Arbaz Patel : अरबाज आणि निक्की विवाहबंधनात अडकणार ? काय म्हणाला अरबाज ?

मुंबई : टेलिव्हिजन विश्वात सध्या रिअॅलिटी शो मोठ्या प्रामणात गाजताना पाहायला मिळतात. हे शो अनेक गोंष्टींमुळे चर्चेतही असतात. या रिअॅलिटी शोमधील भाडणं, वादविवाद, याबरोबरच अनेकांच्या जोड्याही जुळतात. मात्र, शो संपल्यानंतर यांपैकी काही जोड्या कायम एकत्र राहतात तर काही जोड्या तुटतात. अशीच एक सतत चर्चेत असणारी जोडी म्हणजे अरबाज पटेल (Arbaz patel) आणि निक्की तांबोळी (nikki tamboli) ही आहे.


निक्की आणि अरबाज ही जोडी बिग बॉस मराठीच्या मागील पर्वात सहभागी झालेली. त्यावेळी बिग बॉसच्या घरात दोघांची मैत्री झाली आणि मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. शोनंतर दोघांनी आपल्या नात्याची कबुली दिली. तर हे कपल सोशल मीडियावरही एकमोकांबद्दल प्रेम व्यक्त करत असतात. ही जोडी नुकताच पुन्हा एकदा 'द 50' या रिअॅलिटी शोमध्येदेखील सहभागी झालेली या शोमध्ये दोघांची केमिस्ट्री सर्वांना प्रचंड आवडली.


बिग बॉसच्या घरातून सुरू झालेलं यांचं नातं अजूनही टिकून आहे, त्यांच्या जोडीवर चाहतेही सतत प्रेमाचा वर्षाव करत असतात. अशातच आता दोघांना अनेकवेळा लग्न करणार का? असा प्रश्न विचारला जातो.


नुकताच द 50 रिअॅलिटी शोचा फिनाले पार पडला असून या शोचा विजेता शिव ठाकरे ठरला आहे. या शोनंतर एका मुलाखतीत बोलत असताना अरबाजने शोमधील वाद, राडा यासोबतच त्याच्या आणि निक्कीच्या नात्याबद्दलही गप्पा मारल्या. यादरम्यान दोघेही लग्न कधी करणार? या प्रश्नाचंही उत्तर अरबाजनं दिलं आहे.


दोघांच्या लग्नाबद्दल बोलताना अरबाज म्हणाला की आमच्याबद्दल तुम्ही एवढा चांगला विचार करताय, हे ऐकून खूप आनंद होतोय, लवकरच एक चांगला मुहूर्त काढू, जो चांगला मुहूर्त असेल, त्या मुहूर्तावर लग्न करू, पण सध्या ही काम करण्याची आणि यश मिळवण्याची वेळ आहे. हे वय आणि ही वेळ पैसे कमावण्याचं आणि जीवनात पुढे जाण्याचं आहे. तर जेवढ्या चांगल्या गोष्टी होतील, तेवढ्या लवकर आम्ही लग्न करू असं अरबाज दोघांच्या लग्नाबाबत म्हणाला आहे.

Comments
Add Comment

Maria Juliana : प्रसिद्ध तमिळ अभिनेत्रीचा मुख्यमंत्री थलपती विजयवर गंभीर आरोप ; "माझ्या मिसकॅरेजसाठी..."

प्रसिद्ध तमिळ अभिनेत्रीचा मुख्यमंत्री जोसेफ विजयवर गंभीर आरोप ; तामिळनाडूचे मुख्यमंत्री श्री जोसेफ विजय

Deool Band 2 : प्रवीण तरडेंच्या 'देऊळ बंद २' ची गगणभरारी ; ११ दिवसात केली 'इतक्या' कोटींची कमाई !

बॉक्स ऑफिसवर प्रवीण तरडेंच्या 'देऊळ बंद २' चित्रपटाचा डंका पाहायला मिळत आहे. चित्रपटाने वीकेंडला बंपर कमाई केली.

Me Savitribai Jotirao Phule : 'मी सावित्रीबाई जोतीराव फुले' मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप; डॉ. अमोल कोल्हेंनी सांगितले बंद होण्यामागचे कारण

स्टार प्रवाह वाहिनीवरील लोकप्रिय 'मी सावित्रीबाई जोतीराव फुले' ही मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे.

Pooja Bhatt : पूजा भटनं सांगितलं घटस्फोटाचं खरं कारण, म्हणाली.......

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री पूजा भट करिअरपेक्षा तिच्या पर्सनल आयुष्यामुळे जास्त चर्चेत राहिली आहे. अनेक

Sobhita Dhulipala : नागा चैतन्यासोबतच्या नात्यावर होणाऱ्या ट्रॉलिंगवर पहिल्यांदाच बोलली सोभिता धूलिपाला ; म्हणाली..

सोभिता धूलिपाला व नागा चैतन्या यांचे नाते नेहमी चर्चेत राहिले आहे. समांथा रुथ प्रभूपासून विभक्त झाल्यानंतर नागा

Karishma Kapoor : ‘मेंटलहुड’ नंतर करिश्मा कपूर पुन्हा एकदा थरारक क्राइम सिरीजमध्ये ; ट्रेलर बघून चर्चेला उधाण!

मुंबई : 'मर्डर मुबारक' नंतर दोन वर्षांनी करिश्मा कपूर पुन्हा एका दमदार भूमिकेत परतली आहे.‘मेंटलहुड’ नंतरचा हा