Mumbai : मुंबईत नव्याने रस्ते खोदण्यास ३० एप्रिलनंतर मनाई

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महानगरपालिकेच्या महत्त्वाकांक्षी रस्ते सिमेंट काँक्रिटीकरण प्रकल्पाच्या टप्पा १ आणि टप्पा २ अंतर्गत दिनांक १३ एप्रिल २०२६ अखेर एकूण १,७३६ रस्‍त्‍यांचे मिळून ४९६.८३ किलोमीटर लांबीचे काँक्रिटीकरण पूर्ण करण्यात आले आहे. या अंतर्गत शहर विभागातील शीव येथील रस्ते सिमेंट काँक्रिटीकरण कामांची पाहणी भिडे यांनी केली. ३० एप्रिल २०२६ नंतर कोणतेही खोदकाम हाती घेऊ नये. काँक्रिट ओतण्‍याची कामे १५ मे २०२६ पर्यंत पूर्ण करावी. तसेच, रस्‍त्‍यांची सर्व कामे पूर्ण करून ३१ मे २०२६ पर्यंत रस्‍ते वाहतुकीस खुले करावेत, असे निर्देश भिडे यांनी दिले.


महानगरपालिका आयुक्‍त आश्विनी भिडे यांनी गुरुवार १६ एप्रिल २०२६ शहर विभागातील विविध विकास कामांची प्रत्‍यक्ष भेट देऊन पाहणी केली. त्‍यात धारावी येथील ४१८ दशलक्ष लीटर प्रतिदिन क्षमतेचे मलजल प्रक्रिया केंद्र, शीव (सायन) येथील रेल्‍वेमार्गावरील उड्डाणपूल, शीव येथील रस्ते सिमेंट काँक्रिटीकरण कामे, चुनाभट्टी रेल्‍वे स्‍थानक परिसरात पावसाचे पाणी साचू नये म्‍हणून पर्जन्‍य जलवाहिन्‍या विभागाने केलेल्‍या प्रतिबंधात्‍मक उपाययोजना आदींचा समावेश आहे. या पाहणीवेळी त्‍यांनी विविध निर्देश दिले. अतिरिक्‍त महानगरपालिका आयुक्‍त (प्रकल्‍प) अभिजीत बांगर यावेळी उपस्थित होते. या पाहणी दौ-यास महानगरपालिकेचे उपायुक्‍त (आयुक्‍त कार्यालय) प्रशांत गायकवाड, उपायुक्‍त (विशेष) विनायक विसपुते, उपायुक्‍त (पायाभूत सुविधा) गिरीश निकम, प्रमुख अभियंता (पूल) राजेश मुळे, प्रमुख अभियंता (रस्‍ते) मंतय्या स्‍वामी, प्रमुख अभियंता (पर्जन्‍य जलवाहिन्या) कल्‍पना राऊळ यांच्‍यासह संबंधित अधिकारी तसेच अभियंते उपस्थित होते.


चुनाभट्टी रेल्‍वे स्‍थानक : चुनाभट्टी रेल्‍वे स्‍थानक परिसरात सन २०२४ मध्‍ये पावसाचे पाणी साचले होते. सन २०२५ मध्‍ये पावसाळी पाणी साचू नये म्‍हणून महानगरपालिकेच्‍या वतीने काही उपाययोजना करण्‍यात आल्‍या. त्‍यामुळे दिनांक १९ ऑगस्‍ट २०२५ वगळता संपूर्ण पावसाळ्यात एकही दिवस पाणी साचले नाही. या सर्व उपाययोजनांची पाहणी भिडे यांनी केली. हायवे सोसायटीच्‍या सखल भागात साचणारे पावसाचे पाणी उपसा करून सोमय्या नाल्‍यात सोडले जाते.तर, रेल्‍वे हद्दीत उभारलेल्‍या जल साठवण टाकीमध्‍ये गोळा झालेले पावसाळी पाणी रहेजा भूखंडाच्‍या बाजुला असणा-या पर्जन्‍य जलवाहिनीत सोडले जाते. तेथून हे पाणी डंकन नाल्‍यास येऊन मिळते. ही संपूर्ण व्यवस्‍था अधिक कार्यक्षमतेने कार्यान्वित करावी, असे निर्देश भिडे यांनी दिले. रेल्‍वे हद्दीतील टाकीपासून महानगरपालिकेने पाईपलाईन टाकावी, तसेच जल साठवण टाकीतील पाणी उपशाद्वारे सोमय्या नाल्‍यात सोडावे. त्‍यामुळे अतिरिक्‍त फायदा होईल, अशी सूचना रेल्‍वे अधिका-यांनी केली. रेल्वे आणि महानगरपालिका अधिकाऱ्यांनी या प्रस्‍तावाची शक्‍यता पडताळावी, असे निर्देश भिडे यांनी दिले.


लघू उपसा केंद्र : चुनाभट्टी रेल्‍वे स्‍थानकाबाहेर द्रुतगती मार्गालगत लघू उपसा केंद्र कार्यरत असून त्‍याची पाहणी महानगरपालिका आयुक्‍त भिडे यांनी केली. डंकन नाल्‍यातून येणारा सर्व प्रवाह येथे उपसा केला जातो. ७०० मीटर अंतरापर्यंत रायझिंग मेन टाकून हा प्रवाह राहुलनगर नाल्‍यापर्यंत नेण्‍याचे नियोजन आहे. त्‍यामुळे चुनाभट्टी रेल्‍वे स्‍थानक परिसरात येणारा पाण्‍याचा भार कमी होण्‍यास मदत मिळणार आहे. त्‍याची व्‍यवहार्यता तपासावी. नाल्‍यातून गाळ काढण्‍याच्‍या कामात गुणवत्‍ता व पारदर्शकता राहावी यासाठी अधिकारी तथा अभियंत्‍यांनी आग्रही भूमिका घ्‍यावी, असे निर्देश भिडे यांनी दिले.

Comments
Add Comment

NEET UG 2026 : नीट पेपरफुटी प्रकरणी मनीषा मांढरेला CBI कोठडी, नांदेडमधये पालकांची सीबीआय चौकशी

मुंबई : नीट युजी २०२६ पेपरफुटी प्रकरणी मनीषा मांढरेला १४ दिवसांची सीबीआय कोठडी ठोठावण्यात आली आहे.

Krunal Pandya : हार्दिकच्या लग्नाला कृणाल पांड्या गैरहजर राहणार ? चर्चांमागचं नेमकं कारण काय ?

IPL 2026 : हार्दिक पांड्या पुन्हा एकदा चर्चेत आहे. आयपीएल २०२६ संपण्याआधीच हार्दिक पांड्या मॉडेल आणि इन्फ्लुएंसर

Kirit Somaiya : मुंबईत उघड्यावर कुर्बानी देण्यास बंदी घाला, किरीट सोमय्यांची मागणी

मुंबई : मुंबईत उघड्यावर कुर्बानी देण्यास बंदी घाला, अशी मागणी भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केली आहे. बीएमसी आणि

BMC Waste Management : मोठ्या प्रमाणात कचरा निर्मिती: महानगरपालिकेकडे नोंदणी न करणाऱ्यांवर कडक कारवाईचे आयुक्तांचे आदेश

मुंबई : घनकचरा व्यवस्थापन नियमांनुसार मोठ्या प्रमाणात कचरा निर्माण करणाऱ्या संस्था व व्यक्तींनी

BMC News : एकही मॅनहोल्स उघडे राहता कामा नये

महापालिका आयुक्तांनी दिले संबंधित खात्यांसह सहायक आयुक्तांनाही निर्देश मुंबई : सध्या सुरू असलेली सर्व

Devendra Fadnavis : कला, संस्कृती अन् खाद्यसंस्कृतीची ओळख पटवून देणारा 'माटी ९ पूर्वांचल महोत्सव' : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : भारतीय संस्कृती महान असून ही संस्कृती समृद्ध करण्यासाठी महाराष्ट्राने anj पूर्वांचलने महत्त्वपूर्ण