इंधन संकटकाळात भारताची श्रीलंकेला मदत; पंतप्रधान मोदींचे केले आभार व्यक्त

मुंबई : इंधन पुरवठ्याच्या अडचणींना सामोरे जात असलेल्या श्रीलंकेच्या मदतीच्या हाकेला भारताने तत्काळ प्रतिसाद देत मदतीचा हात पुढे केला. भारत सरकारच्या या सकारात्मक भूमिकेबद्दल श्रीलंकेचे राष्ट्रपती अनुर कुमार दिसानायके यांनी आभार व्यक्त केले आहेत.


राष्ट्रपती दिसानायके यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर याबाबत आपली प्रतिक्रिया दिली. त्यांनी सांगितले की काही दिवसांपूर्वीच त्यांची भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा झाली होती. या चर्चेदरम्यान मध्यपूर्वेतील संघर्षामुळे श्रीलंकेला इंधन पुरवठ्यात येत असलेल्या अडचणींबाबत त्यांनी माहिती दिली होती. त्यांनी लिहिले की भारताने तात्काळ मदतीचा हात पुढे केला आणि त्यासाठी ते भारताचे आभारी आहेत.


शनिवारी कोलंबो येथे ३८,०००  मेट्रिक टन इंधन पोहोचले. सध्याच्या संकटाच्या काळात परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांच्या पूर्ण सहकार्याचाही त्यांनी उल्लेख करत त्यांचे आभार मानले.दरम्यान भारताने श्रीलंकेला मदत करण्याची ही पहिलीच वेळ नसून, यापूर्वीही ‘नेबरहुड फर्स्ट’ धोरणांतर्गत अनेकदा मदत केली आहे.

Comments
Add Comment

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या साहाय्याने विद्यार्थ्यांच्या कामगिरीचे विश्लेषण

मुंबई : कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक कामगिरीचे

जमीन मोजणी होणार आता सुपरफास्ट, प्रत्येक जिल्ह्यात खाजगी भूमापकांची नियुक्ती

मुंबई : जमीन मोजणी प्रकरणांचा निपटारा अचूक, जलद, गुणवत्तापूर्ण व पारदर्शी पद्धतीने व्हावा यासाठी राज्यातील

IRCTC पूर्ण करणार प्रवाशांची काश्मीर ते गोवा फिरण्याची संधी, जाणून घ्या माहिती

मुंबई : फिरण्याची इच्छा असते, पण वेळ आणि बजेटमुळे अनेकदा प्लॅन पुढे ढकलला जातो. अशा प्रवाशांसाठी Indian Railway Catering and Tourism

एप्रिलमध्ये तब्बल इतके बँक हॉलिडेज, ही सुट्ट्यांची यादी जाहीर

मुंबई : एप्रिल महिन्यात कुठे फिरायला जायचा प्लॅन करत असाल, तर बाहेर गावी जायच्या आधी बँक हॉलिडेज नक्की तपासून

आयपीएलमधून ऐनवेळी माघार घेणाऱ्या क्रिकेटपटूंवर कठोर कारवाईची गावस्करांची मागणी

नवी दिल्ली : इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) ही एक अशी लीग आहे, ज्यात खेळण्याचे प्रत्येक क्रिकेटपटूचे स्वप्न असते. पण

राज्यातील १०,००० पेक्षा जास्त मंजूर पदसंख्या असलेल्या शासकीय आस्थापनांच्या वर्गवारीतून कौशल्य,रोजगार,उद्योजकता व नाविन्यता विभाग व व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय प्रथम

कौशल्य,रोजगार,उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी केले अभिनंदन मुंबई : राज्यातील १०,००० पेक्षा