मंत्रालय प्रवेशासाठी लागणारी १० हजार ओळखपत्रे गायब

मुंबई : मंत्रालयातील प्रवेश प्रक्रियेत सुसूत्रता आणण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या ‘डिजी प्रवेश’ प्रणालीतील १० हजार ओळखपत्रे अभ्यागतांनी परत न केल्याची माहिती समोर आली आहे. नियमानुसार प्रवेश संपल्यानंतर ही कार्डे जमा करणे आवश्यक असते; मात्र १० हजार कार्डे मंत्रालयाबाहेर गेल्याने आता प्रशासनाने ती परत मिळवण्यासाठी विशेष मोहीम हाती घेतली आहे.


राज्याच्या कानाकोपऱ्यातून नागरिक आपली कामे घेऊन मंत्रालयात येत असतात. त्यांना जलद प्रवेश मिळावा यासाठी अत्याधुनिक ‘डीजी ॲप’च्या माध्यमातून डिजिटल ओळखपत्रे वितरित केली जातात. मात्र, ही ओळखपत्रे घरी घेऊन जाणाऱ्यांची संख्या वाढल्याने आता कंत्राटदार कंपनीने तांत्रिक डेटाच्या आधारे अशा व्यक्तींशी संपर्क साधणे सुरू केले आहे.


ज्या अभ्यागतांकडे ओळखपत्रे राहिली आहेत, त्यांना थेट फोन करून कार्ड परत करण्याची विनंती केली जात आहे. अभ्यागत कोणत्या कामासाठी आले होते आणि त्यांचा संपर्क क्रमांक काय, याची संपूर्ण नोंद संगणकीय प्रणालीत उपलब्ध असल्याने संबंधित व्यक्तींपर्यंत पोहोचणे प्रशासनाला सोपे झाले आहे. विशेष म्हणजे, या संवाद प्रक्रियेला नागरिकांकडूनही प्रतिसाद मिळत असून आतापर्यंत सुमारे ३०० कार्ड्स परत जमा करण्यात आली आहेत.



प्रवेशासाठी नवे नियम


या पार्श्वभूमीवर प्रशासनाने काही महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. त्यानुसार, यापुढे ज्या नागरिकांकडे जुने ओळखपत्र राहिले आहे, त्यांना ते जमा केल्याशिवाय मंत्रालयात प्रवेश दिला जाणार नाही. प्रत्येक कार्डाचे ट्रॅकिंग केले जात असून, अभ्यागतांनी सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Comments
Add Comment

अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी कृषी मंत्री शेतक - यांच्या बांधावर

राज्यात अवकाळी पावसामुळे १ लाख २२ हजारहून अधिक हेक्टर शेती पिकांचे नुकसान पुणे : राज्यात वादळी वारा व गारांच्या

उद्योगांना एलपीजीचा सुरळीत पुरवठा व्हावा यासाठी शासन प्रयत्नशील - राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल

मुंबई : महाराष्ट्रात कार्यरत असलेली प्रत्येक विदेशी कंपनी ही राज्याचीच आहे, या भूमिकेतून राज्य शासन सर्वतोपरी

Ladaki Bahin Yojna E Kyc : ई-केवायसी न केल्याने लाडकी बहीण योजनेतील ६८ लाख खाती बंद

मुंबई : महाराष्ट्र सरकारच्या ‘लाडकी बहिण योजना’ संदर्भात एक मोठी बातमी समोर आली आहे. या योजनेअंतर्गत अनिवार्य

ऑपरेशन टायगर? : शिवसेनेच्या मेजवानीला ‘उबाठा’च्या खासदारांची हजेरी

मुंबई: महाराष्ट्राच्या राजकारणात ‘ऑपरेशन टायगर’च्या चर्चांनी जोर धरलेला असतानाच, बुधवारी रात्री राजधानी

SSC Exam 2026 Major Reform : कागदपत्रांचा गोंधळ संपणार! आता 'मार्कशीट' आणि 'पासिंग सर्टिफिकेट' मिळणार...बोर्डाचा नवीन निर्णय काय ?

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने (MSBSHSE) १० वीच्या विद्यार्थ्यांसाठी एक

Luthra Brothers : गोवा नाईट क्लब अग्नितांडव प्रकरणी लुथरा बंधूंना जामीन मंजूर

उत्तर गोव्यातील नाईटक्लब आगीच्या दुर्घटनेशी संबंधित प्रकरणात एक मोठे वळण आले आहे. अंजुनाजवळील 'बर्च बाय रोमियो