El Nino : 'एल निनो’च्या पार्श्वभूमीवर राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात ‘टास्क फोर्स’

मुंबई : यंदा ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात ‘एल निनो’चा प्रभाव वाढण्याची शक्यता असून पावसाचे प्रमाण सरासरीपेक्षा कमी राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. या संभाव्य नैसर्गिक आपत्तीचे सौम्यीकरण करण्यासाठी सर्व विभागांनी तत्काळ पूर्वतयारी आणि प्रभावी अंमलबजावणी करावी. विशेषतः पाण्याचे सुयोग्य नियोजन, जलसंधारणाच्या कामांना गती आणि जुन्या जलस्त्रोतांचे पुनरुज्जीवन यावर भर द्यावा, असे स्पष्ट निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी दिले.


राज्यातील संभाव्य एल निनोच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात उच्चस्तरीय बैठक झाली. या बैठकीला कृषिमंत्री दत्तात्रय भरणे, आशिष जयस्वाल यांच्यासह विविध विभागांचे सचिव आणि हवामान विभागाचे तज्ज्ञ उपस्थित होते. पावसातील संभाव्य घट लक्षात घेता पिण्याचे पाणी आणि सिंचनासाठी पाण्याचा प्रत्येक थेंब जपून वापरणे आवश्यक आहे. यासाठी प्रत्येक जिल्ह्यात जिल्हाधिकारी, सिंचन विभाग आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रतिनिधींचा समावेश असलेला ‘टास्क फोर्स’ स्थापन करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले. केवळ चालू वर्षाचा नव्हे, तर पुढील उन्हाळ्याचाही विचार करून आतापासूनच पाणी साठवणुकीचे नियोजन करावे, असेही त्यांनी अधोरेखित केले.


कमी पावसात पिके वाचवण्यासाठी संरक्षित सिंचन हाच एकमेव पर्याय आहे. त्यामुळे ‘जलयुक्त शिवार’ आणि ‘गाळमुक्त धरण-गाळयुक्त शिवार’ या योजनांची कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. जुन्या जलस्त्रोतांच्या दुरुस्तीवर भर दिल्यास कमी खर्चात जास्त पाणी साठा उपलब्ध होईल. या कामांसाठी वित्त विभागाने तातडीने निधी उपलब्ध करून द्यावा, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.


वैरण विकासासाठी बॅक वॉटरचा वापर : पशुधनासाठी चारा टंचाई भासू नये म्हणून बाहेरील राज्यांवर अवलंबून न राहता राज्यातच वैरण विकास कार्यक्रम राबवावा. विशेषतः धरणांच्या बॅक वॉटर क्षेत्रात चारा लागवडीवर भर देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. सोलापूर, सांगली आणि मराठवाडा या भागांकडे चारा उपलब्धतेसाठी विशेष लक्ष देण्याचे निर्देश फडणवीस यांनी दिले.


खत वितरणावर ‘एआय’ची नजर : खते आणि बियाण्यांची कृत्रिम टंचाई रोखण्यासाठी ‘अॅग्रीस्टॅक’ प्रणालीचा वापर केला जाणार आहे. खत वितरणामध्ये पारदर्शकता राखण्यासाठी आणि तपासणी यंत्रणा मजबूत करण्यासाठी ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’ (एआय) म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्तेची मदत घेण्यावर मुख्यमंत्र्यांनी भर दिला.

Comments
Add Comment

Powai Lake Overflowing : आनंदवार्ता! मुंबईला पाणीपुरवठा करणारा पवई तलाव दुथडी भरून वाहू लागला; पावसामुळे जलसाठ्यात मोठी वाढ

मुंबई : मुंबईकरांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे

Mumbai Rains Traffic : मुंबईकरांनो सावधान! मुसळधार पावसाने शहर ठप्प; वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर प्रचंड वाहतूक कोंडी

मुंबई : मुंबईत रात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा फटका आता वाहतुकीलाही बसू लागला आहे. पश्चिम उपनगरात

Walkeshwar Accident : वाळकेश्वरमध्ये भिंत कोसळून एकाचा मृत्यू; बाबुलनाथ रोडवरील दुर्घटना

मुंबई : वाळकेश्वर (Walkeshwar) परिसरातील बाबुलनाथ रोड (Babulnath Road) येथील सूर्यप्रकाश इमारतीत (Surya Prakash Building) मंगळवारी (३० जून) रात्री

Vijaya Mehta : मराठी नाट्यसृष्टीवर शोककळा; ज्येष्ठ दिग्दर्शिका विजया मेहता यांचे निधन

मुंबई : मराठी रंगभूमीला नवे विचार, नवी दिशा आणि असंख्य गुणी कलाकार देणाऱ्या ज्येष्ठ नाट्यदिग्दर्शिका (Theatre Director)

BMC : रस्ते विकासकामे झाडांच्या मुळांवर

मुंबई : मुंबई महापालिकेच्यावतीने सध्या रस्ते काँक्रिटीकरणाची कामे जोरात असून ही सिमेंट काँक्रिटीकरणाची कामे

BMC News : बांधकामांच्या ठिकाणच्या १०७ जलजोडण्या कापल्या

मुंबईतील ४१८ अनधिकृत जलजोडण्या खंडित, १०२ बुस्टर जप्त मुंबई : पावसाळा (Rain) लांबणीवर पडल्याने मुंबईत १५ मे २०२६