Asha Bhosle : आशा भोसलेंना मृत्यूची चाहूल? शेवटची इन्स्टा पोस्ट व्हायरल

मुंबई : जेष्ठ गायिका आशा भोसले (Asha Bhosle) यांच्या निधनाने भारतीय संगीतविश्वाला मोठा धक्का बसलाआहे. १२ एप्रिल २०२६ रोजी वृद्धापकाळाने आशा भोसले यांचं निधन झालं. प्रकृती अस्वस्थ झाल्याने त्यांना ब्रीच कँडी हॉस्पिटल (Breach Candy Hospital) येथे दाखल करण्यात आलं होतं. उपचार सुरू असतानाच प्रकृती खालावली आणि वयाच्या ९२ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनामुळे संपूर्ण देशात शोककळा पसरली आहे.


निधनानंतर आशाताईंची शेवटची सोशल मीडिया पोस्ट प्रचंड व्हायरल होत आहे. १८ मार्च रोजी केलेल्या या पोस्टमध्ये त्यांनी ‘The Shadowy Light’ या गाण्याच्या माध्यमातून जीवन, प्रवास आणि मोक्ष याबद्दल अत्यंत भावनिक विचार मांडले होते. वाराणसी आणि पवित्र गंगा नदीच्या किनाऱ्यावरच्या अनुभवातून जीवनाचा खरा अर्थ उमजल्याचं त्यांनी या पोस्टमध्ये लिहिलं होतं.



या पोस्टमध्ये त्यांनी जीवनप्रवासाची तुलना एका नदीशी करत “संगीत हाच माझा नावाडी आहे” असं म्हटलं होतं. जन्म, नातेसंबंध, संगीताप्रती निष्ठा आणि कर्तव्यांचा उल्लेख करत, शेवटी या प्रवासातून ‘मोक्ष’ मिळेल, अशी भावना त्यांनी व्यक्त केली होती. त्यांच्या या शब्दांकडे चाहते आता ‘पूर्वाभास’ म्हणून पाहत आहेत. आशाताईंना आपल्या मृत्यूची चाहूल लागली होती का अशा चर्चा आता रंगू लागल्या आहेत.







डॉक्टरांच्या माहितीनुसार मल्टी-ऑर्गन फेल्युअरमुळे त्यांचं निधन झालं. त्यांच्या पार्थिवावर सोमवारी सायंकाळी ४ वाजता शिवाजी पार्कयेथे अंत्यसंस्कार पार पडणार असल्याची माहिती कुटुंबीयांनी दिली आहे.

Comments
Add Comment

Maria Juliana : प्रसिद्ध तमिळ अभिनेत्रीचा मुख्यमंत्री थलपती विजयवर गंभीर आरोप ; "माझ्या मिसकॅरेजसाठी..."

प्रसिद्ध तमिळ अभिनेत्रीचा मुख्यमंत्री जोसेफ विजयवर गंभीर आरोप ; तामिळनाडूचे मुख्यमंत्री श्री जोसेफ विजय

Deool Band 2 : प्रवीण तरडेंच्या 'देऊळ बंद २' ची गगणभरारी ; ११ दिवसात केली 'इतक्या' कोटींची कमाई !

बॉक्स ऑफिसवर प्रवीण तरडेंच्या 'देऊळ बंद २' चित्रपटाचा डंका पाहायला मिळत आहे. चित्रपटाने वीकेंडला बंपर कमाई केली.

Me Savitribai Jotirao Phule : 'मी सावित्रीबाई जोतीराव फुले' मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप; डॉ. अमोल कोल्हेंनी सांगितले बंद होण्यामागचे कारण

स्टार प्रवाह वाहिनीवरील लोकप्रिय 'मी सावित्रीबाई जोतीराव फुले' ही मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे.

Pooja Bhatt : पूजा भटनं सांगितलं घटस्फोटाचं खरं कारण, म्हणाली.......

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री पूजा भट करिअरपेक्षा तिच्या पर्सनल आयुष्यामुळे जास्त चर्चेत राहिली आहे. अनेक

Sobhita Dhulipala : नागा चैतन्यासोबतच्या नात्यावर होणाऱ्या ट्रॉलिंगवर पहिल्यांदाच बोलली सोभिता धूलिपाला ; म्हणाली..

सोभिता धूलिपाला व नागा चैतन्या यांचे नाते नेहमी चर्चेत राहिले आहे. समांथा रुथ प्रभूपासून विभक्त झाल्यानंतर नागा

Karishma Kapoor : ‘मेंटलहुड’ नंतर करिश्मा कपूर पुन्हा एकदा थरारक क्राइम सिरीजमध्ये ; ट्रेलर बघून चर्चेला उधाण!

मुंबई : 'मर्डर मुबारक' नंतर दोन वर्षांनी करिश्मा कपूर पुन्हा एका दमदार भूमिकेत परतली आहे.‘मेंटलहुड’ नंतरचा हा