Corporate Jihad : कॉर्पोरेट जिहादवर काय म्हणाले मंत्री नितेश राणे ?

पिंपळगाव बसवंत : जबरदस्तीने नमाज पढायला लावणे आणि धर्मांतरासाठी दबाव टाकल्याच्या अधिकृत तक्रारी प्राप्त झाल्या असून, यासंदर्भात काही पुरावेही समोर आले आहेत. या प्रकरणाचा पोलिसांकडून तपास सुरू आहे. “चुकी करणाऱ्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे असे मंत्री नितेश राणे म्हणाले. नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव बसवंत येथील विराट हिंदू संमेलनानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. घरच्यांनीही चुकीला साथ देऊ नये,” असे ते म्हणाले.



सर्व पुरावे टप्प्याटप्प्याने समोर येत असून संबंधित विभाग तपास करत आहेत. निदा खान प्रकरणावर भाष्य करत त्यांनी काही घटनांशी संबंधित दुव्यांचा उल्लेख केला असून याबाबत अधिक तपास होणे आवश्यक असल्याचे नमूद केले. टाटा ग्रुप कंपनी जबाबदार असल्याचे सांगितले आणि अशा प्रकारच्या घटना घडू नयेत, चुका झाल्यास त्या सुधारल्या पाहिजेत. पीडितांना आवाहन करताना राणे म्हणाले की अनेक तक्रारी प्राप्त झाल्या असून त्या पोलिसांकडे पाठवण्यात येत आहेत. प्रत्येक तक्रारीची सखोल चौकशी केली जाईल आणि संबंधितांकडे असलेले पुरावे पोलिसांना द्यावेत, असे त्यांनी सांगितले. दरम्यान, उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करत त्यांनी सध्याचे सरकार कायद्याच्या चौकटीत काम करत असल्याचे सांगितले. रॅली विरोधाच्या मुद्द्यावरही त्यांनी प्रतिक्रिया देत कायद्याचे पालन करण्याचा इशारा दिला.


मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत बोलताना राणे म्हणाले की, “चुकीला चूक आणि योग्यला योग्य म्हणण्याची आमची भूमिका आहे. कोणतीही तडजोड केली जाणार नाही. दोषींना कठोर शिक्षा होणार असल्याचेही राणे यांनी स्पष्ट केले. अशोक खरतचा विषय असू दे नाहीतर टीसीएसचा जे दोषी असतील त्यांना कायद्यानुसार शिक्षा होणारच, अशी ग्वाही मंत्री नितेश राणेंनी दिली.

Comments
Add Comment

TET exam : टीईटी परीक्षेत सीसीटीव्हीमध्ये चेहरा दिसणे बंधनकारक

टीईटी परीक्षेत सीसीटीव्हीमध्ये चेहरा दिसणे बंधनकारक बुरखा, दुपट्टा किंवा ओढणीला बंदी नाही- राज्य परीक्षा

Vilas Ghule : विलास घुले हत्या प्रकरणावरून धनंजय मुंडेंचा सवाल; निष्पक्ष तपासाची मागणी

बीड : बीड (Beed) जिल्ह्यातील केज तालुक्यातील विलास घुले (Vilas Ghule) हत्या प्रकरणावरून (Murder) माजी मंत्री आणि आमदार धनंजय मुंडे

Monsoon Update : जून महिन्यात पाऊस पडणार नाही ; या तारखेपासून कोसळणार मुसळधार पाऊस

महाराष्ट्र : महाराष्ट्रामध्ये काही भागात पावसाने जोरदार हजेरी लावली. २३ आणि २५ जूनला मुंबईसह इतर शहरात मुसळधार

Ketan Agarwal Murder Case: "म्हणून मी त्याला लोहगडावरून खाली ढकललं..." सियाने पोलिसांसमोर सर्वचं सांगितलं

केतनच्या हत्येमागचं सर्वात भयंकर कारण आलं समोर Ketan Agarwal Murder Case : पुणे : पुण्यातील उद्योगपती केतन अग्रवाल (Ketan Agarwal Murder)

आषाढी वारीसाठी रेल्वेची खास भेट; पंढरपूरसाठी धावणार विशेष गाड्या, जाणून घ्या वेळापत्रक

आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी मध्य रेल्वेने विशेष गाड्यांची घोषणा केली

Maharashtra Infrastructure : मुंबई आणि नागपूरसाठी मोठा निर्णय; दोन महत्त्वाच्या वाहतूक प्रकल्पांना राज्य सरकारची मंजुरी

राज्यातील वाहतूक व्यवस्था अधिक वेगवान आणि सुलभ करण्यासाठी राज्य सरकारने दोन महत्त्वाच्या पायाभूत सुविधा