आर्थिक वर्षाच्या अखेरीस मंत्रालयात 'जीआर'चा पाऊस

चार दिवसांत ९५१ निर्णयांचा धडाका; सुट्ट्यांच्या दिवशीही प्रशासन 'ऑन ड्युटी'


मुंबई : आर्थिक वर्षाच्या अखेरीस मंत्रालयात 'जीआर'चा पाऊस पडताना दिसला. गेल्या चार दिवसांत मंत्रालयातील विविध विभागांनी तब्बल ९५१ शासन निर्णय (जीआर) निर्गमित करून एक नवा विक्रम प्रस्थापित केला. विशेष म्हणजे, शनिवार-रविवार आणि महावीर जयंतीची सार्वजनिक सुट्टी असतानाही प्रशासन पूर्णवेळ कार्यरत होते.


३१ मार्च रोजी संपणाऱ्या २०२४-२५ या आर्थिक वर्षाचा निधी व्यपगत (लॅप्स) होऊ नये, यासाठी प्रस्तावांवर मान्यतेची मोहोर उठवण्याचा सपाटा मंत्रालयात पाहायला मिळाला. सुट्टीच्या दिवशी, मंगळवारी एका दिवसात २६७ जीआर प्रसिद्ध करण्यात आले. या काळात मंत्री, त्यांचे खासगी सचिव, विविध विभागांचे सचिव आणि कर्मचारी मंत्रालयात तळ ठोकून होते. १ एप्रिलपासून सुरू होणाऱ्या नवीन आर्थिक वर्षापूर्वी प्रलंबित कामे मार्गी लावण्यासाठी ही प्रशासकीय तत्परता दाखवण्यात आली.


मार्चच्या शेवटच्या आठवड्यात शनिवार, रविवार आणि मंगळवार अशा तीन सुट्ट्या आल्या होत्या. केवळ सोमवार हा कामकाजाचा दिवस होता. मात्र, 'मार्च एंड'चे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून सर्वच विभागात कर्मचारी हजर होते. अनेक विभागांमध्ये रात्री उशिरापर्यंत शासन निर्णय पोर्टलवर अपलोड करण्याचे काम सुरू होते.



कोणी किती जीआर काढले?


- पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग - १२२
- दिव्यांग कल्याण विभाग - १००
- शालेय शिक्षण विभाग - ८५
- मृद व जलसंधारण विभाग - ६५
- महसूल व वन विभाग - ६४
- उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग - ६१
- सहकार व वस्त्रोद्योग विभाग - ५३
- गृह विभाग - ४१
- कृषी विभाग - ३५
- सार्वजनिक आरोग्य विभाग - ३५
- अल्पसंख्याक विकास विभाग - १४



का झाली ही घाई?


सरकारी नियमांनुसार, मंजूर झालेला निधी ३१ मार्चच्या रात्री १२ वाजेपर्यंत खर्च न झाल्यास तो पुन्हा सरकारी तिजोरीत जमा होतो. अनेक विकासकामे, योजनांचे अनुदान आणि कंत्राटदारांची देयके अदा करण्यासाठी शासन निर्णय काढणे अनिवार्य असते. हा निधी वाचवण्यासाठी आणि नवीन वर्षात कामांना गती देण्यासाठी ही कार्यवाही करण्यात आली.

Comments
Add Comment

RTE अंतर्गत आले दोन लाख ८८ हजार अर्ज

मुंबई : शिक्षण हक्क कायद्यानुसार (आरटीई) २५ टक्के राखीव जागांवरील प्रवेशासाठी राज्यातील दोन लाख ८८ हजारांहून

Rejuvenation of rivers : राज्यातील नद्यांच्या पुनरुज्जीवनासाठी स्वतंत्र प्राधिकरणाची स्थापना

मुंबई : राज्यातील नद्यांचे वाढते प्रदूषण रोखण्यासाठी आणि नद्यांना पुनर्वैभव प्राप्त करून देण्यासाठी राज्य

Land surveyors : भूकरमापकांना आता वाढीव वेतनश्रेणीसह पदोन्नती

मुंबई : राज्यातील भूकरमापकांना आता वाढीव वेतनश्रेणीसह पदोन्नती मिळणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Navsari : नवसारी येथे असलेल्या उभारणार भव्य क्रीडा संकुल

मुंबई : अमरावती शहरातील क्रीडाप्रेमींसाठी आनंदाची बातमी! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज

जैन धर्म हा हिंदू संस्कृतीचाच भाग, अल्पसंख्यांकांमधून बाहेर पडण्याची वेळ - कॅबिनेट मंत्री श्री मंगलप्रभात लोढा

मुघल, इंग्रज आणि तत्कालीन काँग्रेसच्या फोडा आणि राज्य करा नीतीमुळेच हिंदू विभागले : मंत्री लोढा यांचा

Agriculture Minister Dattatray Bharne : अनुदानित रासायनिक खतांचे वितरण आता ‘फार्मर आयडी’वर होणार : कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

अग्रीस्टॅक फार्मर आयडी चा वापर करून महाराष्ट्रात देशातील पहिला पायलट प्रकल्प मुंबई : राज्यातील शेतकऱ्यांना