Jalna Murder Case : आयुष्याची नवीन सुरुवात करण्यासाठी ठरवलेला दिवसच ठरला अंतिम, पोटच्या मुलानेच केली निघृण हत्या

जालना जिल्ह्यामधील अंबड तालुक्यात एक धक्कादायक आणि हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली आहे. पोटच्या मुलानेच आपल्या वडिलांची कुऱ्हाडीनं वार करून निर्घृण हत्या केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेनं संपूर्ण परिसरात भीतीचं वातावरण आणि एकच खळबळ उडाली आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, आज म्हणजेच गुरुवारी ९ एप्रिल २०२६ रोजी सकाळी ५ वाजताच्या सुमारास अंबड तालुक्यातील रुई गावात सकाळच्या सुमारास दिलीप राजगुरू (वय ४५) यांचं पार्थिव त्यांच्या राहत्या घराजवळ रक्तरंजित अवस्थेत आढळून आलं. ही बाब ग्रामस्थांच्या निदर्शनास येताच त्यांनी तत्काळ तीर्थपुरी पोलीस ठाण्याला माहिती दिली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि पंचनामा करत तपासाला सुरुवात केली. प्राथमिक तपासात दिलीप राजगुरू यांच्या डोक्यावर आणि शरीरावर कुऱ्हाडीचे गंभीर घाव असल्याचं आढळून आलं, त्यामुळे ही हत्या असल्याचं स्पष्ट झालं.


या प्रकरणाचा सखोल तपास सुरू केल्यानंतर धक्कादायक माहिती समोर आली. दिलीप राजगुरू यांचा स्वतःचा मुलगा विलास राजगुरू (वय १९) यानेच आपल्या एका साथीदाराच्या मदतीनं ही हत्या केल्याचं उघड झालं. पोलिसांनी संशयाच्या आधारे विलासला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यानं गुन्ह्याची कबुली दिली. या हत्येमागील कारण ऐकून सर्वांनाच धक्का बसला आहे.


नेमकं काय घडलं ?


विलासच्या आईचं म्हणजेच दिलीप राजगुरू यांच्या पत्नीचं काही वर्षांपूर्वी निधन झालं होतं. त्यानंतर ते एकटेच राहत होते. दरम्यान, त्यांनी दुसरं लग्न करण्याचा निर्णय घेतला होता आणि विशेष म्हणजे, विवाहाच्या दिवशीच त्यांची हत्या करण्यात आली.  वडिलांच्या या निर्णयाबद्दल मुलगा विलास नाराज होता. वडील दुसरं लग्न करत असल्याचा राग त्याच्या मनात खोलवर घर करून बसला होता.


विलासनं रागातून आपल्या एका मित्राच्या मदतीनं वडिलांच्या हत्येचा कट रचला. सकाळच्या सुमारास संधी साधून विलासनं वडिलांवर कुऱ्हाडीनं सपासप वार केले, यावेळी त्यांचा जागीच मृत्यू झाला. विशेष म्हणजे, ज्या दिवशी दिलीप राजगुरू यांच्या नवीन आयुष्याची सुरुवात होणार होती, त्याच दिवशी त्यांचा दुर्दैवी अंत झाला.


या घटनेमुळे रुई गावासह संपूर्ण जालना जिल्हा हादरला आहे. नात्यांमधील वाढता दुरावा आणि संताप किती टोकाला जाऊ शकतो, याचं हे भीषण उदाहरण असल्याची चर्चा परिसरात सुरू आहे. दरम्यान, तीर्थपुरी पोलीस ठाण्यात आरोपी मुलगा विलास राजगुरू आणि त्याच्या साथीदाराविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, पुढील तपास वरिष्ठांच्या आदेशावरून तीर्थपुरी पोलीस ठाण्याच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक वैशाली पवार यांच्याकडून सुरु आहे.

Comments
Add Comment

Ahilyanagar : जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीला उच्च न्यायालयात आव्हान ; निवडणूक प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह, राजकीय वातावरण तापले

अहिल्यानगर (राहुरी प्रतिनिधी) : अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (Ahilyanagar District Central Cooperative Bank) होवू घातलेल्या

Ahilyanagar : श्रीरामपूरमध्ये स्थानिक गुन्हे शाखेची सलग दुसऱ्या दिवशी मोठी कारवाई; एमडी तस्कर जेरबंद, अडीच लाखांचा मुद्देमाल जप्त

अहिल्यानगर (श्रीरामपूर) : श्रीरामपूर शहरात अंमली पदार्थांविरोधात स्थानिक गुन्हे शाखेने सलग दुसऱ्या दिवशी मोठी

Ketan Agrawal Murder Case : 'मला त्याला स्लो पॉयझन देऊन मारायचं होतं..';केतन हत्याकांड प्रकरणातील 'त्या' गुप्त कटामागचा मास्टरमाइंड कोण?

केतन अग्रवाल हत्याकांडात धक्कादायक दावा; 'स्लो पॉयझन' देण्याचाही कट असल्याची तपासात चर्चा पुणे : केतन

Minister Radhakrishna Vikhe Patil : मतदार यादीत घुसखोरांना जागा नाही ; पुनरिक्षण मोहिमेत कार्यकर्त्यांनी पुढे या : ना. राधाकृष्ण विखे पाटील

Ahilyanagar (Shevgaon) : मतदार यादीची सखोल पुनरिक्षण मोहीम भविष्याच्या दृष्टीने महत्वपूर्ण आहे.सरकारी स्तरावर काम सुरू असले

Wardha Murder : वर्ध्यात काळजाचा थरकाप उडवणारी घटना! 12 वर्षांच्या मुलीची दगडाने ठेचून निर्घृण हत्या; नराधमांनी ओलांडल्या क्रूरतेच्या सर्व सीमा

वर्धा : वर्धा  (wardha) जिल्ह्यातील रोठा गावातून एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली

Pune Metro : पुणेकरांसाठी गुड न्यूज! हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रोला नवा मुहूर्त; वाहतूक कोंडीतून लवकरच सुटका!

पुणे : पुण्यातील ट्रॅफिक जॅम, विशेषतः हिंजवडी आयटी पार्क परिसरात होणाऱ्या रोजच्या वाहतूक कोंडीने त्रस्त