Reduce Plastic : तुमचा पहिला टूथब्रश आजही पृथ्वीवर कोठेतरी पडून आहे

प्लास्टिक प्रदूषण कमी करण्यासाठी प्रत्येक घटकाला योगदान द्यावे लागेल: राज्यपाल जिष्णु देव वर्मा


देशात दरवर्षी ३४ लाख टन प्लास्टिक कचरा तयार होत आहे. यापैकी ४० टक्के प्लास्टिक अंतिमतः नदी, नाले व भूगर्भात जात आहे. नद्या व समुद्रात प्लास्टिक गेल्यामुळे पर्यावरणाचे मोठे नुकसान होत आहे. प्लास्टिक प्रदूषणामुळे मत्यव्यवसाय, पर्यटन व आरोग्याला धोका निर्माण होत आहे. त्यामुळे प्लास्टिकला योग्य पर्याय शोधावा लागेल आणि प्लास्टिक प्रदूषण कमी करण्यासाठी समाजातील प्रत्येक घटकाला योगदान द्यावे लागेल, असे प्रतिपादन राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी आज येथे केले.


संयुक्त राष्ट्र संघाच्या पर्यावरण विभागातर्फे 'प्लास्टिक उत्पादने व प्लास्टिक पॅकेजिंग आवरणांचा पर्यावरणावरील दुष्परिणाम' या विषयावर आयोजित तज्ज्ञांच्या मुंबई येथे झालेल्या चर्चासत्राला राज्यपाल संबोधित करीत होते.


स्वच्छ पाणी व स्वच्छ पर्यावरणाशिवाय विकसित भारताचे लक्ष्य गाठता येणार नाही असे सांगून प्लास्टिक पासून पर्यावरणाला होणारा धोका लक्षात घेऊन कॉर्पोरेट, उद्योग, नीती निर्माते या सर्वांना या कार्यात पुढाकार घ्यावा लागेल व त्यासाठी विद्यार्थी, युवक व समाजाच्या इतर सर्व घटकांमध्ये जागरुकता निर्माण करावी लागेल, असे राज्यपालांनी सांगितले.


शाश्वततेशिवाय झालेल्या विकासाला 'विकास' म्हणता येणार नाही असे सांगून राज्यपालांनी प्लास्टिक प्रदूषणाच्या गंभीर समस्येवर मात करण्यासाठी शासन, उद्योग जगत आणि नागरिकांना एकत्रितपणे प्रयत्न करण्याचे आवाहन केले.



तुम्ही वापरलेला पहिला टूथब्रश आजही भूगर्भात पडून आहे:


ईश्वर सर्वव्यापी आहे, तसेच प्लास्टिकही आज सर्वव्यापी झाले असून हिमालयाच्या शिखरापासून समुद्राच्या सखोल भागापर्यंत प्लास्टिक पोहोचले आहे. तुम्ही वापरलेला पहिला टूथब्रश आज देखील जमिनीच्या पोटात कोठेतरी पडून आहे. त्यामुळे प्लास्टिक वस्तू व प्लास्टिक आवरणामुळे होणारे प्रदूषण कमी करणे ही काळाची गरज आहे असे प्रतिपादन संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रमाचे भारतातील प्रमुख बाळकृष्ण पशुपती यांनी यावेळी केले.


रिझर्व्ह बँकेची शाश्वत वित्तपुरवठ्याची योजना असून त्यामाध्यमातून पर्यावरण रक्षणाच्या कार्याला वित्त पुरवठ्याच्या माध्यमातून चालना दिली जात असल्याचे बँकेचे कार्यकारी अध्यक्ष आर केशवन यांनी यावेळी सांगितले.


यावेळी राज्यपालांच्या हस्ते ‘वर्क इन प्रोग्रेस: रिड्युसिंग द प्लास्टिक फूटप्रिंट ऑफ प्रॉडक्ट्स अँड पॅकेजिंग’ या पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले.


बैठकीला विविध कॉर्पोरेट कंपन्यांचे मुख्य कार्यकारी अधिकारी, मुख्य शाश्वतता अधिकारी तसेच या क्षेत्रातील तज्ज्ञ उपस्थित होते.

Comments
Add Comment

Mumbai Bomb Threat : मुंबईत खळबळ! महापौर कार्यालय, BMC मुख्यालय आणि मेट्रो स्थानकांना बॉम्बस्फोटाची धमकी; सुरक्षा यंत्रणा सतर्क

मुंबई : मुंबईत शुक्रवारी बॉम्बस्फोटाच्या धमकीमुळे सुरक्षा यंत्रणा सतर्क झाली. मुंबई महापौर कार्यालय,

Mumbai Local Train : मुंबई लोकलमध्ये वडाळाजवळ पुरुषाकडून महिलेला बेदम मारहाण; बेल्ट काढून धमकी, सहप्रवाशी ठरले मूकदर्शक!

मुंबई : मुंबईकरांची जीवन वाहिनी मानल्या जाणाऱ्या 'लोकल ट्रेन' (Mumbai Local Train) मधील प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा

Birthday Celebration Firing : 'बड्डे आहे भावाचा जल्लोष साऱ्या गावाचा'; रस्त्यात सेलिब्रेशन अन् बेबी एअरगनमधून गोळीबार महागात पडली

वाढदिवसाच्या सेलिब्रेशनमध्ये बेबी एअरगनमधून गोळीबार;10 जणांविरुद्ध गुन्हा, मुख्य आरोपी ताब्यात बोरिवली :

Publications Banned : अतिरेकी विचारांचे उदात्तीकरण करणाऱ्या ११४ प्रकाशनांवर बंदी

- राज्य सरकारचा निर्णय; 'काश्मीर किफाह – रेझिलियन्स अँड करेज', 'नवाई गझवा-ए-हिंद'चा समावेश मुंबई : हिंसक अतिरेकी

Mumbai News : गृहनिर्माण सोसायट्यांनी पदपथांवरील रॅम्प, अतिक्रमणे तातडीने हटवावेत; अन्यथा कठोर कारवाई

महापालिका आयुक्तांचे इशारावजा आवाहन मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबईतील पदपथ हे नागरिकांना सुरक्षितपणे आणि

Mumbai Mandai News : मुंबईतील मंड्यांच्या पुनर्विकासासाठी धोरणात्मक घेणार निर्णय

स्थायी समितीच्यावतीने होणार विशेष बैठक मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबईतील अनेक मंडईंचा पुनर्विकास रखडलेला असून