Strait of Hormuz : होर्मुझ सामुद्रधुनीत भारताच्या तेलवाहक जहाजांवर गोळीबार; इराणी सैन्य आणि IRGC च्या अधिकाऱ्यांमध्ये मतभेद ?

तेहरान : अमेरिका आणि इराण यांच्यात शस्त्रसंधी होण्याची शक्यता वाढल्यानंतर इराणने होर्मुझ सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली असल्याचे जाहीर केले होते. पण काही दिवसांतच पुन्हा एकदा इराणने होर्मुझ सामुद्रधुनी केली आहे. इराणकडून भारताच्या दोन तेलवाहक जहाजांच्या दिशेने गोळीबारही करण्यात आला. सुदैवाने इराणच्या गोळीबारात जीवितहानी अथवा वित्तहानी झालेली नाही. गोळीबाराच्या घटनेची भारत सरकारने गंभीर दखल घेतली. परराष्ट्र मंत्रालयाने इराणचे राजदूत मोहम्मद फथाली यांना बोलावून आपली चिंता व्यक्त केली. इराणच्या राजदूताने भारताचे म्हणणे आपल्या सरकारच्या कानी घालण्याचे आश्वासन दिले आहे. यानिमित्ताने पुन्हा एकदा इराणचेच होर्मुझ सामुद्रधुनीवर पूर्ण नियंत्रण असल्याचे तसेच होर्मुझमार्गे होणारी जलवाहतूक ही इराणच्या परवानगी आणि सहकार्याविना अशक्य असल्याचे सिद्ध झाले आहे.


इराण होर्मुझ सामुद्रधुनी खुली करणार नसेल तर अमेरिका बाहेरून कोंडी करून इराणमधून येणाऱ्या जहाजांना अडवेल असे अमेरिकेने जाहीर केले होते. प्रत्यक्षात अमेरिका त्यांच्या या प्रयत्नात अयशस्वी झाली आहे आणि इराण होर्मुझ सामुद्रनीवर नियंत्रण ठेवण्यात सातत्याने यशस्वी होताना दिसत आहे.


इराणचे परराष्ट्रमंत्री अब्बास अराघची यांनी होर्मुझ सामुद्रधुनी खुली करण्यात आली असून सर्व जहाजांची वाहतूक होईल असे जाहीर केले होते. तरी भारताच्या तेलवाहक जहाजांच्या दिशेने गोळीबार झाला. यामुळे इराणी सैन्य आणि IRGC च्या अधिकाऱ्यांमध्ये मतभेद असल्याची शक्यता व्यक्त होऊ लागली आहे.


अमेरिका आणि इस्रायलने इराणवर २८ फेब्रुवारी २०२६ रोजी हवाई हल्ले सुरू केले आणि पश्चिम आशियात युद्धाची ठिणगी पडली. इराणने होर्मुझ सामुद्रधुनी शत्रू देश आणि त्यांना युद्धात थेट मदत करणाऱ्यांना बंद केली. यानंतर ८ एप्रिल रोजी होर्मुझ सामुद्रधुनी फक्त दहा मिनिटांसाठी खुली करण्यात आली, नंतर पुन्हा बंद करण्यात आली. यानंतर थेट १७ एप्रिल रोजी इस्रायल-लेबनॉन शस्त्रसंधी झाल्यामुळे होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा सर्वांसाठी खुली करण्यात आल्याचे जाहीर करण्यात आले. पण इराणचे परराष्ट्र मंत्री, अब्बास अराघची यांनी एक्स (X) वर पोस्ट केले की लेबनॉनमध्ये झालेल्या शस्त्रसंधीनंतर होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा उघडली जात आहे. नेमक्या याच पोस्टमुळे गोंधळ झाला.





सरकारी निर्णयाची माहिती IRGC च्या अधिकाऱ्यांना मिळाली नाही अथवा त्यांची या निर्णयाला सहमती नव्हती. यामुळेच इराणचे परराष्ट्र मंत्री, अब्बास अराघची यांनी जाहीर करूनही IRGC च्या अधिकाऱ्यांनी होर्मुझ सामुद्रधुनी व्यावसायिक जलवाहतुकीसाठी खुली केलेली नाही. शिवाय होर्मुझमार्गे प्रवास करणाऱ्या जहाजांच्या दिशेने गोळीबार केला.


धक्कादायक म्हणजे भारताच्या दोन तेलवाहक जहाजांच्या दिशेने गोळीबार करण्यात आला. या गोळीबारात जीवितहानी अथवा वित्तहानी झालेली नाही. पण ज्या जहाजांवर गोळीबार झाला त्यातील एकात सुमारे २० दशलक्ष आणि दुसऱ्या जहाजात पाच दशलक्ष बॅरल कच्चे तेल आहे. मागे फिरा असा इशारा देत जहाजांच्या दिशेने गोळीबार करण्यात आला. थोडा गोळीबार होताच भारतीय जहाजांनी आधी परवानगी दिली होती याची आठवण करून दिली आणि मागे फिरण्याचा निर्णय घेतला. सध्या भारताची दोन्ही जहाजं सुरक्षित असून होर्मुझ सामुद्रधुनीतून बाहेर पडून भारताच्या दिशेने मार्गक्रमण करण्यासाठी कधी नव्याने परवानगी मिळते याची वाट बघत आहेत.

Comments
Add Comment

Ukraine's attack on Russia : रशियाच्या हृदयावर युक्रेनचा सर्वात मोठा हल्ला! मॉस्कोवर ड्रोनचा वर्षाव, तेल शुद्धीकरण प्रकल्पाला मोठे नुकसान

रशिया-युक्रेन युद्धाला चार वर्षांहून अधिक काळ उलटल्यानंतर युक्रेनने मॉस्कोवर आतापर्यंतचा सर्वात मोठा ड्रोन

Donald Trump vs Giorgia Meloni : डोनाल्ड ट्रम्प यांच्या दाव्यावर जॉर्जिया मेलोनी यांचे सडेतोड प्रत्युत्तर; "माझी लोकप्रियता तुमच्यावर अवलंबून नाही"

अमेरिकेचे अध्यक्ष (US President) डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी फ्रान्समध्ये झालेल्या जी-7 (G7 Summit) परिषदेदरम्यान इटलीच्या

काँगोमध्ये इबोलाचा कहर: ८९६ बाधित, २३२ जणांचा मृत्यू

युगांडाला यूएनकडून ४ दशलक्ष डॉलर्सची मदत किंशासा : डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ काँगो (डीआरसी)मध्ये इबोला विषाणूचा

Pakisthan : पाकिस्तानामध्ये दोन बॉम्बस्फोट, ७ ठार तर अनेक जखमी

इस्लामाबाद : पाकिस्तानच्या (Pakisthan)अशांत खैबर पख्तुनख्वा प्रांतातील बन्नू जिल्ह्यात शनिवारी रस्त्याच्या कडेला

PM Narendra Modi : भारत-फ्रान्स संबंध अधिक मजबूत; पॅरिसमध्ये PM मोदींचे मोठे वक्तव्य

पॅरिस : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी फ्रान्स (France) दौऱ्यादरम्यान पॅरिस (Paris) येथे भारतीय समुदायाशी संवाद

Pakistan Take Action In Bay of Bengal : चीनच्या मदतीने ५५ वर्षांनंतर बंगालच्या खाडीत पाकिस्तानची पुनरागमनाची तयारी; भारताची चिंता वाढणार?

इस्लामाबाद : १९७१ च्या भारत-पाकिस्तान युद्धातील पराभवानंतर बंगालच्या खाडीतून जवळपास पूर्णपणे माघार घेतलेल्या