नवी दिल्ली : सोमवारी नोएडा शहरात पगाराच्या वाढीवरून सुरू झालेल्या आंदोलनाने अनपेक्षितपणे रौद्र रूप धारण केले. सकाळी शांततेत सुरू झालेल्या या ...
April 14, 2026 10:19 AM
नवी दिल्ली : सोमवारी नोएडा शहरात पगाराच्या वाढीवरून सुरू झालेल्या आंदोलनाने अनपेक्षितपणे रौद्र रूप धारण केले. सकाळी शांततेत सुरू झालेल्या या ...
राजस्थानमधील अलवर जिल्ह्यातून जाणाऱ्या दिल्ली-मुंबई एक्सप्रेसवेवर 'चॅनल १०० इंटरचेंज' पुलाजवळ एक हृदयद्रावक दुर्घटना घडली. एका भरधाव प्रवासी बसची केमिकल वाहून नेणाऱ्या टँकरशी समोरासमोर भीषण धडक झाली. या भीषण संघर्षात बस चालक, एक महिला आणि दोन निष्पाप बालकांचा जागीच मृत्यू झाला. अपघाताची तीव्रता इतकी मोठी होती की बसमधील ३० हून अधिक प्रवासी गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर सध्या पिनान येथील आरोग्य केंद्रात उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती मिळताच रायथी पोलीस ठाण्याचे एसएचओ बनय सिंग आणि 'NHAI'च्या बचाव पथकाने युद्धपातळीवर धाव घेत मदतकार्य राबवले. रुग्णवाहिकेच्या साहाय्याने जखमींना तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले असून, मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. या अपघातामुळे द्रुतगती मार्गावरील सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, पोलिसांनी दोन्ही अपघातग्रस्त वाहने बाजूला करून वाहतूक सुरळीत केली आहे.
नवी दिल्ली : सोमवारी नोएडा शहरात पगाराच्या वाढीवरून सुरू झालेल्या आंदोलनाने अनपेक्षितपणे रौद्र रूप धारण केले. सकाळी शांततेत सुरू झालेल्या या ...
दिल्ली-मुंबई एक्सप्रेसवेवर झालेल्या भीषण अपघातानंतर आता प्रशासकीय यंत्रणेच्या ढिसाळ कारभारावर प्रवाशांनी ताशेरे ओढले आहेत. अपघात घडल्यानंतर सुमारे दोन तास पोलीस घटनास्थळी पोहोचले नसल्याचा खळबळजनक आरोप जखमींनी केला असून, यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. पोलिसांच्या या दिरंगाईमुळे मदतकार्यात उशीर झाल्याची भावना प्रवाशांनी बोलून दाखवली. दरम्यान, या अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. प्राथमिक अंदाजानुसार, वाहनाचा अतिवेग आणि चालकाचा निष्काळजीपणा या दुर्घटनेला कारणीभूत असावा, अशी शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे. पोलिसांनी आता घटनास्थळाचा रीतसर पंचनामा केला असून, विविध कोनातून तपास सुरू केला आहे. अपघाताचा सविस्तर अहवाल समोर आल्यानंतरच दोषींवर कारवाईची दिशा स्पष्ट होईल, असे सांगण्यात येत आहे.