महिलांच्या सक्षमीकरणासाठी योजनांचे एकत्रीकरण करून व्यवसायासाठी कर्ज सुविधा मिळणार

मुंबई : राज्यातील महिला केवळ आर्थिक मदतीवर अवलंबून न राहता त्या स्वतःचा व्यवसाय करून स्वावलंबी व्हाव्यात, यासाठी राज्य सरकार आता 'लाडकी बहीण' सारख्या योजनांना थेट कर्ज सुविधेशी जोडणार आहे. महिलांच्या सक्षमीकरणासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध महामंडळांच्या योजनांचे एकत्रीकरण करून त्यांना क्रेडिट आधारित मदत देण्याबाबत शासन सकारात्मक असून, यासंदर्भात मुख्य सचिवांना तातडीने निर्देश दिले जातील, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधान परिषदेत दिली. आमदार अभिजित वंजारी यांनी वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळाच्या कर्ज योजनांबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी ही माहिती दिली.


१५०० रुपयांच्या मदतीचे रूपांतर उद्योगात होणार


मुख्यमंत्री म्हणाले की, राज्य शासनामार्फत महिलांना दरमहा मिळणाऱ्या १५०० रुपयांच्या आर्थिक सहाय्याचा विनियोग केवळ दैनंदिन खर्चासाठी न होता, त्यातून त्यांनी स्वतःचा लघुउद्योग उभा करावा असा सरकारचा मानस आहे. या संकल्पनेला बळकटी देण्यासाठी आमदार प्रवीण दरेकर यांनी केलेल्या प्रयोगाचे उदाहरण मुख्यमंत्र्यांनी दिले. दरेकर यांच्या पुढाकारातून सुमारे १२०० महिलांना कर्ज उपलब्ध करून देण्यात आले असून, त्यातून त्यांनी यशस्वीपणे छोटे व्यवसाय सुरू केले आहेत. विशेष म्हणजे या महिलांकडून कर्जाचे हप्तेही नियमितपणे फेडले जात असून, या यशस्वी मॉडेलचा विस्तार संपूर्ण राज्यात करण्यावर भर दिला जाणार आहे.


बंजारा समाजासाठी आयोगाची स्थापना आणि महामंडळाच्या निधीत वाढ


यावेळी बंजारा समाजाच्या प्रलंबित प्रश्नांवर बोलताना मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली एका विशेष आयोगाची स्थापना करण्यात आली आहे. आयोगाचा अहवाल प्राप्त होताच पुढील कार्यवाही केली जाईल. तसेच, इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी माहिती दिली की, वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळाचे भागभांडवल २०० कोटींवरून १००० कोटींपर्यंत वाढवण्याचा प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यात आला आहे. केंद्र शासनाच्या 'एनबीसीएफडीसी' योजनेतील अटी शिथिल करून जास्तीत जास्त लाभार्थ्यांना १ लाखांपर्यंतचे आर्थिक सहाय्य मिळवून देण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचेही मंत्री सावे यांनी स्पष्ट केले.

Comments
Add Comment

Ind vs Eng : दुसऱ्या सामन्याच्या प्लेईंग-११ मध्ये मोठे बदल ! रोहित सोबत हा खेळाडू सलामीला येणार ? दुसऱ्या सामन्यासाठी अशी असेल भारताची प्लेइंग-११

कार्डिफ : भारत आणि इंग्लंड यांच्यात सध्या तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका सुरू आहे. भारताने मालिकेतील पहिला

Arnala Beach : अर्नाळा समुद्रकिनाऱ्यावर दुर्दैवी घटना! चौघेजण पोहायला गेले अन् काळाने घात घातला; दोन जण बेपत्ता

 पोहायला गेलेले चार मित्र समुद्रात वाहून गेले, दोघांची सुटका तर दोघांचा शोध सुरू पालघर : पावसाळ्यात

Nashik : भाजप नगरसेविका, कार्यकर्त्यांचा वेळेवर मदतीचा हात, बीएलओ कर्मचाऱ्याचा वाचला जीव

Nashik : निवडणूक कर्तव्यावर असताना हृदयविकाराचा झटका आलेल्या बीएलओ कर्मचाऱ्याला भाजपच्या नगरसेविका मोनिका हिरे (Monika

Water crisis : पावसाच्या लपंडावामुळे राज्यावरील जलसंकट कायम

 गेल्या वर्षापेक्षा १२ टक्के कमी साठा; २२ जिल्ह्यांतील ७३७ गावांना आजही टँकरचा आसरा मुंबई : राज्याच्या बहुतांश

Bandra kidnapping : घराबाहेरून अचानक बेपत्ता झाल्या मुली; मुंबई पोलिसांच्या एका गुप्त फोन कॉलने आणि...

मुंबईतून अपहरण झालेल्या दोन अल्पवयीन मुलींची उत्तराखंडमधून सुखरूप सुटका; आरोपी अटकेत मुंबई : मुंबईच्या वांद्रे

M.S. Dhoni : एडजबॅस्टनमध्ये एम.एस. धोनीच्या कानातील 'रेडिओ इअरविग'ची चर्चा; भारताचा इंग्लंडवर दणदणीत विजय

बर्मिंगहॅम: भारत आणि इंग्लंड यांच्यातील सलामीच्या एकदिवसीय सामन्यात भारताने ६ गडी राखून शानदार विजय मिळवला.