मुंबईकरांसाठी मोठी दिलासादायक बातमी! दोन नव्या मेट्रो मार्गिका अखेर सेवेत

मुंबई : अनेक दिवसांपासून प्रतीक्षेत असलेल्या मेट्रो प्रकल्पांबाबत अखेर मोठा निर्णय घेण्यात आला आहे. दहिसर ते मिरा-भाईंदर मेट्रो ९ आणि अंधेरी पश्चिम ते मंडाले (मानखुर्द) मेट्रो २B या दोन महत्त्वाच्या मार्गिकांच्या पहिल्या टप्प्यांचे लोकार्पण आता निश्चित झाले असून, येत्या ३ एप्रिलपासून या मार्गांवर मेट्रो धावणार आहे.



प्रवाशांची प्रतीक्षा अखेर संपली


दोन्ही मार्गिकांचे काम पूर्ण होऊनही उद्घाटन रखडल्याने प्रवाशांना सेवेचा लाभ घेता येत नव्हता. मात्र आता या दोन्ही टप्प्यांना हिरवा कंदील मिळाल्याने प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. मेट्रो ९ अंतर्गत दहिसर ते काशीगाव, तर मेट्रो २B अंतर्गत डायमंड गार्डन ते मंडाले या टप्प्यांवर सेवा सुरू होणार आहे.



राजकीय आणि प्रशासकीय कारणांमुळे उशीर


या मार्गिकांना सुरक्षा प्रमाणपत्र मिळूनही काही महिन्यांपासून उद्घाटन लांबणीवर पडले होते. निवडणूक आचारसंहिता आणि इतर प्रशासकीय कारणांमुळे हा विलंब झाला असून अखेर आता ३ एप्रिल रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांचीही हा उदघाटनाला उपस्तिथी असणार आहे.



मुंबईच्या मेट्रो नेटवर्कला मोठी भर


या दोन्ही मार्गिका सुरू झाल्यानंतर मुंबईतील कार्यरत मेट्रो मार्गिकांची संख्या सहा होणार आहे. विशेष म्हणजे, मेट्रो ९ च्या माध्यमातून ठाणे जिल्ह्यालाही पहिल्यांदाच मेट्रो सेवा मिळणार आहे.



बीकेसीसाठी ‘पॉड टॅक्सी’ प्रकल्पाचीही घोषणा


याच कार्यक्रमात बीकेसीतील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी महत्त्वाच्या ‘पॉड टॅक्सी’ प्रकल्पाचे भूमिपूजनही होणार आहे. वांद्रे पूर्व ते कुर्ला दरम्यान सुमारे ८.८ किमी लांबीचा हा प्रकल्प उभारला जाणार असून, भविष्यातील शहरी वाहतुकीसाठी हा मोठा टप्पा मानला जात आहे.


नवीन मेट्रो मार्गिकांमुळे पश्चिम उपनगर आणि पूर्व मुंबईदरम्यानचा प्रवास अधिक जलद, सोयीस्कर आणि किफायतशीर होणार आहे. त्यामुळे रोजच्या प्रवाशांना वाहतूक कोंडीपासून मोठा दिलासा मिळणार आहे.

Comments
Add Comment

BMC चे पाणीकपातीनंतर बुस्टर पंपांवर कारवाईचे निर्देश

घोषणा झाल्यापासून झोपलेले महापालिका अतिरिक्त आयुक्त आता झाले जागे मुंबई (विशेष प्रतिनिधी) : पावसाळापूर्व

BMC ने मुंबईतल्या सार्वजनिक ठिकाणी असलेल्या झाडांसाठी सुरू केली कूलिंग ट्रीटमेंट

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : अतिउष्णतेमुळे जमिनीतील ओलावा कमी होतो आणि झाडांवर ताण वाढतो. परिणामी, झाडांची मुळे

Rachin Ravindra : केकेआरला मोठा धक्का ! एकही सामना न खेळता स्टार खेळाडू हंगामातून बाहेर

IPL 2026 : आयपीएल २०२६ मध्ये केकेआरने अपेक्षेप्रमाणे कामगिरी केली नाही. या हंगामात ११ पैकी चार सामने जिंकत ९ गुण मिळवले

पश्चिम रेल्वेचा रात्रकालीन ५ तासांचा ब्लॉक

मुंबई : पश्चिम रेल्वेवर आज मध्यरात्रीच्या दरम्यान, दादर स्थानकात ब्लॉक असणार आहे. हा ब्लॉक इलेक्ट्रॉनिक

दहावीनंतरच्या प्रथम वर्ष पदविका अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेला २० मेपासून प्रारंभ

प्रवेश प्रक्रिया वेळेत राबविण्यासाठी तंत्र शिक्षण संचालनालयाचे कालबद्ध नियोजन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री

Chandrashekhar Bawankule : महसूल विभागातील सुनावण्यांसाठी 'एसओपी' - सुनावण्यांच्या संपूर्ण कामकाजासह निकालपत्रे मराठी भाषेतूनच बंधनकारक