New Law : जमीनधारक होणार विकास प्रक्रियेत भागीदार

मुंबई : मुंबई महानगर प्रदेशाचा चेहरामोहरा बदलणाऱ्या ‘मुंबई ३.०’ या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) जमीन संपादनात क्रांतीकारी पाऊल उचलले आहे. पारंपारिक जमीन संपादन प्रक्रियेत बदल करीत, एमएमआरडीएने देशात पहिल्यांदाच ‘सहभागातून विकास’ (पार्टिसिपेटरी मॉडेल) हे धोरण लागू केले असून, याद्वारे जमीनधारकांना केवळ मोबदला न देता त्यांना विकास प्रक्रियेत थेट भागीदार करून घेतले जाणार आहे.





अटल बिहारी वाजपेयी शिवडी-न्हावा शेवा अटल सेतूच्या प्रभाव क्षेत्रात (एनटीडीए) हे नवे शहर उभारले जात आहे. रायगड जिल्ह्यातील उरण, पनवेल आणि पेण या तीन तालुक्यांमधील १२४ गावांच्या सुमारे ३२३ चौ.कि.मी. क्षेत्राचा यात समावेश आहे. जमीनधारकांच्या गरजा लक्षात घेऊन एमएमआरडीएने तीन पर्याय दिले आहेत. पहिल्या पर्यायात महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम, १९६६ नुसार कराराद्वारे परस्पर संमतीने भरपाई घेता येईल. दुसऱ्या पर्यायात अतिरिक्त प्रोत्साहनासह विकास हक्क (एफएसआय/टीडीआर) स्वीकारता येतील. तर तिसरा आणि सर्वाधिक महत्त्वाचा पर्याय म्हणजे ‘भूमी संकलन मॉडेल’. यात मूळ जमिनीच्या बदल्यात २२.५ टक्के विकसित भूखंड परत दिला जाणार आहे. उरण आणि पनवेलमधील भूधारकांना उरणमध्ये, तर पेणमधील भूधारकांना पेणमध्येच हे भूखंड दिले जातील, जेणेकरून भविष्यातील मूल्यवाढीचा लाभ मूळ मालकांना मिळेल.


अटल सेतूच्या कनेक्टिव्हिटीमुळे या परिसराच्या विकासाला मोठी गती मिळणार आहे. मुंबईबाहेरील क्षेत्रांचा संतुलित विकास आणि नियोजनबद्ध शहरी परिसंस्था निर्माण करण्यावर प्राधिकरणाचा भर आहे. या प्रक्रियेत पारदर्शकता राखण्यासाठी २७ एप्रिल २०२६ पासून ऑनलाईन संमती नोंदविण्याची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. आधारकार्ड आणि जमिनीच्या कागदपत्रांच्या आधारे भूधारक या प्रक्रियेत सहभागी होऊ शकतील. भूसंपादनाच्या पारंपरिक चौकटीला छेद देणारे हे मॉडेल भविष्यात देशासाठी मार्गदर्शक ठरेल, असा विश्वास व्यक्त होत आहे.


.....................




मुंबई ३.० घडवताना आम्ही लोककेंद्रित दृष्टिकोनाला प्राधान्य दिले आहे. शहरनिर्मिती म्हणजे काँक्रीटचे जंगल नसून नागरिकांचा सहभाग ही त्याची खरी शक्ती आहे. जमीनधारकांना विविध पर्याय देऊन आम्ही त्यांना निर्णयाचे स्वातंत्र्य दिले आहे. - डॉ. संजय मुखर्जी, महानगर आयुक्त, एमएमआरडीए


Comments
Add Comment

Water Storage in Mumbai : जुलैच्या सरींकडे मुंबईकरांच्या नजरा खिळल्या, तलावांत केवळ ८.५ टक्के पाणीसाठा; २० ऑगस्टपर्यंत पुरेल पाणी

मुंबई  : मुंबईत मंगळवारपासून पुढील तीन दिवस पाऊस पडेल. मात्र, हा पाऊस पडला तरी तो ३० जूनपर्यंत या संपूर्ण

IAS Transfer : पी. वेलरासू यांच्यासह तीन वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या

मुंबई : राज्य सरकारने सोमवारी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, अन्न व नागरी पुरवठा विभाग आणि महापारेषणमधील

Chandrakant Patil : पॉलीटेक्निक प्रवेश अर्जासाठी 2 जुलैपर्यंत मुदतवाढ; 1.45 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांची नोंदणी

 उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील मुंबई,  : प्रथम वर्ष पदविका अभियांत्रिकी (पॉलीटेक्निक)

Monsoon Update : मान्सूनच्या प्रगतीमुळे राज्यात आनंदाचे वातावरण

मुंबई : बहुप्रतिक्षित मान्सूनने अखेर दोन आठवड्यांच्या विलंबानंतर पुन्हा एकदा महाराष्ट्रात पुढे वाटचाल सुरू

Temple Endowment Law : नवा देवस्थान इनाम जमीन कायदा सर्वंकष न्याय देणारा असेल, महसूलमंत्र्यांनी व्यक्त केला विश्वास

मुंबई : राज्यातील देवस्थान इनाम जमिनींचे संवर्धन करण्यासह वर्षानुवर्षे प्रलंबित असलेले समस्या मार्गी

Bangladeshi infiltrators : अडीच वर्षांत महाराष्ट्रातून ३ हजार ५४१ बांगलादेशी घुसखोरांची हकालपट्टी

मुंबई : वर्ष २०२४ पासून आजपर्यंत म्हणजेच गेल्या अडीच वर्षांच्या कालावधीत महाराष्ट्रातून