Ranichi Baug : राणीबागेतील वाघ, बिबटयांचा मांस मटणावर ताव; खरेदीला स्थायी समितीने दिली मंजुरी

मुंबई (विशेष प्रतिनिधी)


राणीबागेतील वाघ, बिबट्यांसह अन्य प्राण्यांना म्हैस व रेड्याचे मांस दिले जात असून या प्राण्यांच्या नियमित खाद्यांसाठी तब्बल ६२ लाख रुपयांचा खर्च केला जात आहे. मुंबई महापालिकेचा स्वत:चा कत्तलखाना असला तरी महापालिकेला आपल्या राणीबागेतील या प्राण्यांना मांस पुरवता येत नसून त्यांनाही खरेदी करतच प्राण्यांना उपलब्ध करून द्यावे लागत आहे. महापालिकेचा कत्तलखाना हा सेवा देणारा पशुवधगृह असतानाही मुंबईत मात्र अनेक ठिकाणी अनधिकृत कत्तलखाने चालत असल्याचे स्पष्ट होत आहे.


भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान आणि प्राणीसंग्रहालय (राणीबाग) येथील मांसाहारी प्राण्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी बैल आणि रेड्याचे मांस खरेदी केले जाते. याबाबतच्या मांस खरेदीचा प्रस्ताव मंजुरीला आला असता या निर्णयावर यामिनी जाधव यांनी प्रश्न उपस्थित करत प्राण्यांच्या अन्नाची गरज सततची असल्याने किमान पाच वर्षांचा ठेका देण्यात यावी , अशी मागणी केली. तर भाजपच्या प्रिती सातम यांनी महापालिकेचा स्वत:चा कत्तलखाना असताना खासगी संस्थेकडून आपण मांसांची खरेदी का करत आहोत असा सवाल केला. यावेळी काँग्रेसच्या नगरसेविका ट्युलिप मिरांडा यांनी प्राणीसंग्रहालयातील स्थितीवर टीका करत कोट्यवधी रुपये खर्च करूनही माकडे कुपोषित दिसत असल्याचे सांगितले. त्यांनी प्राण्यांना योग्य आहार देण्यासोबतच नवीन प्राणी आणण्याचीही मागणी केली.


यावर प्रशासनाच्यावतीने वाघ, बिबट्या, तरस आणि कोल्हे यांसारख्या मांसाहारी प्राण्यांसाठी नियमित मांस पुरवठा अत्यावश्यक आहे. मांसाच्या दरांमध्ये सतत चढ-उतार होत असल्याने एक वर्षाचा करार अधिक व्यवहार्य असल्याचे सांगितले. सध्याच्या दरांमध्ये वाहतूक, मजुरी, हाताळणी आणि वितरणाचा खर्च समाविष्ट असून हे दर बाजारभावापेक्षा कमी असल्याचा दावा करण्यात आला. तसेच पुरवठादार परवानाधारक असून मांस देवनारमधील अधिकृत कत्तलखान्यांतून घेतले जाते. आणि त्यावर पशुवैद्यकीय तपासणी केली जाते. हाच पुरवठादार संजय गांधी राष्ट्रीय उद्यान यांसारख्या ठिकाणीही पुरवठा करतो. देवनार कत्तलखान्यात पशुवधाची सेवा दिली जाते. महापालिका स्वत: जनावरे खरेदी करत नाही किंबहुना मांसही विकत नाही. परवानाधारक विक्रेत असतात ते म्हैस, रेड्यासह प्राणी घेवून येतात आणि याठिकाणी त्यांना कापून देण्याची सेवा दिली जाते,असे प्रशासनाच्यावतीने स्पष्ट करण्यात आले .

Comments
Add Comment

Bandra Encroachment Removal Campaign : वांद्रे स्थानकाबाहेर अतिक्रमण हटाव मोहीम; अनधिकृत मशिदीवर महापालिकेची कारवाई

मुंबई : मुंबईतील वांद्रे स्थानकाबाहेरील परिसरात आज सकाळी मोठी अतिक्रमण हटाव मोहीम राबवण्यात आली. या

IPL 2026 : आरसीबीसाठी दिलासादायक बातमी! विराट कोहलीचा ओपनिंग पार्टनर प्लेऑफपूर्वी संघात परतणार...

RCB : आयपीएल २०२६ मध्ये अनेक खेळाडू दुखापतीमुळे संघातून बाहेर झाले आहेत. त्यामुळे संघांना त्याचा मोठा फटका बसला

भूमी अभिलेख विभागाचा; राज्यात ५० नवी कार्यालये सुरु होणार; १० हजार पदांच्या आकृतीबंधालाही मूर्तरूप

मुंबई : प्रशासकीय कामकाज लोकाभिमुख आणि वेगवान करण्यासाठी, भूमी अभिलेख विभागाच्या सुधारित आकृतीबंधानुसार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत तेजस नेटवर्क्स आणि महाआयटीमध्ये सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या

महाराष्ट्रातील अभियांत्रिकी विद्यार्थ्यांना दूरसंचार तंत्रज्ञानाचे जागतिक दर्जाचे प्रशिक्षण मिळणार मुंबई :

Virat Kohli : ९ वर्षांत कुणी विचारलंच नाही – तू कसा आहेस ? कसोटी कर्णधारपद सोडण्यावरून विराट कोहलीचा भावनिक खुलासा ..

बेंगळुरू : विराटने कसोटी कर्णधारपद सोडून आज ४ वर्षे उलटून गेली आहेत तरीही त्याच्या त्या निर्णयावर अजूनही बऱ्याच

Minister Nitesh Rane : राज्यातील जलवाहतूक सेवा होणार डिजिटल

 मंत्री नितेश राणे यांचे निर्देश; ऑनलाईन तिकीट व्यवस्थेची अंमलबजावणी करणार मुंबई : मुंबई महानगर प्रदेशातील