ATS : केंद्र सरकारच्या एका निर्णयामुळे राज्यातील लाखो वाहतूक व्यावसायिकांना दिलासा

मुंबई : 'एटीएस' (ऑटोमॅटिक टेस्टिंग स्टेशन) प्रणालीतील तांत्रिक बदलांमुळे रखडलेली वाहन परवाना नूतनीकरण प्रक्रिया आता पुन्हा मार्गी लागणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या विनंतीनुसार केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी या प्रक्रियेला ऑक्टोबर २०२६ अखेरपर्यंत मुदतवाढ दिली आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे राज्यातील रिक्षा, टेम्पो आणि स्कूलबससह सुमारे १५ लाख व्यावसायिक वाहतूकदारांना मोठा दिलासा मिळाला आहे.


राज्यात राबविण्यात येत असलेल्या अद्ययावत 'एटीएस' प्रणालीमुळे गेल्या काही काळापासून व्यावसायिक वाहनांच्या परवान्यांचे नूतनीकरण पूर्णतः बंद झाले होते. विशेषतः राज्यातील ११ महत्त्वाच्या आरटीओ क्षेत्रांतील कामकाजावर याचा मोठा परिणाम झाला होता. परवाना नूतनीकरण रखडल्याने रिक्षाचालकांपासून ते स्कूलबस मालकांपर्यंत सर्वांनाच कायदेशीर अडचणींना आणि आर्थिक दंडाला सामोरे जावे लागत होते.


या समस्येचे गांभीर्य ओळखून केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी हा विषय केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे लावून धरला होता. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी तातडीने नितीन गडकरी यांना पत्र लिहून एटीएस प्रणालीतील तांत्रिक अडचणी दूर होईपर्यंत नूतनीकरण प्रक्रियेला मुदतवाढ देण्याची विनंती केली होती. या विनंतीचा सकारात्मक विचार करत केंद्राने मुदतवाढीचा निर्णय घेतला आहे.


कुणाला होणार फायदा?


- रिक्षा व टॅक्सी चालकांच्या मुदत संपलेल्या परवान्यांमुळे होणारी कारवाई टळणार.


- शैक्षणिक वर्ष सुरू होत असताना स्कूलबस आणि टेम्पो परवाना प्रक्रियेतील अडथळा दूर.


- ११ आरटीओ क्षेत्रातील रखडलेली हजारो प्रकरणे निकाली काढण्यास मिळणार वेळ.

Comments
Add Comment

Prajakta Lavangare : महिला आणि बालकांच्या आरोग्याच्या दृष्टीने अधिक प्रभावी सुविधा देण्यासाठी उपाययोजना करा

सार्वजनिक आरोग्य विभागाच्या कामकाजाचा, सुविधांचा अतिरिक्त आयुक्तांकडून आढावा मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या

MPSC Exam : MPSC परीक्षेत मोठा बदल, आता २१ दिवसांत निकाल येणार

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या भरती प्रक्रियेत मोठा बदल; पूर्व परीक्षा आता CBT पद्धतीने महाराष्ट्र लोकसेवा

Lokmanya Tilak road fire : लोकमान्य टिळक रोडवर आग; परिसरातील नागरिकांची पळापळ!

मुंबई : मुंबईत आगीच्या सत्रामुळे खळबळ उडाली असून, शुक्रवारी दादरच्या (Dadar) लोकमान्य टिळक रोडवर (Lokmanya Tilak Road) आगीची

Aarey Road : गोरेगाव आरे भास्कर रस्त्यांची तात्पुरती डागडुजी

स्थानिक नगरसेविकेने रस्ता खचण्याची वर्तवली भीती पावसाळ्यात पूर्वस्थितीत रस्ता आणून देताना घेतली नाही

Mumbai Police : मुंबई पोलीस अधिकारी संभाजी गुरव यांची मोठी कामगिरी; उत्तर अमेरिकेतील सर्वोच्च डेनाली शिखर सर

मुंबई : मुंबई पोलीस दलात कार्यरत असलेले पोलीस निरीक्षक संभाजी गुरव ( Sambhaji Gurav) यांनी उत्तर अमेरिकेतील सर्वोच्च माउंट

Suicide News: धक्कादायक! वरळी सी लिंकवरून समुद्रात उडी; ठाण्यातील व्यावसायिकाचा मृत्यू

मुंबई : मुंबईतील (Mumbai) वरळी सी लिंकवरून (Worli Sea Link) एका व्यक्तीने समुद्रात उडी घेतल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.