Chitra Wagh : महिलांवर अत्याचार करणाऱ्यांना उद्ध्वस्त करणार, चित्रा वाघ कडाडल्या

नाशिक : महिलांवर अत्याचार करणाऱ्यांना उद्ध्वस्त केल्याशिवाय हे सरकार स्वस्थ बसणार नाही. तपास पथक आरोपींविरोधात जास्तीत जास्त ठोस पुरावे गोळा करण्यात गुंतले आहे. जर आपल्याला काही माहिती असेल अथवा तक्रार करायची असेल तर थेट पोलिसांना माहिती द्या, असे भाजप आमदार चित्रा वाघ म्हणाल्या. त्यांनी अशोक खरात आणि नाशिक टीसीएस प्रकरणात दोषींवर कठोरात कठोर कारवाई व्हावी यासाठी सरकार कायद्याच्या चौकटीत राहून आवश्यक ते काम करत असल्याचे सांगितले.


सरकारी, निमसरकारी, खासगी अशा प्रत्येक आस्थापनेत शोषण होत असल्यास तक्रार करण्यासाठी आणि त्या तक्रारीची दखल घेऊन निःपक्षपाती चौकशी करून अहवाल देण्यासाठी समिती आवश्यक आहे. समितीने दोषी ठरवलेल्यांवर आस्थापनेकडून तातडीने कारवाई होणे आवश्यक आहे. आवश्यक तिथे पुढे जाऊन कायदेशीर कारवाईसाठी पोलिसांत तक्रार नोंदवणेही आवश्यक आहे. पण टीसीएस सारख्या अनेक खासगी आस्थापनांमध्ये तक्रारींची दखल घेऊन कारवाई करण्यासाठी समिती नाही किंवा असली तर ती समिती निःपक्षपाती नाही. यामुळे महिला तक्रार करणे टाळतात. काही वेळा नोकरी जाण्याच्या भीतीने तक्रार टाळली जाते. प्रामुख्याने खासगी आस्थापनेत नोकरी टिकवण्यासाठी तक्रार टाळण्याचे प्रकार घडतात. यावर ठोस उपाय करणे आवश्यक आहे. बदलत्या कार्यालयीन संस्कृतीचा आणि तंत्रज्ञानाचा विचार करून कायद्यांमध्ये दुरुस्तीची आवश्यकता आहे. या संदर्भात लवकरच तज्ज्ञांशी चर्चा करून सरकारी पातळीवर आवश्यक तो निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन भाजप आमदार चित्रा वाघ यांनी दिले.


आस्थापन सरकारी, निमसरकारी, खासगी अशा कोणत्याही प्रकारचे असू दे... तिथे आलेल्या तक्रारीची एक नोंद सरकारकडे व्हायला हवी. तक्रारीवर ९० दिवसांत निर्णय दिला नाही तर समितीवरच दंडाची तरतूद हवी. महिला - पुरुष यापैकी कोणीही असतील त्यांना कार्यालयात अथवा वर्क फ्रॉम होम करताना शोषणाला सामोरे जावे लागले. थेट बोलून अथवा कृती करून किंवा डिजिटल संवादातून (WhatsApp, Email) वा आस्थापनाशी संबंधित कार्यक्रम, बैठक, सहल अशा ठिकाणी शोषणाला सामोरे जावे लागल्यास तक्रार करण्याची आणि त्यावर आवश्यक ती कारवाई करण्याची व्यवस्था हवी. यासाठी तक्रारीची दखल घेऊन निःपक्षपाती चौकशी करून अहवाल देणारी समिती प्रत्येक आस्थापनेत हवी. समितीने दोषी ठरवलेल्या व्यक्तीवर आस्थापन व्यवस्थापनाने कारवाई करणे आणि आवश्यकता भासल्यास पोलीस कारवाई करणे आवश्यक आहे. या सगळ्याकरिता कायद्यात दुरुस्ती करणे आवश्यक आहे, एका SOP चीही गरज आहे. लवकरच या संदर्भात मुख्यमंत्र्यांना भेटून त्यांच्यापुढे हा विषय सविस्तर मांडणार असल्याचे संकेत चित्रा वाघ यांनी दिले.


राज्यात महिला आयोगाचे पद रिक्त असले तरी अधिकारी काम करत आहेत. राज्याच्या महिला आयोगाचे अध्यक्षपद राष्ट्रवादीकडे आहे. बारामतीच्या निवडणुकीनंतर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार हा प्रश्न लवकरच सोडवतील असेही चित्रा वाघ म्हणाल्या. अशोक खरात आणि नाशिक टीसीएस प्रकरणी तपास सुरू आहे. दोषींवर कठोर कारवाई व्हावी यासाठी सरकार कायद्याच्या चौकटीत राहून आवश्यक ते काम करत असल्याचे चित्रा वाघ यांनी सांगितले. महिलांचे शोषण करणाऱ्या आरोपींना सोडणार नाही, अशी ग्वाही चित्रा वाघ यांनी दिली.


महिला आरक्षण प्रश्नावरही चित्रा वाघ बोलल्या. काँग्रेस आणि शरद पवारांच्या पक्षाने महिला आरक्षणाशी संबंधित विधेयकाला संसदेत विरोध केला असे चित्रा वाघ यांनी सांगितले. महिला आरक्षण विधेयक पडणे ही दुःखद घटना आहे. ही घटना घडली तो दिवस देशातील महिलांसाठी काळा दिवस होता. देशातील मातृशक्तीचा हक्क हिरावला गेला. आरक्षणाची तरतूद झाली असती तर विरोधी गटातील महिलांनाही फायदा झाला असता असे चित्रा वाघ म्हणाल्या.

Comments
Add Comment

Ahilyanagar : जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीला उच्च न्यायालयात आव्हान ; निवडणूक प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह, राजकीय वातावरण तापले

अहिल्यानगर (राहुरी प्रतिनिधी) : अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (Ahilyanagar District Central Cooperative Bank) होवू घातलेल्या

Ahilyanagar : श्रीरामपूरमध्ये स्थानिक गुन्हे शाखेची सलग दुसऱ्या दिवशी मोठी कारवाई; एमडी तस्कर जेरबंद, अडीच लाखांचा मुद्देमाल जप्त

अहिल्यानगर (श्रीरामपूर) : श्रीरामपूर शहरात अंमली पदार्थांविरोधात स्थानिक गुन्हे शाखेने सलग दुसऱ्या दिवशी मोठी

Ketan Agrawal Murder Case : 'मला त्याला स्लो पॉयझन देऊन मारायचं होतं..';केतन हत्याकांड प्रकरणातील 'त्या' गुप्त कटामागचा मास्टरमाइंड कोण?

केतन अग्रवाल हत्याकांडात धक्कादायक दावा; 'स्लो पॉयझन' देण्याचाही कट असल्याची तपासात चर्चा पुणे : केतन

Minister Radhakrishna Vikhe Patil : मतदार यादीत घुसखोरांना जागा नाही ; पुनरिक्षण मोहिमेत कार्यकर्त्यांनी पुढे या : ना. राधाकृष्ण विखे पाटील

Ahilyanagar (Shevgaon) : मतदार यादीची सखोल पुनरिक्षण मोहीम भविष्याच्या दृष्टीने महत्वपूर्ण आहे.सरकारी स्तरावर काम सुरू असले

Wardha Murder : वर्ध्यात काळजाचा थरकाप उडवणारी घटना! 12 वर्षांच्या मुलीची दगडाने ठेचून निर्घृण हत्या; नराधमांनी ओलांडल्या क्रूरतेच्या सर्व सीमा

वर्धा : वर्धा  (wardha) जिल्ह्यातील रोठा गावातून एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली

Pune Metro : पुणेकरांसाठी गुड न्यूज! हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रोला नवा मुहूर्त; वाहतूक कोंडीतून लवकरच सुटका!

पुणे : पुण्यातील ट्रॅफिक जॅम, विशेषतः हिंजवडी आयटी पार्क परिसरात होणाऱ्या रोजच्या वाहतूक कोंडीने त्रस्त