुणाची भन्नाट कल्पना, थेट बॅनरवर पठ्ठ्याने लिहिलं असं काही की तुम्हांलाही ऐकून धक्का बसेल

पुणे : लग्न जमत नाही म्हणून अनेक तरुण सध्या नैराश्यात दिसत आहे. मुलीच्या तसेच वडिलांच्या एकंदरीतच कुटुंबियांच्या मुलाकडून वाढलेल्या अपेक्षा या कारणामुळे आज अनेक मुलांना लग्न जमण्यास अडचण येत आहे. यापूर्वी तर मुलांनी लग्नासाठी मुलगी मिळत नाही म्हणून मोर्चे देखील काढलेले आहेत. आता याच सर्व गोष्टी विचारात घेता पुण्यातील एका उत्साही तरुणाने लग्नासाठी मुलगी मिळावी म्हणून अजबच पर्याय शोधला. अर्थात जेव्हा सत्य समोर आले तेव्हा त्याचा प्लॅन चांगलाच फसला.


नेमकं प्रकरण काय ?
लग्नासाठी उत्साही असलेला २६ वर्षीय तरुण ऋषिकेश राजू जाधव ( rushikesh jadhav ) याने लग्न जमवण्यासाठी आणि इम्प्रेशन” मारण्यासाठी भलताच प्रयोग केला. या तरुणाने स्वतःला पुणे शहर पोलीसमध्ये निवड झाल्याचे भासवण्यासाठी शहरभर फ्लेक्स लावले. लग्न जमत नसल्यामुळे आणि मुलींवर प्रभाव पाडण्यासाठी हा सगळा खटाटोप केल्याची माहिती समोर आली आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, ऋषिकेशचे ( rushikesh jadhav ) लग्न जमत नव्हते. मुलींच्या घरी प्रभाव पाडण्यासाठी आणि आपली प्रतिष्ठा वाढवण्यासाठी त्याने आपली पुणे शहर पोलीस दलात निवड झाल्याचे खोटे सांगितले. तो इतक्यावरच थांबला नाही तर त्याने थेट पोलीस वर्दीतील फोटो काढून ते आपल्या व्हॉट्सअ‍ॅप स्टेटसवर (Whatsapp Status) ठेवले आणि "मी पोलीस झालो" असा प्रचार सुरू केला.


अखेर ऋषिकेशचे बिंग फुटले... 
विशेष म्हणजे त्याने स्वतःच्या अभिनंदनाचे मोठे फ्लेक्स नऱ्हे परिसरात लावले. या फ्लेक्सवर तो पोलीस वर्दीत (Fake Police) रुबाबदार दिसत होता. मात्र, परिसरातील खऱ्या पोलिसांच्या नजरेत हे फ्लेक्स पडले आणि त्यांना संशय आला. जेव्हा पोलिसांनी अधिकृतपणे या नावाच्या उमेदवाराची चौकशी केली, तेव्हा पुणे पोलीस दलात या नावाची कोणतीही व्यक्ती भरती झाली नसल्याचे (Fake Police) उघड झाले आणि ऋषिकेशचे बिंग फुटले.


एवढा खोटा गाजावाजा कशासाठी ?


हा सर्व प्रकार आणि खोटा गाजावाजा केवळ मुलींवर प्रभाव पाडण्यासाठी आणि लग्नाची 'लाईन' लावण्यासाठी ऋषिकेशने केल्याचे तपासात निष्पन्न झाले. नऱ्हे पोलीस ठाण्याने या प्रकरणाची गंभीर दखल घेत ऋषिकेश जाधव विरोधात भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 204 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान सोशल मीडियावर या घटनेची चर्चा चांगलीच रंगली आहे. दरम्यान एकाबाजूला वाढणाऱ्या अपेक्षा आणि दुसऱ्या बाजूला बेरोजगारीचा मुद्दा यामुळे पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

Comments
Add Comment

Nitesh Rane : मोरा मच्छीमारांना नुकसानभरपाई द्या; मंत्री नितेश राणे यांचे निर्देश

मुंबई : जे. एन. पी. ए. मार्फत(JNPA) मार्फत चौथ्या बंदराच्या भरावाच्या कामामुळे मोरा गावातील मच्छीमारांचे झालेले

भोंदू अशोक खरातच्या अडचणीत वाढ, कुटुंबियांचीही वाढणार अडचण; कोट्यवधीच्या प्रॉपर्टीवर..., हालचालींना वेग

नाशिक : संपूर्ण देशालाच हादरवून सोडणाऱ्या भोंदू अशोक खरातच्या (Ashok Kharat) अडचणीत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे.

Santosh Deshmukh : 'त्यांच्यावर कुटुंबीयांचा दबाव'..., मस्साजोगच्या सरपंचपदाच्या उमेदवाराचा खळबळजनक आरोप

संपूर्ण राज्याला हादरवून सोडणाऱ्या सरपंच संतोष देशमुख ( Santosh Deshmukh ) यांच्या मस्साजोग या गावात राजकीय वातावरण रंगले

Pune Water Supply : पुण्याच्या पाणीकपातीवर प्रशासनाने घेतला हा महत्वाचा निर्णय

पुणे : सूर्याचा प्रकोप हा वाढत जातोय, तापमानाचा पारा इतका वाढलाय की थेट तापमान ४०- ४५ अंशापर्यत जाऊन पोहोचलाय,

Free Registration For Agricultural Land : राज्य सरकारचा मोठा निर्णय; शेतजमिनीच्या वाटणीवरील नोंदणी फी रद्द

मुंबई : राज्यातील शेतकरी आणि सर्वसामान्य जनतेला मोठा दिलासा देत राज्य सरकारने शेतजमिनीच्या वाटणीपत्रावर

‘विकसित महाराष्ट्र २०४७’साठी ठोस कृती आराखडा; प्रादेशिक तफावत कमी करण्यावर सरकारचा भर

राज्यातील प्रादेशिक तफावत कमी करून सर्व जिल्ह्यांचा समतोल आणि सर्वांगीण विकास साधण्यासाठी प्रत्येक विभागाने