हैद्राबाद : उन्हाळा सुरु झाला की स्वागत केलं जात ते फळांचा राजा आंब्याचं, कारण वर्षभरातून फक्त उन्हळ्यातच आपल्याला या आंब्यांची चव चाखता येते, त्यामुळे संपूर्ण बाजार पिवळ्या आंब्यांची भरून जातो. पण हेच पिवळे धम्मक आंबे आपल्या आरोग्यसाठी धोकादायक ठरू शकतात. असाच एक धक्कादायक प्रकार हैद्राबादमधून समोर आला आहे.
हैद्राबादमध्ये प्रकार उघडकीस
हैद्राबादच्या बाजारपेठेत बनावट आंब्याचा सुळसुळाट पसरला आहे, आणि आंबे खाल्ल्याने अनेक लोक आजारी पडत आहेत. या माहितीवरून पोलिसांनी अचानक धड टाकत एका फळ विक्रेत्याकडून तब्बल २०० किलो बनावट आंबे हे जप्त केले आहेत. हैद्राबाद पोलिसांनी कडक कारवाई करत एका रॅकेटचा पर्दाफाश केला आहे.
बनावट आंबे कसे पिकवले जातात?
हाती आलेल्या माहितीनुसार हैद्राबाद खाद्य सुरक्षा अधिकारी आणि पोलिसांनी संयुक्तपणे शहराच्या विविध भागात छापे टाकून या रॅकेटचा पर्दाफाश केला या कारवाईदरम्यान अनेक धक्कदायक प्रकार उघडकीस आले. ग्राहकांच्या शरीराशी खेळले जाणारे आंबे हे कॅल्शिअम कार्बोइडसारख्या घातक रसायनांचा वापर करून आंबे पिकवले जात होते. पोलिसांनी घटनास्थळावरून २०० किलो आंबे आणि रसायनांची पाकिटे जप्त केली आहेत.
असे आंबे शरीरासाठी किती धोकादायक
प्रशासनाचे आवाहन
उन्हाळात आंब्यांची मागणी ही वाढत जाते. या वाढत्या मागणीचा फायदा घेऊन जास्त आणि लवकर पैसे कमवण्यासाठी फळ विक्रेते बनावट आंबे विकून ग्राहकांना फसवतात. आणि याचा परिणाम ग्राहकांच्या शरीराशी होतो. ग्राहकांनी फळे खरेदी करताना अधिक सावधगिरी बाळगावी काही संशयास्पद आढळ्यास त्वरित प्रशासनाशी संपर्क साधावा. असे आवाहन पोलीस प्रशासनाने केले आहे.ग्राहकांनी फळे खरेदी करताना अधिक सावधगिरी बाळगावी आणि संशयास्पद वाटल्यास प्रशासनाशी संपर्क साधावा असेही स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच बाजारातील वाढत्या मागणीचा फायदा घेण्यासाठी व्यापारी अशा अनैतिक मार्गांचा अवलंब करत असल्याने कडक कायदेशीर कारवाई करण्याचे संकेत प्रशासनाने दिले आहेत.






