Crime News : मागील वादातून युवकाचा कोयत्याने खून; दोघे संशयित ताब्यात

नाशिक : अंबड एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या महालक्ष्मी नगर परिसरात मागील वादाची कुरापत काढत एका युवकाचा निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. विशाल हिरवाळे असे मृत युवकाचे नाव असून या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी रात्री सुमारे साडेदहा वाजण्याच्या सुमारास दोन जणांनी जुन्या भांडणाच्या कारणावरून विशाल हिरवाळे याच्यावर कोयत्याने सपासप वार केले. गंभीर जखमी अवस्थेत त्याला उपचारासाठी नेण्यात आले; मात्र त्याचा मृत्यू झाला.


घटनेची माहिती मिळताच अंबड एमआयडीसी पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत पंचनामा करत तपास सुरू केला. या प्रकरणी पोलिसांनी दोन संशयितांना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडे कसून चौकशी सुरू आहे.


या हत्येमागील नेमके कारण आणि इतर कोणाचा सहभाग आहे का याचा तपास पोलीस करत आहेत. दरम्यान, या घटनेमुळे महालक्ष्मी नगर परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Comments
Add Comment

BCCI SQUAD ANNOUNCE : श्रीलंका दौऱ्यासाठी भारत अ संघाची घोषणा, तिलक वर्मा नवीन कर्णधार !

आयपीएल २०२६ आता अखेरच्या टप्प्यात आहे. २०२६ हंगामाचा अखेरचा सामना ३१ मे रोजी होणार आहे. याच दरम्यान BCCI ने

टँक पाखाडी मार्ग आणि हाफिज अली खान मार्गावरील अनधिकृत फेरीवाले, गॅरेज व भंगार विक्रेत्‍यांवर BMC ची कारवाई

मुंबई (विशेष प्रतिनिधी) :  ‘ई’ विभाग अंतर्गत प्रभाग क्रमांक २१२ मधील वॉटर स्‍ट्रीट कॉर्नर, टँक पाखाडी मार्ग व

मुंबई क्लायमेंट वीकच्या निष्पत्ती व परिणामकारकता अहवालाचे; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रकाशन

 दुसरा ‘मुंबई क्लायमेट वीक’ फेब्रुवारी २०२७ मध्ये होणार मुंबई : हवामान बदलाच्या प्रश्नांवर जागतिक स्तरावरील

महाराष्ट्राला भारत-आफ्रिका सहयोगाचे जागतिक केंद्र बनवण्यासाठी

सिडकोतर्फे महत्त्वपूर्ण आफ्रिका भारत व्यापार केंद्र (एआयबीसी) प्रस्तावित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या

Minister Nitesh Rane : मुंबईच्या डीएनएमध्येच हिंदुत्व, मंत्री नितेश राणेंचे वक्तव्य

मंत्री नितेश राणे; धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदानामुळे हिंदूंची ओळख टिकली मुंबई : "धर्मवीर छत्रपती

विदर्भासाठी ५५० कि.मी.च्या चार महामार्गांना मंजुरी

पायाभूत सुविधा समितीच्या बैठकीत निर्णय; दोन वर्षांत काम पूर्ण करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश मुंबई :