ATS : केंद्र सरकारच्या एका निर्णयामुळे राज्यातील लाखो वाहतूक व्यावसायिकांना दिलासा

मुंबई : 'एटीएस' (ऑटोमॅटिक टेस्टिंग स्टेशन) प्रणालीतील तांत्रिक बदलांमुळे रखडलेली वाहन परवाना नूतनीकरण प्रक्रिया आता पुन्हा मार्गी लागणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या विनंतीनुसार केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी या प्रक्रियेला ऑक्टोबर २०२६ अखेरपर्यंत मुदतवाढ दिली आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे राज्यातील रिक्षा, टेम्पो आणि स्कूलबससह सुमारे १५ लाख व्यावसायिक वाहतूकदारांना मोठा दिलासा मिळाला आहे.


राज्यात राबविण्यात येत असलेल्या अद्ययावत 'एटीएस' प्रणालीमुळे गेल्या काही काळापासून व्यावसायिक वाहनांच्या परवान्यांचे नूतनीकरण पूर्णतः बंद झाले होते. विशेषतः राज्यातील ११ महत्त्वाच्या आरटीओ क्षेत्रांतील कामकाजावर याचा मोठा परिणाम झाला होता. परवाना नूतनीकरण रखडल्याने रिक्षाचालकांपासून ते स्कूलबस मालकांपर्यंत सर्वांनाच कायदेशीर अडचणींना आणि आर्थिक दंडाला सामोरे जावे लागत होते.


या समस्येचे गांभीर्य ओळखून केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी हा विषय केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे लावून धरला होता. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी तातडीने नितीन गडकरी यांना पत्र लिहून एटीएस प्रणालीतील तांत्रिक अडचणी दूर होईपर्यंत नूतनीकरण प्रक्रियेला मुदतवाढ देण्याची विनंती केली होती. या विनंतीचा सकारात्मक विचार करत केंद्राने मुदतवाढीचा निर्णय घेतला आहे.


कुणाला होणार फायदा?


- रिक्षा व टॅक्सी चालकांच्या मुदत संपलेल्या परवान्यांमुळे होणारी कारवाई टळणार.


- शैक्षणिक वर्ष सुरू होत असताना स्कूलबस आणि टेम्पो परवाना प्रक्रियेतील अडथळा दूर.


- ११ आरटीओ क्षेत्रातील रखडलेली हजारो प्रकरणे निकाली काढण्यास मिळणार वेळ.

Comments
Add Comment

MahaCare : महाकेअरच्या माध्यमातून राज्यात जागतिक दर्जाच्या कर्करोग उपचार सुविधा; नागपुरात हाय एनर्जी मेडिकल सायक्लोट्रॉन प्रकल्पाला मंजुरी

मुंबई : राज्यातील कर्करोग रुग्णांना जागतिक दर्जाचे उपचार आणि संशोधन सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र

Devendra Fadnavis : आता शाळेत मिळणार 'ड्रग्ज'च्या दुष्परिणामांचे धडे

मख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश; अंमली पदार्थमुक्त महाराष्ट्र व्यूहरचना आणि कृती योजनेबाबत

Central Railway : कर्जत-लोणावळा रेल्वे मार्ग पूर्णपणे पूर्ववत; 17 जुलैपासून अनेक एक्सप्रेस गाड्या पुन्हा मूळ मार्गावर

मुंबई : कर्जत-लोणावळा (Karjat lonavala) दरम्यानच्या मध्य रेल्वेच्या दक्षिण-पूर्व डाऊन मार्गावरील रेल्वे सेवा पूर्णपणे

Transformation of railway stations : पंतप्रधान मोदी उद्या ७५ स्थानके राष्ट्राला करणार समर्पित; 'अमृत भारत' योजनेचा वेग वाढला

मुंबई: रेल्वे प्रवाशांना जागतिक दर्जाच्या सुविधा मिळाव्यात आणि स्थानकांचे रूप पालटावे, या उद्देशाने

Pratap Sarnaik : ओला, उबरसह सर्व कंपन्यांना आता राज्य सरकारचा परवाना बंधनकारक

महाराष्ट्राचे नवे ॲग्रीगेटर धोरण लागू; रिक्षा टॅक्सीप्रमाणे चालकांना बॅच बंधनकारक मुंबई : महाराष्ट्रातील

Devendra Fadnavis : महाराष्ट्राला सर्वाधिक सुलभ शासकीय सेवा देणारे राज्य बनवा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; गव्हर्नन्स प्रोसेस रि-इंजिनियरिंग संदर्भात तिसऱ्या टप्प्याची बैठक मुंबई : राज्य