नालेसफाईच्या कामाला गती, मिठी नदीच्या सफाईला रविवारपासून होणार सुरुवात

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबईतील शहर, पूर्व उपनगरे आणि पश्चिम उपनगरे या तीनही विभागांमध्ये नाल्‍यातून गाळ उपशाची कामे गतीने करण्यात येत आहेत. मिठी नदीतून गाळ काढण्याची कामे रविवारपासून सुरु होतील. ठराविक मुदतीत ही कामे पूर्ण होतील, त्यादृष्टीने नियोजन करून संपूर्ण यंत्रणेने कार्यवाहीला वेग द्यावा. गाळ काढण्याची कामे योग्यरित्या होण्यासह त्यावर देखरेख करण्याच्या दृष्टीने महानगरपालिकेच्‍या उप आयुक्‍त, सहायक आयुक्‍त यांनी प्रत्‍यक्ष कार्यस्‍थळी भेट द्यावी. नगरसेवक, प्रभाग समिती अध्यक्ष व अन्य लोकप्रतिनिधींना नाल्यांमधील गाळ काढण्याच्या कामाची नियमित माहिती द्यावी. त्यांच्या समवेत पाहणी दौरे आयोजित करावेत,असे निर्देश महापालिका आयुक्त डॉ भूषण गगराणी यांनी दिले आहेत.


पावसाळापूर्व कामांचा भाग म्हणून मुंबई महानगरातील मोठ्या व लहान नाल्यांमधून गाळ काढण्याची कामे वेगाने सुरू आहेत. महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी या कामांचा प्रशासकीय विभाग (वॉर्ड) आणि परिमंडळनिहाय शनिवारी २८ मार्च २०२६ रोजी आढावा घेतला. त्यावेळी त्यांनी निर्देश दिले आहेत. अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगर, उपायुक्त (महानगरपालिका आयुक्त कार्यालय) प्रशांत गायकवाड, प्रमुख अभियंता (पर्जन्य जलवाहिन्या विभाग) कल्पना राऊळ यांच्यासह सर्व परिमंडळ सहआयुक्त/ उपायुक्त, सर्व प्रशासकीय विभागांचे सहायक आयुक्त, पर्जन्य जलवाहिन्या विभागाचे संबंधित अधिकारी या बैठकीस उपस्थित होते.


मुंबईतील मोठ्या व लहान नाल्‍यांतील गाळ काढण्याच्या सुयोग्य नियोजन करावे. नाल्यांमधून उपसलेल्या गाळाची ४८ तासांत निश्चित स्थळावर विल्हेवाट लावावी. रेल्वे प्रशासन व मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण यांच्याशी प्रभावी समन्वय साधावा. पावसाळ्यात नाल्यांमधील पाण्याचा प्रवाह सुरळीत व अखंड राहील, याची विशेष काळजी घ्यावी, असे निर्देश महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी दिले आहेत. पावसाळापूर्व उपाययोजनांसाठी करण्यात येत असलेल्या कामांमध्ये नाल्यांमधील गाळ काढण्यासह नाल्यांचे रुंदीकरण, रेल्वे रुळाखालील व इतर ठिकाणी देखील बंदिस्त प्रवाह मार्गांची (कल्व्हर्ट) स्वच्छता करणे, ही कामेही समाविष्ट आहेत. रेल्वे प्रशासनासमवेत समन्‍वय साधून रेल्वे हद्दीतील व त्यालगतच्या वेगवेगळ्या नाल्यांमधून गाळ काढण्यासह कल्व्हर्ट स्वच्छता कामांची पाहणी करावी. विविध ठिकाणी पावसाळी पाण्याचा उपसा करण्यासाठी पंप लावावेत, मुंबईत पाणी साचू नये, त्‍याचा जलद गतीने निचरा व्‍हावा यासाठी प्रतिबंधात्‍मक उपाययोजना आखाव्‍यात, असे निर्देश आयुक्‍त गगराणी यांनी दिले


अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगर म्हणाले की, पावसाळा सुरू व्हायला अद्याप दोन महिन्यांचा कालावधी शिल्‍लक आहे. ठरवून दिलेल्‍या वेळापत्रकानुसार गाळ उपशाचे कामकाज सुरू आहे. उर्वरित कालावधीत गाळ काढण्याची कामे वेगाने पूर्ण करावीत. मोठ्या नाल्यातून गाळ काढण्याचे कामकाज केव्हा सुरु केले, केव्हा संपणार याचे नियोजनबद्ध वेळापत्रक तयार करावे. त्याची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी . गाळ उपसा संदर्भात प्राप्त होणाऱ्या सर्व व्हिडिओंचे महानगरपालिका प्रशासनाकडून कृत्रिम बुद्धिमत्ता (ए. आय.) प्रणालीच्या मदतीने विश्लेषण केले जाणार आहे. त्याद्वारे नाल्यातून गाळ उपसा करण्याच्या कामांची योग्य देखरेख करणे, कामांमध्ये संपूर्ण पारदर्शकता राखणे यासाठी प्रशासनाला मदत होणार आहे.

Comments
Add Comment

NEET UG 2026 : नीट पेपरफुटी प्रकरणी मनीषा मांढरेला CBI कोठडी, नांदेडमधये पालकांची सीबीआय चौकशी

मुंबई : नीट युजी २०२६ पेपरफुटी प्रकरणी मनीषा मांढरेला १४ दिवसांची सीबीआय कोठडी ठोठावण्यात आली आहे.

Krunal Pandya : हार्दिकच्या लग्नाला कृणाल पांड्या गैरहजर राहणार ? चर्चांमागचं नेमकं कारण काय ?

IPL 2026 : हार्दिक पांड्या पुन्हा एकदा चर्चेत आहे. आयपीएल २०२६ संपण्याआधीच हार्दिक पांड्या मॉडेल आणि इन्फ्लुएंसर

Kirit Somaiya : मुंबईत उघड्यावर कुर्बानी देण्यास बंदी घाला, किरीट सोमय्यांची मागणी

मुंबई : मुंबईत उघड्यावर कुर्बानी देण्यास बंदी घाला, अशी मागणी भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केली आहे. बीएमसी आणि

BMC Waste Management : मोठ्या प्रमाणात कचरा निर्मिती: महानगरपालिकेकडे नोंदणी न करणाऱ्यांवर कडक कारवाईचे आयुक्तांचे आदेश

मुंबई : घनकचरा व्यवस्थापन नियमांनुसार मोठ्या प्रमाणात कचरा निर्माण करणाऱ्या संस्था व व्यक्तींनी

BMC News : एकही मॅनहोल्स उघडे राहता कामा नये

महापालिका आयुक्तांनी दिले संबंधित खात्यांसह सहायक आयुक्तांनाही निर्देश मुंबई : सध्या सुरू असलेली सर्व

Devendra Fadnavis : कला, संस्कृती अन् खाद्यसंस्कृतीची ओळख पटवून देणारा 'माटी ९ पूर्वांचल महोत्सव' : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : भारतीय संस्कृती महान असून ही संस्कृती समृद्ध करण्यासाठी महाराष्ट्राने anj पूर्वांचलने महत्त्वपूर्ण