Monday, April 6, 2026

Ahilyanagar: लग्नाच्या आमिषाने तरुणीचे लैंगिक शोषण; श्रीरामपूरात गुन्हा दाखल

Ahilyanagar: लग्नाच्या आमिषाने तरुणीचे लैंगिक शोषण; श्रीरामपूरात गुन्हा दाखल

श्रीरामपूर: लग्नाचे आमिष दाखवून एका २३ वर्षीय तरुणीचे दीर्घकाळ लैंगिक शोषण केल्याप्रकरणी अक्षय विश्वनाथ गवळी (रा. संजयनगर, श्रीरामपूर) याच्याविरोधात श्रीरामपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी ही घरकाम करून उदरनिर्वाह करत असून, तिचा २०१९ मध्ये विवाह झाला होता. वैवाहिक आयुष्यातील वाद आणि अत्याचारामुळे ती माहेरी राहत असताना आरोपी अक्षय गवळी याच्याशी तिची ओळख झाली. सुरुवातीला फोनवरून संपर्क साधत आरोपीने तिचा विश्वास संपादन केला. यानंतर आरोपीने लग्नाचे आमिष दाखवत २०२२ पासून वेळोवेळी तिच्याशी जबरदस्तीने तसेच फसवणूक करून शारीरिक संबंध ठेवले. पुढे पीडितेला घटस्फोट घेण्यास प्रवृत्त करून शिरसगाव येथे भाड्याच्या खोलीत पती-पत्नीप्रमाणे राहूनही आरोपीने तिचे शोषण सुरूच ठेवले.

दरम्यान, मार्च २०२६ मध्ये आरोपी दुसऱ्या मुलीशी विवाह करत असल्याचे समजताच पीडित तरुणीने विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला होता. उपचारादरम्यान आरोपीने दुसरे लग्न केल्याचेही उघड झाले. त्यानंतरही आरोपीने पीडितेला मारहाण करून घराबाहेर काढल्याची तक्रार आहे. या प्रकरणी पीडितेच्या फिर्यादीवरून भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ च्या कलम ६४(2)(m) अन्वये गुन्हा रजि नं. २३६/२०२६ दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दादाभाई मगरे हे करत आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >