Loan Waiver : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना ३० जूनच्या आधी कर्जमाफी मिळणार, कृषीमंत्र्यांनी दिले संकेत

मुंबई : आगामी खरीप हंगामावर ‘एल निनो’चे सावट असून यंदा राज्यात दीर्घकालीन सरासरीच्या ९२ टक्केच पाऊस पडण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर यंदा १४५.२० लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणीचे नियोजन करण्यात आले आहे, अशी माहिती राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी सोमवारी दिली. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पात घोषित केलेली ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजना’ ३० जूनच्या आत राबवली जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.


पुण्यातील शिवाजीनगर भागात नव्याने बांधण्यात आलेल्या ‘सारथी’च्या सभागृहात खरीप हंगाम २०२६-२७ च्या पूर्वतयारीसाठी राज्यस्तरीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत भरणे बोलत होते. यावेळी कृषी आयुक्त सूरज मांढरे, महाबीजचे व्यवस्थापकीय संचालक दिलीप स्वामी यांच्यासह विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.


यंदा खरिपासाठी २०.१७ लाख क्विंटल बियाण्यांची गरज असून, २८.०५ लाख क्विंटल साठा उपलब्ध आहे. खतांच्या बाबतीतही राज्य सुरक्षित असून, ४८.८० लाख मेट्रिक टन खतांचे आवंटन मंजूर झाले आहे. सद्यस्थितीत २५.१७ लाख मेट्रिक टन खत उपलब्ध असून, टंचाई भासणार नाही याची खबरदारी घेतल्याचे भरणे यांनी स्पष्ट केले.


दुष्काळाचा सामना करण्यासाठी तंत्रज्ञानाचा आधार


कमी पावसाच्या अंदाजामुळे कृषी विभागाने हवामान प्रतिरोधक बियाण्यांचा वापर, उताराला आडवी पेरणी आणि ‘बीबीएफ’ तंत्रावर भर देण्याचे ठरवले आहे. शेतकऱ्यांपर्यंत ही माहिती पोहोचवण्यासाठी ‘महाकृषी’ आणि ‘महाविस्तार’ ॲपसह सोशल मीडियाचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जात आहे. तसेच नुकसानग्रस्त १३६ लाख शेतकऱ्यांसाठी २० हजार १९६ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून, अलीकडील अवकाळी पावसाचे पंचनामेही युद्धपातळीवर सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

Comments
Add Comment

Baramati : बारामतीच्या सभेत मुख्यमंत्र्यांनी केला अजित पवारांच्या कार्याचा गौरव, सुनेत्रा पवारांसाठी केला जोरदार प्रचार

बारामती : अजित पवारांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या बारामती विधानसभा मतदारसंघात २३ एप्रिल रोजी पोटनिवडणूक

Kerala Massive Explosion : फटाक्यांच्या गोदामात भीषण स्फोट; ६ जणांचा मृत्यू

केरळच्या त्रिशूर जिल्ह्यातील मुंडाथिकोड गावात फटाक्यांच्या गोदामात भीषण आग आणि स्फोटाची घटना घडली आहे. या

Bihar Politics : नारी शक्ती अधिनियमाला विरोध करणाऱ्या खासदाराचे धक्कादायक वक्तव्य, महिलांचे राजकीय करिअर बेडपासून...

बिहारमधील एका अपक्ष खासदाराच्या वक्तव्याने संपूर्ण राजकारण तापलं आहे. नुकताच त्यांनी राजकारणातील महिला आणि

Marine Technology : आधुनिक सागरी तंत्रज्ञान महाराष्ट्रात आणणार; मंत्री नितेश राणे

मुंबई : राज्यातील सागरी वाहतूक व्यवस्था अधिक आधुनिक, सुरक्षित आणि प्रवासी-केंद्रित करण्याच्या दृष्टीने

Nitesh Rane : मांडवा-मरीना व रेवस-मांडवा जेट्टी कामांना गती द्या, मंत्री नितेश राणेंचे निर्देश

मुंबई : अलिबाग तालुक्यातील मांडवा मरीना जेट्टी विकास तसेच रेवस-मांडवा प्रवासी जेट्टी दुरुस्ती व मजबुतीकरणाच्या

Pandharpur : पंढरपूर विकास आराखड्याच्या कामास गती देणार, मुख्यमंत्र्यांची घोषणा

मुंबई : आषाढी वारी काळात निघणाऱ्या श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्ग व श्री संत तुकाराम महाराज पालखी