ऑपरेशन टायगर? : शिवसेनेच्या मेजवानीला ‘उबाठा’च्या खासदारांची हजेरी

मुंबई: महाराष्ट्राच्या राजकारणात ‘ऑपरेशन टायगर’च्या चर्चांनी जोर धरलेला असतानाच, बुधवारी रात्री राजधानी दिल्लीत त्या दिशेने घडामोडी घडताना दिसल्या. 'उबाठा' गटाचे दोन खासदार चक्क शिवसेनेच्या मेजवानीत सहभागी झाले. केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी आयोजित केलेल्या या स्नेहभोजनाला खासदार नागेश पाटील आष्टीकर आणि संजय देशमुख यांनी लावलेल्या हजेरीमुळे तर्कवितर्कांना उधाण आले आहे.


उबाठाच्या खासदारांना गळाला लावण्यासाठी शिवसेनेकडून ऑपरेशन टायगर सुरू असल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहेत. त्या पार्श्वभूमीवर या दोन खासदारांनी पक्षीय सीमा ओलांडून शिवसेनेच्या मंत्र्यांच्या पाहुणचाराचा आस्वाद घेतल्याने मातोश्रीची धाकधूक वाढली आहे. कौटुंबिक स्नेहभोजनासाठी ही भेट असल्याचे दावे केले जात असले तरी, राजकारणात अशा भेटींचे टायमिंग अत्यंत महत्त्वाचे मानले जाते.


केंद्रीय आयुष राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) प्रतापराव जाधव यांच्या निवासस्थानी हे स्नेहभोजन आयोजित करण्यात आले होते. या मेजवानीला महायुतीचे खासदार उपस्थित होतेच. मात्र, उबाठा गटाचे हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर आणि यवतमाळ-वाशिमचे खासदार संजय देशमुख यांची उपस्थिती लक्षवेधी ठरली.



सुप्त अस्वस्थता


विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या निकालानंतर उबाठा गटातील काही लोकप्रतिनिधींमध्ये सुप्त अस्वस्थता असल्याची चर्चा आहेत. त्या पार्श्वभूमीवर आष्टीकर आणि देशमुख यांनी थेट शिवसेनेच्या मेजवानीला हजेरी लावल्याने त्याचे राजकीय अर्थ काढले जात आहेत. दिल्लीतील या ‘डीनर डिप्लोमसी’चे पडसाद राज्याच्या राजकारणात उमटतात का, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

Comments
Add Comment

SSC Exam 2026 Major Reform : कागदपत्रांचा गोंधळ संपणार! आता 'मार्कशीट' आणि 'पासिंग सर्टिफिकेट' मिळणार...बोर्डाचा नवीन निर्णय काय ?

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने (MSBSHSE) १० वीच्या विद्यार्थ्यांसाठी एक

Luthra Brothers : गोवा नाईट क्लब अग्नितांडव प्रकरणी लुथरा बंधूंना जामीन मंजूर

उत्तर गोव्यातील नाईटक्लब आगीच्या दुर्घटनेशी संबंधित प्रकरणात एक मोठे वळण आले आहे. अंजुनाजवळील 'बर्च बाय रोमियो

Ashok Kharat Case : भोंदू बाबा अशोक खरातची केस लढवण्यास सरकारी वकिलाचा नकार

मुंबई : भोंदू बाबा खरात प्रकरणात सरकारी वकील म्हणून कार्य करणारे अजय मिसर यांनी वाढत्या कामाच्या ताणामुळे खरात

Chief Minister's Employment Creation Scheme: मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेतून युवकांना स्वावलंबनाकडे नेणारी प्रभावी वाटचाल

मुंबई: राज्य शासनाच्या मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना (CMEGP) अंतर्गत आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये राज्यातील

समृद्धी महामार्गावर आठ महिलांचा अपघाती मृत्यू

मुंबई : समृद्धी महामार्गावर जालना परिसरात भरधाव ट्रकने पिकअपला जोरदार धडक दिली. या अपघातात आठ मजूर महिलांचा

जळगाव : सोन्याचा भाव दीड लाखांच्या उंबरठ्यावर

गेल्या 24 तासांत सोन्याचे दर 3,500 रुपये वाढले चांदीच्या भावातही 3,000 रुपयांची झाली वाढ जळगाव : सोन्या-चांदीच्या