Arbaz Patel : अरबाज आणि निक्की विवाहबंधनात अडकणार ? काय म्हणाला अरबाज ?

मुंबई : टेलिव्हिजन विश्वात सध्या रिअॅलिटी शो मोठ्या प्रामणात गाजताना पाहायला मिळतात. हे शो अनेक गोंष्टींमुळे चर्चेतही असतात. या रिअॅलिटी शोमधील भाडणं, वादविवाद, याबरोबरच अनेकांच्या जोड्याही जुळतात. मात्र, शो संपल्यानंतर यांपैकी काही जोड्या कायम एकत्र राहतात तर काही जोड्या तुटतात. अशीच एक सतत चर्चेत असणारी जोडी म्हणजे अरबाज पटेल (Arbaz patel) आणि निक्की तांबोळी (nikki tamboli) ही आहे.


निक्की आणि अरबाज ही जोडी बिग बॉस मराठीच्या मागील पर्वात सहभागी झालेली. त्यावेळी बिग बॉसच्या घरात दोघांची मैत्री झाली आणि मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. शोनंतर दोघांनी आपल्या नात्याची कबुली दिली. तर हे कपल सोशल मीडियावरही एकमोकांबद्दल प्रेम व्यक्त करत असतात. ही जोडी नुकताच पुन्हा एकदा 'द 50' या रिअॅलिटी शोमध्येदेखील सहभागी झालेली या शोमध्ये दोघांची केमिस्ट्री सर्वांना प्रचंड आवडली.


बिग बॉसच्या घरातून सुरू झालेलं यांचं नातं अजूनही टिकून आहे, त्यांच्या जोडीवर चाहतेही सतत प्रेमाचा वर्षाव करत असतात. अशातच आता दोघांना अनेकवेळा लग्न करणार का? असा प्रश्न विचारला जातो.


नुकताच द 50 रिअॅलिटी शोचा फिनाले पार पडला असून या शोचा विजेता शिव ठाकरे ठरला आहे. या शोनंतर एका मुलाखतीत बोलत असताना अरबाजने शोमधील वाद, राडा यासोबतच त्याच्या आणि निक्कीच्या नात्याबद्दलही गप्पा मारल्या. यादरम्यान दोघेही लग्न कधी करणार? या प्रश्नाचंही उत्तर अरबाजनं दिलं आहे.


दोघांच्या लग्नाबद्दल बोलताना अरबाज म्हणाला की आमच्याबद्दल तुम्ही एवढा चांगला विचार करताय, हे ऐकून खूप आनंद होतोय, लवकरच एक चांगला मुहूर्त काढू, जो चांगला मुहूर्त असेल, त्या मुहूर्तावर लग्न करू, पण सध्या ही काम करण्याची आणि यश मिळवण्याची वेळ आहे. हे वय आणि ही वेळ पैसे कमावण्याचं आणि जीवनात पुढे जाण्याचं आहे. तर जेवढ्या चांगल्या गोष्टी होतील, तेवढ्या लवकर आम्ही लग्न करू असं अरबाज दोघांच्या लग्नाबाबत म्हणाला आहे.

Comments
Add Comment

'Deool Band-2' Movie : शिर्डीत प्रवीण तरडेंचा मोठा निर्णय! ‘देऊळ बंद २’ची कमाई शेतकऱ्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी

शिर्डी:  बहुप्रतीक्षित ‘देऊळ बंद - २’ (Deool Band-2) हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून, यंदा चित्रपटात

Trisha Krishnan : शपथविधीला हजेरी अन् आता निवडणुकीची चर्चा; त्रिशा कृष्णन राजकारणात उतरणार?

तामिळनाडू : साऊथ इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेत्री त्रिशा कृष्णन (Trisha Krishnan) हिच्या राजकारणातील एन्ट्रीच्या

'Raja Shivaji' Movie : मराठी प्रेक्षकांकडून ‘राजा शिवाजी’ला भरभरून प्रतिसाद; ११ दिवसांत चित्रपटाने केले ७० कोटी पार

मुंबई : रितेश देशमुख यांच्या ‘राजा शिवाजी’ची (Raja Shivaji) बॉक्स ऑफिसवरील घोडदौड अजूनही कायम आहे. १ मे रोजी प्रदर्शित

Met Gala 2026 : राजा रवी वर्मा ते 'व्हीनस डी मिलो' : मेट गाला २०२६ च्या रेड कार्पेटवर पाहायला मिळाली जगप्रसिद्ध कलाकृतींची झलक!

मेट गाला २०२६ (Met Gala 2026) च्या रेड कार्पेटवर यंदा फॅशन आणि जागतिक कलेचा एक अनोखा आणि विलोभनीय संगम पाहायला मिळाला. अनेक

Appadi Podu Song : इंटरनेटचा पारा वाढला...२२ वर्षांनंतर 'अप्पडी पोडू' गाण्याची सोशल मीडियावर पुन्हा हवा! | Appadi Podu Song Meaning

तुम्हाला 'अप्पडी पोडू' (Appadi Podu) हे गाणे आठवत असेलच! सध्या हे गाणे सोशल मीडियावर अक्षरशः धुमाकूळ घालत असून

Bharath Kanth : ३१ वर्षीय उदयोन्मुख तेलगू अभिनेत्याचा रस्ते अपघातात मृत्यू; हैदराबाद मधील आउटर रिंग रोडवर ट्रकला कारची धडक

हैदराबाद : तेलुगू चित्रपटसृष्टीतील उदयोन्मुख अभिनेता भरत कांत (Bharath Kanth) याचा भीषण रस्ते अपघातात दुर्दैवी मृत्यू