Marine Technology : आधुनिक सागरी तंत्रज्ञान महाराष्ट्रात आणणार; मंत्री नितेश राणे

मुंबई : राज्यातील सागरी वाहतूक व्यवस्था अधिक आधुनिक, सुरक्षित आणि प्रवासी-केंद्रित करण्याच्या दृष्टीने मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी महाराष्ट्र सागरी मंडळ (Maharashtra Maritime Board) चे बंदरे निरीक्षक व तत्सम अधिकाऱ्यांची मंत्रालयात बैठक घेतली. या बैठकीत सध्याच्या फेरीबोट व रो-रो सेवांचा सविस्तर आढावा घेत विविध सुधारणा उपायांवर चर्चा करण्यात आली.


राज्यातील वाढती प्रवासी संख्या लक्षात घेता फेरीबोट सेवांमध्ये अधिक कार्यक्षमतेची गरज असल्याचे अधोरेखित करत मंत्री राणे यांनी तिकीट प्रणाली अधिक पारदर्शक व सुलभ करण्यासाठी डिजिटल अॅप विकसित करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या. यामुळे प्रवाशांना जलद, सोयीस्कर आणि विश्वासार्ह सेवा उपलब्ध होणार असल्याचे त्यांनी नमूद केले.


प्रवासी सुरक्षेच्या दृष्टीने कोणतीही तडजोड सहन केली जाणार नाही, असे स्पष्ट करत ओव्हरलोडिंग रोखणे, सुरक्षेचे नियम काटेकोरपणे पाळणे आणि अपघात टाळण्यासाठी प्रभावी उपाययोजना राबवण्याचे निर्देशही यावेळी मंत्री नितेश राणे यांनी दिले. याशिवाय परदेशातील प्रगत सागरी वाहतूक प्रणालींचा अभ्यास करून त्यातील आधुनिक तंत्रज्ञान महाराष्ट्रात आणण्यासाठी अधिकाऱ्यांनी पुढाकार घ्यावा, तसेच त्यासाठी ठोस आणि कृतीक्षम प्रस्ताव सादर करावेत, असेही त्यांनी सांगितले. राज्यातील नागरिकांना अधिक सुरक्षित, दर्जेदार व आधुनिक सुविधा दिल्याने शासनाच्या महसुलात वाढ होईल यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करण्याचे निर्देश ही या बैठकीत देण्यात आले.

Comments
Add Comment

Chandrashekhar Bawankule : राज्यातील २ लाख आदिवासींना मिळणार 'सातबारा'

- वनपट्टाधारकांसाठी 'नमुना ७ ई आणि १२ ई' लागू; महसूलमंत्र्यांची विधानसभेत ऐतिहासिक घोषणा मुंबई : राज्यातील लाखो

Mumbai Water Supply : मुंबईसाठी दिलासादायक बातमी! विहारनंतर तुळशी तलावही ओसंडून वाहू लागला

मुंबई : मुंबईत सुरू असलेल्या दमदार पावसामुळे शहराच्या पाणीपुरवठ्यासाठी महत्त्वाचा असलेला तुळशी तलाव (Tulsi lake)

Bhandup Bus Accident : भरधाव बेस्ट बसचं भांडुपमध्ये नियंत्रण सुटलं; पादचाऱ्यासह अनेक वाहनांना धडक

मुंबई : मुंबईतील भांडुप (Bhandup) परिसरात बेस्ट बसचा विचित्र अपघात (Accident) घडला. भांडुपमधील कोकण नगर (Kokan Nagar) येथील क्रिटिकल

Vasai-Virar Rain Update : वसई-विरारमध्ये पावसाचा कहर! पूर, वीज आणि इंटरनेट बंद; हजारो नागरिकांचे जनजीवन विस्कळीत

पालघर : वसई-विरार (Vasai- Virar) परिसरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. सलग दोन

Mumbai Rain : मुसळधार पावसामुळे विहार तलाव भरला; मुंबईतील पहिला तलाव ओव्हरफ्लो!

मुंबई : मुंबईत (Mumbai) सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे (Heavy Rain) अखेर मुंबईतील पहिला Vihar (विहार) Lake (तलाव) ओसंडून (Overflow) वाहू

Wadala building collapse : वडाळ्यात इमारतीचा पहिला मजला कोसळला; तिघेजण किरकोळ जखमी

मुंबई: मुंबईतील वडाळा (Wadala)(पूर्व) परिसरात मंगळवारी इमारतीचा पहिला मजला कोसळल्याची घटना घडली. शांतीनगर येथील