ATS : केंद्र सरकारच्या एका निर्णयामुळे राज्यातील लाखो वाहतूक व्यावसायिकांना दिलासा

मुंबई : 'एटीएस' (ऑटोमॅटिक टेस्टिंग स्टेशन) प्रणालीतील तांत्रिक बदलांमुळे रखडलेली वाहन परवाना नूतनीकरण प्रक्रिया आता पुन्हा मार्गी लागणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या विनंतीनुसार केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी या प्रक्रियेला ऑक्टोबर २०२६ अखेरपर्यंत मुदतवाढ दिली आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे राज्यातील रिक्षा, टेम्पो आणि स्कूलबससह सुमारे १५ लाख व्यावसायिक वाहतूकदारांना मोठा दिलासा मिळाला आहे.


राज्यात राबविण्यात येत असलेल्या अद्ययावत 'एटीएस' प्रणालीमुळे गेल्या काही काळापासून व्यावसायिक वाहनांच्या परवान्यांचे नूतनीकरण पूर्णतः बंद झाले होते. विशेषतः राज्यातील ११ महत्त्वाच्या आरटीओ क्षेत्रांतील कामकाजावर याचा मोठा परिणाम झाला होता. परवाना नूतनीकरण रखडल्याने रिक्षाचालकांपासून ते स्कूलबस मालकांपर्यंत सर्वांनाच कायदेशीर अडचणींना आणि आर्थिक दंडाला सामोरे जावे लागत होते.


या समस्येचे गांभीर्य ओळखून केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी हा विषय केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे लावून धरला होता. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी तातडीने नितीन गडकरी यांना पत्र लिहून एटीएस प्रणालीतील तांत्रिक अडचणी दूर होईपर्यंत नूतनीकरण प्रक्रियेला मुदतवाढ देण्याची विनंती केली होती. या विनंतीचा सकारात्मक विचार करत केंद्राने मुदतवाढीचा निर्णय घेतला आहे.


कुणाला होणार फायदा?


- रिक्षा व टॅक्सी चालकांच्या मुदत संपलेल्या परवान्यांमुळे होणारी कारवाई टळणार.


- शैक्षणिक वर्ष सुरू होत असताना स्कूलबस आणि टेम्पो परवाना प्रक्रियेतील अडथळा दूर.


- ११ आरटीओ क्षेत्रातील रखडलेली हजारो प्रकरणे निकाली काढण्यास मिळणार वेळ.

Comments
Add Comment

Mumbai Bandra road accident : मुंबईत भरधाव इनोव्हाने मुलाला चिरडलं, लहानग्याच्या छातीवर चालवली गाडी

मुंबई : मुंबईतून अपघाताची बातमी आली आहे. भरधाव इनोव्हा गाडीने नऊ वर्षांच्या मुलाला चिरडले. मेहबूब स्टुडिओ जवळ हा

Indian Railway : रेल्वे प्रवाशांनो लक्ष द्या! स्टेशनवर थुंकणे, कचरा टाकणे आता महागात पडणार; थेट ₹१,००० दंड

मुंबई : रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी आहे. रेल्वे स्थानक किंवा परिसरात अस्वच्छता

Mumbai Parelcha Maharaja : परळच्या महाराजाच्या आगमन मिरवणुकीत विजेच्या खांबाला आग; भाविकांमध्ये एकच घबराट  

Mumbai : मुंबईत आगामी गणेशोत्सवाचा उत्साह आता पुरेसा शिगेला पोहोचला असून, शनिवारी पार पडलेल्या 'परळचा महाराजा' आणि

Mumbai Airport : मुंबई आणि नवी मुंबईतील विमान प्रवाशांसाठी बदलणार हवाई प्रवासाचं नियोजन

मुंबई : मुंबईतील विमान प्रवाशांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. विमानतळावरील टर्मिनस १ च्या पुनर्विकास

Mumbai Crime : शिक्षकाच्या फोटोचा सोशल मीडियावर गैरवापर, मुंबईच्या महापौरांशी जोडलं नाव; गुन्हा दाखल

मुंबई : मुंबईच्या महापौर ऋतू तावडे (Ritu Tawde) यांचे पती असल्याचा खोटा दावा करत एका फोटोग्राफी शिक्षकाची बदनामी करणारा

Free ST Travel : आनंदाची बातमी! गणेशोत्सवासाठी चाकरमान्यांना मोफत एसटी प्रवास; जाणून घ्या कोणत्या मार्गांवर धावणार विशेष बस?

मुंबई : गणेशोत्सवासाठी मुंबई आणि उपनगरातून आपल्या गावी जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे.