भरधाव वेगाने येत थारने तीन जणांना उडवले; धक्कादायक घटना सीसीटीव्हीत कैद

नवी दिल्ली: गुरुग्राममध्ये एक मोठा अपघात झाला आहे. भरधाव वेगाने येणाऱ्या थार कारने तिघांना चिरडले. तिघांचाही जागीच मृत्यू झाला. मृतांमध्ये एक पुरुष, एक १० वर्षाचा मुलाचा आणि एक ८ वर्षाचा मुलगा आहे. या घटनेचा सीसीटीव्ही फुटेज समोर आला आहे.


नेमकं प्रकरण काय?
गुरुग्राममध्ये भरधाव वेगाने जाणाऱ्या थार कारने तीन जणांना चिरडले आहे. या घटनेत तिघांचाही मृत्यू झाला आहे. ही घटना पटौदीच्या खोड गावात घडली. थार गाडीचा चालक, तिघांना धडक दिल्यानंतर गाडी सोडून घटनास्थळावरून फरार झाला. पोलिसांच्या अहवालानंतर, थार गाडी जप्त करण्यात आली असून तपास सुरू करण्यात आला आहे.


पोलिसांनी तिन्ही मृतदेह ताब्यात घेतले असून शवविच्छेदनासाठी रुग्णालयात ठेवले आहेत. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, गुरुग्राममधील पटौदीजवळच्या खौद गावात रात्री सुमारे ११ वाजता एक व्यक्ती दोन मुलांसोबत प्रवास करत होता. तिघांनाही एका थार गाडीने धडक दिली, त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलीस घटनास्थळी दाखल झाले, त्यांनी तिन्ही मृतदेह ताब्यात घेतले आणि शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवले. त्यांनी थार गाडीही जप्त करून पोलीस ठाण्यात उभी केली.


थार गाडीचा धक्का इतका जोरदार होता की, तिघेही सुमारे तीस फूट दूर फेकले गेले. चालकाने गाडी सोडून घटनास्थळावरून पळ काढला. या घटनेत तिघांचाही जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी गाडी ताब्यात घेतली. त्यांनी तिन्ही मृतदेह ताब्यात घेतले आणि शवविच्छेदनासाठी रुग्णालयात दाखल केले. शवविच्छेदनानंतर मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात दिले जातील. पोलिसांनी थार गाडी पोलीस ठाण्यात उभी केली असून आता आरोपीचा शोध घेत आहेत. पोलीस प्रवक्ते संदीप कुमार यांनी सांगितले की, घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. आता आरोपीला अटक केली. अटक केलेल्या आरोपीची ओळख दीपांशु (वय २५) अशी असून तो गोरियावासचा रहिवासी असल्याचे सांगितले जात आहे. पोलिसांनी भारतीय दंड संहितेच्या विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला असून पुढील कारवाईसाठी त्याला लवकरच जिल्हा न्यायालयात हजर केले जाईल.

Comments
Add Comment

LOC News : भारताकडून सिंधू नदीचे पाणी रोखल्यानंतर LoC वर पाकिस्तानची मोठी सैन्यबांधणी! ३५ अँटी-ड्रोन युनिट तैनात

- AI फेन्सिंगसह युद्धसज्जतेला वेग नवी दिल्ली : भारताने सिंधू नदीचे पाणी पाकिस्तानकडे जाण्यापासून रोखल्यानंतर आणि

Jharkhand T20 League : झारखंड टी-२० लीग फायनलला गालबोट! स्टेडियमबाहेर चेंगराचेंगरी; ३५ जण जखमी

रांची : झारखंडची राजधानी रांची येथे झारखंड टी-२० लीगच्या (Jharkhand T20 League) अंतिम सामन्यादरम्यान मोठी दुर्घटना घडली.

Fire Accident :लखनऊ कोचिंग क्लास आगप्रकरणी चौघांना अटक, चार अधिकारी निलंबित

लखनऊ(Lucknow) : अलीगंज (सेक्टर-डी) येथे एका कोचिंग सेंटरला लागलेल्या भीषण आगीच्या दुर्घटनेने संपूर्ण उत्तर प्रदेश

Amit Shah : नाफेडच्या लिलाव पोर्टलचा शुभारंभ

नवी दिल्ली : केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी नॅशनल ॲग्रिकल्चरल कोऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन ऑफ

Pakistan's war threats : पाकिस्तानच्या युद्धाच्या धमक्यांना भारताचे प्रत्युत्तर

नवी दिल्ली : पाकिस्तानचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांनी भारताला सिंधू जल करार आणि युद्धाबाबत दिलेल्या

Union Education Minister Dharmendra Pradhan : पेपर माफियांवर कारवाई करणार, केंद्रीय शिक्षणमंत्र्यांची घोषणा

नवी दिल्ली : पेपर लीक प्रकरणात सहभागी घटकांवर कठोर कारवाई केली जाईल असे प्रतिपादन केंद्रीय शिक्षण मंत्री