Corporate Jihad : कॉर्पोरेट जिहादवर काय म्हणाले मंत्री नितेश राणे ?

पिंपळगाव बसवंत : जबरदस्तीने नमाज पढायला लावणे आणि धर्मांतरासाठी दबाव टाकल्याच्या अधिकृत तक्रारी प्राप्त झाल्या असून, यासंदर्भात काही पुरावेही समोर आले आहेत. या प्रकरणाचा पोलिसांकडून तपास सुरू आहे. “चुकी करणाऱ्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे असे मंत्री नितेश राणे म्हणाले. नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव बसवंत येथील विराट हिंदू संमेलनानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. घरच्यांनीही चुकीला साथ देऊ नये,” असे ते म्हणाले.



सर्व पुरावे टप्प्याटप्प्याने समोर येत असून संबंधित विभाग तपास करत आहेत. निदा खान प्रकरणावर भाष्य करत त्यांनी काही घटनांशी संबंधित दुव्यांचा उल्लेख केला असून याबाबत अधिक तपास होणे आवश्यक असल्याचे नमूद केले. टाटा ग्रुप कंपनी जबाबदार असल्याचे सांगितले आणि अशा प्रकारच्या घटना घडू नयेत, चुका झाल्यास त्या सुधारल्या पाहिजेत. पीडितांना आवाहन करताना राणे म्हणाले की अनेक तक्रारी प्राप्त झाल्या असून त्या पोलिसांकडे पाठवण्यात येत आहेत. प्रत्येक तक्रारीची सखोल चौकशी केली जाईल आणि संबंधितांकडे असलेले पुरावे पोलिसांना द्यावेत, असे त्यांनी सांगितले. दरम्यान, उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करत त्यांनी सध्याचे सरकार कायद्याच्या चौकटीत काम करत असल्याचे सांगितले. रॅली विरोधाच्या मुद्द्यावरही त्यांनी प्रतिक्रिया देत कायद्याचे पालन करण्याचा इशारा दिला.


मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत बोलताना राणे म्हणाले की, “चुकीला चूक आणि योग्यला योग्य म्हणण्याची आमची भूमिका आहे. कोणतीही तडजोड केली जाणार नाही. दोषींना कठोर शिक्षा होणार असल्याचेही राणे यांनी स्पष्ट केले. अशोक खरतचा विषय असू दे नाहीतर टीसीएसचा जे दोषी असतील त्यांना कायद्यानुसार शिक्षा होणारच, अशी ग्वाही मंत्री नितेश राणेंनी दिली.

Comments
Add Comment

Transfer : जी. श्रीकांत छत्रपती संभाजीनगरचे नवे विभागीय आयुक्त

चार वरिष्ठ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या; जितेंद्र पापळकर यांची जीएसटी विभागात नियुक्ती मुंबई : राज्य शासनाने

Animal Beauty Parlor : तुम्हाला माहित आहे का? या गावाने चक्क सुरु केलंय, महाराष्ट्रात जनावरांच पाहिलं ब्युटी पार्लर; जाणून घ्या सविस्तर

सातारा : महाराष्ट्रातील गावं आता सुजलाम आणि सुफलाम होण्याच्या दिशेने आपली पाऊले उचलत आहेत. शासनाच्या अनेक योजना

Nanded News : नांदेड हादरले! नाल्यातील साचलेल्या पाण्यात बुडून ४ शाळकरी मुलांचा दुर्दैवी मृत्यू

नांदेड : नांदेड शहरातून एक अत्यंत हृदयद्रावक आणि मन सुन्न करणारी घटना समोर आली आहे. शहरातील देगलूर नाका परिसरातील

Amravati Crime News : मित्राची रूम, दोन मुली अन् कॅमेऱ्याचं जाळं; परतवाडा व्हायरल व्हिडिओ प्रकरणात अयान अहमदच्या 'त्या' कृत्याचा पोलिसांनी केला पर्दाफाश!

अमरावती : परतवाडा येथे सोशल मीडियावर आक्षेपार्ह फोटो आणि व्हिडिओ व्हायरल झाल्याच्या प्रकरणाला आता एक गंभीर वळण

temperature pune : महाराष्ट्र सरकारची नवीन SOP, कडाक्याच्या उन्हात आता दुपारी १२ ते ४ 'सक्तीची विश्रांती'

राज्यात उन्हाचा कडाका वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर, महाराष्ट्र सरकारने शहरातील असंघटित क्षेत्रातील

Vande Bharat : पुणे-बंगळूरू प्रवास होणार सुपरफास्ट! अत्याधुनिक सुविधांसह वंदे भारत स्लीपर ट्रेन लवकरच धावणार

पुणे : भारतीय रेल्वे महाराष्ट्र आणि कर्नाटक दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी, विशेषतः पुणेकरांसाठी एक मोठी