संगमनेर रोडवरील मॉडर्न चायनीज दुकानावर दगडफेक; पाण्याच्या बाटलीच्या पैशांवरून वाद

श्रीरामपूर : श्रीरामपूर शहरातील संगमनेर रोड परिसरात महाराष्ट्र वाईनच्या समोरील मॉडर्न चायनीज दुकानावर किरकोळ कारणावरून दगडफेक झाली आणि तोडफोड करण्यात आली. हनुमान जयंती निमित्त काढण्यात आलेली मिरवणूक संपल्यानंतर ही घटना घडली. यामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.


मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित दुकानात पाण्याच्या बाटलीचे पैसे मागितल्याच्या कारणावरून वाद झाला. या किरकोळ वादाचा राग मनात धरून एका व्यक्तीने आपल्या १५ ते २० साथीदारांसह दुकानावर हल्ला चढवला. यावेळी दुकानासमोरील काऊंटरची काच फोडण्यात आली तसेच खुर्च्या, प्लेट्स यांची तोडफोड करण्यात आली. दुकानातील मालाची नासधूस करून नुकसान करण्यात आले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. या प्रकरणी पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाकचौरे यांनी सांगितले की, ही घटना पाण्याच्या बाटलीच्या किमतीवरून झालेल्या वादातून घडली असून यामागे कोणताही पूर्वीचा वाद नाही. तसेच या घटनेला जातीय किंवा धार्मिक रंग देऊ नये, असे आवाहनही त्यांनी केले आहे. या प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत चार आरोपींना अटक केली असून उर्वरित आरोपींचा शोध घेण्यासाठी विशेष पथके तयार करण्यात आली आहेत. पुढील तपास पोलीस करत आहेत.

Comments
Add Comment

Malegaon News : मालेगावच्या महासभेत सत्ताधारी एकमेकांशी भिडले

मालेगाव : मतदार याद्यांचे पुनर्निरिक्षणाच्या मुद्द्यावरून मालेगाव महानगरपालिकेमध्ये सत्ताधारी एमआयएम आणि

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुण्यतिथी दिनानिमित्त अभिवादन

सोलापूर : श्री शिवजन्मोत्सव (मध्यवर्ती) महामंडळ संपर्क कार्यालय येथे आज श्री शिवजन्मोत्सव (मध्यवर्ती) महामंडळ

PM Kisan Yojana 23rd Instalment: पीएम किसान योजनेचा २३ वा हप्ता 'या' महिन्यात मिळण्याची शक्यता

मुंबई: भारत हा कृषीप्रधान देश आहे. त्यामुळे लाखो लोक शेती करतात. त्यांच्यापैकी अनेकांना शेतीतून फारसे उत्पन्न

पुण्यात CNG च्या दरात वाढ; या तारखेपासून होणार नवे दर लागू

पुणे : इराण आणि इस्त्रायल युद्धाच्या पार्श्वभूमीवर अनेक देशात तेलाच्या गॅसच्या किमती या गगनाला भिडल्या आहेत.

छत्रपती संभाजीनगरातील वैजापूर रोडवर एलपीजी चोरी प्रकरण उघड; शिधावाटप विभागाच्या राज्यस्तरीय दक्षता पथकाची मोठी कारवाई

मुंबई: शिधावाटप विभागाच्या राज्यस्तरीय दक्षता पथकाने मोठी कारवाई करत एलपीजी गॅस चोरीचा प्रकार उघडकीस आणला आहे.

अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी कृषी मंत्री शेतक - यांच्या बांधावर

राज्यात अवकाळी पावसामुळे १ लाख २२ हजारहून अधिक हेक्टर शेती पिकांचे नुकसान पुणे : राज्यात वादळी वारा व गारांच्या