कोल्हापूर: कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज येथे सकल हिंदू समाजाकडून विराट हिंदू संमेलनाचे आयोजन करण्यात आले. या विराट हिंदू संमेलनाला मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांनी उपस्थिती लावली. यावेळी हिंदू बांधवांना संबोधित करण्याची संधी लाभली. या संमेलनात दिसलेली हिंदू एकतेची ऊर्जा आणि धर्माभिमान खरोखर प्रेरणादायी असल्याचे त्यांनी सांगितले.
विराट हिंदू संमेलनात बोलताना, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची शंभर वर्षांची व्यक्ती निर्माण आणि राष्ट्रनिर्माणाची अखंड यात्रा आजही समाजाला दिशा देणारी आहे. संघाने दिलेले संस्कार, शिस्त आणि राष्ट्रप्रेम यामुळे हिंदू समाज अधिक सक्षम व संघटित होत आहे, असे मंत्री राणे यांनी सांगितले.
मंत्री राणे म्हणाले, "राज्याचे आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे ठाम हिंदुत्ववादी नेतृत्व असून, त्यांच्या मार्गदर्शनाखाली लागू झालेला धर्मांतर विरोधी कायदा आपल्या माता-भगिनींच्या सन्मान आणि सुरक्षेसाठी एक मजबूत कवच ठरत आहे."
पुढे बोलताना, चला, हिंदू एकतेच्या या शक्तीला अधिक बळकट करूया आणि आपल्या धर्म, संस्कृती व राष्ट्रासाठी संघटित होऊया असे मंत्री नितेश राणे यांनी म्हटले.