Jalna Murder Case : आयुष्याची नवीन सुरुवात करण्यासाठी ठरवलेला दिवसच ठरला अंतिम, पोटच्या मुलानेच केली निघृण हत्या

जालना जिल्ह्यामधील अंबड तालुक्यात एक धक्कादायक आणि हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली आहे. पोटच्या मुलानेच आपल्या वडिलांची कुऱ्हाडीनं वार करून निर्घृण हत्या केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेनं संपूर्ण परिसरात भीतीचं वातावरण आणि एकच खळबळ उडाली आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, आज म्हणजेच गुरुवारी ९ एप्रिल २०२६ रोजी सकाळी ५ वाजताच्या सुमारास अंबड तालुक्यातील रुई गावात सकाळच्या सुमारास दिलीप राजगुरू (वय ४५) यांचं पार्थिव त्यांच्या राहत्या घराजवळ रक्तरंजित अवस्थेत आढळून आलं. ही बाब ग्रामस्थांच्या निदर्शनास येताच त्यांनी तत्काळ तीर्थपुरी पोलीस ठाण्याला माहिती दिली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि पंचनामा करत तपासाला सुरुवात केली. प्राथमिक तपासात दिलीप राजगुरू यांच्या डोक्यावर आणि शरीरावर कुऱ्हाडीचे गंभीर घाव असल्याचं आढळून आलं, त्यामुळे ही हत्या असल्याचं स्पष्ट झालं.


या प्रकरणाचा सखोल तपास सुरू केल्यानंतर धक्कादायक माहिती समोर आली. दिलीप राजगुरू यांचा स्वतःचा मुलगा विलास राजगुरू (वय १९) यानेच आपल्या एका साथीदाराच्या मदतीनं ही हत्या केल्याचं उघड झालं. पोलिसांनी संशयाच्या आधारे विलासला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यानं गुन्ह्याची कबुली दिली. या हत्येमागील कारण ऐकून सर्वांनाच धक्का बसला आहे.


नेमकं काय घडलं ?


विलासच्या आईचं म्हणजेच दिलीप राजगुरू यांच्या पत्नीचं काही वर्षांपूर्वी निधन झालं होतं. त्यानंतर ते एकटेच राहत होते. दरम्यान, त्यांनी दुसरं लग्न करण्याचा निर्णय घेतला होता आणि विशेष म्हणजे, विवाहाच्या दिवशीच त्यांची हत्या करण्यात आली.  वडिलांच्या या निर्णयाबद्दल मुलगा विलास नाराज होता. वडील दुसरं लग्न करत असल्याचा राग त्याच्या मनात खोलवर घर करून बसला होता.


विलासनं रागातून आपल्या एका मित्राच्या मदतीनं वडिलांच्या हत्येचा कट रचला. सकाळच्या सुमारास संधी साधून विलासनं वडिलांवर कुऱ्हाडीनं सपासप वार केले, यावेळी त्यांचा जागीच मृत्यू झाला. विशेष म्हणजे, ज्या दिवशी दिलीप राजगुरू यांच्या नवीन आयुष्याची सुरुवात होणार होती, त्याच दिवशी त्यांचा दुर्दैवी अंत झाला.


या घटनेमुळे रुई गावासह संपूर्ण जालना जिल्हा हादरला आहे. नात्यांमधील वाढता दुरावा आणि संताप किती टोकाला जाऊ शकतो, याचं हे भीषण उदाहरण असल्याची चर्चा परिसरात सुरू आहे. दरम्यान, तीर्थपुरी पोलीस ठाण्यात आरोपी मुलगा विलास राजगुरू आणि त्याच्या साथीदाराविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, पुढील तपास वरिष्ठांच्या आदेशावरून तीर्थपुरी पोलीस ठाण्याच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक वैशाली पवार यांच्याकडून सुरु आहे.

Comments
Add Comment

Industries Minister Dr. Uday Samant : पांढरकवडा येथे 86 हेक्टरवर नवीन औद्योगिक क्षेत्र स्थापनेला गती - उद्योग मंत्री डॉ.उदय सामंत

मुंबई : यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा तालुक्यात औद्योगिक विकासाला चालना देण्यासाठी केळापूर तालुक्यातील मौजे

Industries Minister Dr. Uday Samant - 'एमआयडीसी’कडे लवकरच हस्तांतरित करणार : उद्योग मंत्री डॉ.उदय सामंत

मुंबई : धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातील विखरन येथील 250 मेगावॅट सौर ऊर्जा प्रकल्पासाठी संपादित जमिनीपैकी

Ashok Kharat : 'लक्ष्मण' ते भोंदूबाबा 'अशोक खरात'; ४० वर्षांपूर्वीच गावकऱ्यांनी दिला होता बेदम चोप!

अहिल्यानगर : महिलांच्या लैंगिक शोषणाप्रकरणी सध्या तुरुंगात असलेल्या अशोक खरात याच्या कृत्यांची मुळं चाळीस

Gahininath fort : गहिनीनाथ गडाच्या विकासासाठी कटिबद्ध - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

लाखो भाविकांच्या उपस्थितीत नारळी सप्ताह भक्तिमय वातावरणात संपन्न बीड : म्हसोबावाडी (ता.

All priests will earn the same : मंदिरांतील पुजाऱ्यांचे मानधन एकसमान होणार

राज्य सरकार धोरण ठरवणार; मंत्रालयात झाली विशेष बैठक मुंबई : काही देवस्थानांमध्ये पुजाऱ्यांना नियमित वेतन दिले

Pune News : मांजरी स्टेशनचा कायापालट तर रामटेकडीला मिळणार नवे ब्लॉक स्टेशन

पुणे : पुणे रेल्वे विभागाने वाढती प्रवासी गर्दी आणि रेल्वे वाहतुकीवरील ताण लक्षात घेऊन दोन महत्त्वाचे प्रकल्प