Ashok Kharat Case : भोंदू बाबा अशोक खरातची केस लढवण्यास सरकारी वकिलाचा नकार

मुंबई : भोंदू बाबा खरात प्रकरणात सरकारी वकील म्हणून कार्य करणारे अजय मिसर यांनी वाढत्या कामाच्या ताणामुळे खरात यांचा खटला लढविण्यास नकार दिला आहे. त्यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे चांगलीच खळबळ उडाली आहे. दरम्यान या प्रकरणात मिसर यांनी अशी भूमिका का घेतली याबाबत उलट सुलट चर्चा सुरू असून त्यांच्यावर कोणाचा दबाव होता का अशी चर्चा सध्या नाशिकच्या प्रशासकीय आणि न्यायालयीन वर्तुळात सुरू आहे.


महाराष्ट्राला हादरवणाऱ्या आणि अनेक बड्या राजकारण्यांना घाम फोडणाऱ्या भोंदूबाबा अशोक प्रकरणात मोठी माहिती समोर आली आहे. सरकारी वकील अजय मिसर यांनी अशोक खरातविरोधात एसआयटीची केस लढण्यास असमर्थता दाखवली आहे. एसआयटीने विशेष सरकारी वकील अजय मिसर यांना ही केस चालवण्यासाठी लेखी पत्राद्वारे विनंती केली होती. मात्र सरकारी वकील अॅड. अजय मिसर यांनी केस चालवण्यास नकार दिला आहे.


२०११ मुंबई साखळी बॉम्ब स्फोट खटला, रवी पुजारी प्रकरणातील महाराष्ट्रातील सर्व खटले तसेच अन्य महत्वाच्या खटल्याच्या न्यायालयीन चौकशीच्या कामामुळे या प्रकरणाला वेळ व न्याय देता येणार नसल्याने विशेष सरकारी वकील अजय मिसर यांनी केस चालवण्यास नकार दिल्याची माहिती समोर येत आहे. अजय मिसर यांनी नकार दिल्याने सहाय्यक सरकारी वकील शैलेंद्र बागडे हेच युक्तिवाद करणार आहेत.


दरम्यान, शिर्डी येथील गुन्ह्याच्या तपासात अशोक खरात यांची पत्नी कल्पना खरात हिला चौकशीसाठी एसआयटी बोलविण्याच्या तयारीत असताना ती फरार झाली. अशोक खरातची पत्नी कल्पना खरात हिच्यासह पाच जणांविरोधात शिर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. कल्पना खरातला अटक करण्यासाठी एसआयटी पथक खरातच्या घरी पोहोचले. पण, कल्पना खरात फरार झाल्याने पथकाने अशोक खरात याच्या मुलाला ताब्यात घेतले आहे.

Comments
Add Comment

Luthra Brothers : गोवा नाईट क्लब अग्नितांडव प्रकरणी लुथरा बंधूंना जामीन मंजूर

उत्तर गोव्यातील नाईटक्लब आगीच्या दुर्घटनेशी संबंधित प्रकरणात एक मोठे वळण आले आहे. अंजुनाजवळील 'बर्च बाय रोमियो

Chief Minister's Employment Creation Scheme: मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेतून युवकांना स्वावलंबनाकडे नेणारी प्रभावी वाटचाल

मुंबई: राज्य शासनाच्या मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना (CMEGP) अंतर्गत आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये राज्यातील

समृद्धी महामार्गावर आठ महिलांचा अपघाती मृत्यू

मुंबई : समृद्धी महामार्गावर जालना परिसरात भरधाव ट्रकने पिकअपला जोरदार धडक दिली. या अपघातात आठ मजूर महिलांचा

जळगाव : सोन्याचा भाव दीड लाखांच्या उंबरठ्यावर

गेल्या 24 तासांत सोन्याचे दर 3,500 रुपये वाढले चांदीच्या भावातही 3,000 रुपयांची झाली वाढ जळगाव : सोन्या-चांदीच्या

केळीच्या दरात मोठी घसरण, शेतकरी वर्ग हवालदिल

जळगाव : केळी उत्पादनासाठी ओळखल्या जाणाऱ्या जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यासह परिसरात यंदाच्या हंगामाची

पुणे - वाहन क्रमांक आरक्षणासाठी २ एप्रिलपासून फेसलेस सेवा सुरू

पुणे : प्रादेशिक परिवहन कार्यालय, पुणे येथे नवीन वाहनांसाठी आकर्षक, पसंतीचा नोंदणी क्रमांक आरक्षित करण्याची