भरधाव वेगाने येत थारने तीन जणांना उडवले; धक्कादायक घटना सीसीटीव्हीत कैद

नवी दिल्ली: गुरुग्राममध्ये एक मोठा अपघात झाला आहे. भरधाव वेगाने येणाऱ्या थार कारने तिघांना चिरडले. तिघांचाही जागीच मृत्यू झाला. मृतांमध्ये एक पुरुष, एक १० वर्षाचा मुलाचा आणि एक ८ वर्षाचा मुलगा आहे. या घटनेचा सीसीटीव्ही फुटेज समोर आला आहे.


नेमकं प्रकरण काय?
गुरुग्राममध्ये भरधाव वेगाने जाणाऱ्या थार कारने तीन जणांना चिरडले आहे. या घटनेत तिघांचाही मृत्यू झाला आहे. ही घटना पटौदीच्या खोड गावात घडली. थार गाडीचा चालक, तिघांना धडक दिल्यानंतर गाडी सोडून घटनास्थळावरून फरार झाला. पोलिसांच्या अहवालानंतर, थार गाडी जप्त करण्यात आली असून तपास सुरू करण्यात आला आहे.


पोलिसांनी तिन्ही मृतदेह ताब्यात घेतले असून शवविच्छेदनासाठी रुग्णालयात ठेवले आहेत. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, गुरुग्राममधील पटौदीजवळच्या खौद गावात रात्री सुमारे ११ वाजता एक व्यक्ती दोन मुलांसोबत प्रवास करत होता. तिघांनाही एका थार गाडीने धडक दिली, त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलीस घटनास्थळी दाखल झाले, त्यांनी तिन्ही मृतदेह ताब्यात घेतले आणि शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवले. त्यांनी थार गाडीही जप्त करून पोलीस ठाण्यात उभी केली.


थार गाडीचा धक्का इतका जोरदार होता की, तिघेही सुमारे तीस फूट दूर फेकले गेले. चालकाने गाडी सोडून घटनास्थळावरून पळ काढला. या घटनेत तिघांचाही जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी गाडी ताब्यात घेतली. त्यांनी तिन्ही मृतदेह ताब्यात घेतले आणि शवविच्छेदनासाठी रुग्णालयात दाखल केले. शवविच्छेदनानंतर मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात दिले जातील. पोलिसांनी थार गाडी पोलीस ठाण्यात उभी केली असून आता आरोपीचा शोध घेत आहेत. पोलीस प्रवक्ते संदीप कुमार यांनी सांगितले की, घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. आता आरोपीला अटक केली. अटक केलेल्या आरोपीची ओळख दीपांशु (वय २५) अशी असून तो गोरियावासचा रहिवासी असल्याचे सांगितले जात आहे. पोलिसांनी भारतीय दंड संहितेच्या विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला असून पुढील कारवाईसाठी त्याला लवकरच जिल्हा न्यायालयात हजर केले जाईल.

Comments
Add Comment

Maharashtra ATS Launches Massive Crackdown : ATS चा धडाका! पाकिस्तानस्थित 'भट्टी गँग'चे जाळे उखडून फेकले; महाराष्ट्रात ४० ठिकाणी छापे, ५७ जण ताब्यात

महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाने (ATS) बुधवारी पहाटेच्या सुमारास संपूर्ण राज्यात एक मोठी शोधमोहीम राबवली.

Uttar Pradesh Storm : उत्तर प्रदेशात निसर्गाचं तांडव! वादळ, मुसळधार पाऊस आणि वीज कोसळून ५६ जणांचा मृत्यू

उत्तर प्रदेश : उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) विविध जिल्ह्यांना बुधवारी भीषण वादळ आणि मुसळधार पावसाने झोडपून काढले. या

Monsoon Rain Update : उकाड्यापासून लवकरच सुटका! अंदमानात पुढच्या ४८ तासांत पावसाच्या सरी कोसळणार!

देशभरात उन्हाचा चटका वाढत असतानाच भारतीय हवामान विभागाने (India Meteorological Department) एक दिलासादायक बातमी दिली आहे. नैऋत्य

MSP : खरीप पिकांच्या हमीभावात मोठी वाढ

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत शेतकरी,

Shani Shingnapur : शनी शिंगणापुरात 24 तास दर्शन सुरू, पण कधीपर्यंत ? जाणून घ्या

शनीभक्तांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. शनी शिंगणापूर येथील शनि मंदिर आता 19 मे पर्यंत तब्बल 24 तास दर्शनासाठी खुले

Tamil Nadu : विजय यांचा पहिला ‘यू-टर्न’, विरोधकांच्या टीकेनंतर 'त्या' व्यक्तीची नियुक्ती रद्द

Tamil Nadu : तमिळनाडूच्या राजकारणात मुख्यमंत्री जोसेफ विजय यांनी घेतलेला एक मोठा निर्णय कालपासून चर्चेत राहिला. त्या