मुंबई : इराण आणि अमेरिका यांच्यातील संघर्ष शांत होण्याचे नाव घेत नाहीये. मध्य पूर्वेत सुरू असलेल्या संघर्षामुळे होर्मूझ सामुद्रधुनी सध्या जागतिक चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. इराण आणि अमेरिका यांच्यातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारतालाही याचे थेट परिणाम जाणवू लागले आहेत. या पार्श्वभूमीवर भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांच्याशी इराणकडून थेट संपर्क साधण्यात आला आहे.
भारत-इराण उच्चस्तरीय चर्चा
ट्रम्प यांचा इराणला अल्टिमेटम
दरम्यान, अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला होर्मूझ सामुद्रधुनी खुली करण्यासाठी ४८ तासांचा अल्टिमेटम दिल्याची माहिती समोर आली आहे. “सामुद्रधुनी खुली केली नाही तर कठोर कारवाई केली जाईल,” असा इशाराही देण्यात आल्याचे सांगितले जाते.
भारताची जहाजे अडकली
तेल दरवाढ आणि जागतिक परिणाम
सामुद्रधुनीत अडथळे निर्माण झाल्याने जागतिक बाजारात तेलाच्या किमती झपाट्याने वाढू लागल्या आहेत. अनेक देशांमध्ये इंधन तुटवडा आणि आर्थिक तणाव निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सध्या भारतात पुरेसा तेल साठा आणि गॅससाठा असला तरी अनेक देशांत तेल आयात करणाऱ्या देशांसाठी ही परिस्थिती अधिक चिंताजनक ठरू शकते.
होर्मूझ सामुद्रधुनीतील तणाव हा केवळ प्रादेशिक मुद्दा राहिलेला नसून जागतिक अर्थव्यवस्था आणि ऊर्जा सुरक्षेसाठी मोठे आव्हान ठरत आहे. इतर देशांमध्ये या युद्धामुळे कोणतीही भीषण परिस्थिती जाणवू नये यासाठी भारतासह अनेक देश परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत