महिलांची डिजिटल बदनामी ठरणार गुन्हा; ३ वर्षांच्या कोठडीची तरतूद

भारतीय न्याय संहिता महाराष्ट्र सुधारणा विधेयक कायदा एकमताने विधान परिषदेत मंजूर


मुंबई : सोशल मीडिया किंवा इतर कोणत्याही डिजिटल माध्यमाद्वारे महिलांची बदनामी करणे, अश्लील व्हिडिओ किंवा फोटो प्रसारित करणे आता महागात पडणार आहे. राज्य सरकारने अशा विकृत कृत्यांना थेट 'लैंगिक गुन्ह्यांच्या' श्रेणीत समाविष्ट केले असून, यासाठी तीन वर्षांपर्यंतच्या कारावासाची तरतूद असणारे 'भारतीय न्याय संहिता महाराष्ट्र सुधारणा विधेयक २०२६' बुधवारी विधान परिषदेत एकमताने मंजूर करण्यात आले.



डिजिटल छळाला बसणार लगाम


आजच्या डिजिटल युगात व्हॉट्सॲप, फेसबुक, ई-मेल किंवा इतर सोशल प्लॅटफॉर्मवर महिलांना लक्ष्य करण्याचे प्रमाण वाढले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या विधेयकावर बोलताना स्पष्ट केले की, "महिलांबाबत आक्षेपार्ह मजकूर पसरवणे किंवा त्यांना डिजिटल माध्यमांतून धमकी देणे हा आता गंभीर गुन्हा मानला जाईल. केंद्र सरकारच्या 'बीएनएस' कायद्यात ज्या त्रुटी होत्या, त्या दूर करण्यासाठी राज्याने या महत्त्वाच्या दुरुस्त्या सुचवल्या आहेत."



अ‍ॅसिड हल्ला पीडितांची ओळख राहणार गुप्त


या विधेयकातील दुसरा सर्वात महत्त्वाचा बदल म्हणजे ॲसिड हल्ल्यातील पीडित महिलांची ओळख आता गुप्त ठेवली जाणार आहे. यामुळे पीडितेच्या सामाजिक प्रतिष्ठेचे रक्षण होण्यास मदत होईल. या दुरुस्त्या आता अंतिम मंजुरीसाठी केंद्राकडे पाठवण्यात येणार आहेत.



मुले आणि पुरुषांवरील अत्याचारावरही भाष्य


या चर्चेदरम्यान आमदार हेमंत पाटील यांनी लहान मुले आणि पुरुषांवर होणाऱ्या अत्याचाराचा मुद्दा उपस्थित केला. त्यावर उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले की, महिलांप्रमाणेच लहान मुले आणि पुरुषांवरील अत्याचाराच्या घटनांवर 'पोक्सो' (POCSO) आणि इतर कायद्यांतर्गत तात्काळ कारवाई करण्याची तरतूद आधीच अस्तित्वात आहे.


शिवसेना (ठाकरे गट) आमदार सचिन अहिर यांनी या गुन्ह्यांचा तपास करण्यासाठी 'विशेष तपास यंत्रणा' (SIT) नेमण्याची सूचना केली, जेणेकरून अशा प्रकरणांचा निकाल जलद गतीने लागेल. या चर्चेत अनिल परब, प्रविण दरेकर, मनिषा कायंदे यांसह अनेक सदस्यांनी सहभाग नोंदवत या बदलांचे स्वागत केले.

Comments
Add Comment

Harihareshwar येथे खगोल दर्शन महोत्सव

मुंबई : महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या (एमटीडीसी) सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त महाराष्ट्र शासन, पर्यटन

Eknath Shinde : 'गोसीखुर्द जलाशयातील जलपर्यटन टप्पा एक चे काम त्वरीत पूर्ण करा'

मुंबई : भंडारा जिल्ह्यातील गोसीखुर्द जलाशयातील जलपर्यटन टप्पा एक चे काम त्वरीत पूर्ण करून टप्पा दोन बाबतचा

Governor of Maharashtra : राज्यातील सर्व कृषी विद्यापीठात ५० ॲग्री-बेस्ड इनक्यूबेशन सेंटर्स स्थापन करा, राज्यपालांचे निर्देश

मुंबई : राज्यातील सर्व कृषि विद्यापीठात कृषी उत्पादन विक्रीला प्रोत्साहन देण्यासाठी पहिल्या टप्प्यात ५०

AI च्या मदतीने दूध भेसळ रोखण्यासाठी IIT ची मदत घेण्याचे मुख्यमंत्र्यांनी दिले निर्देश

मुंबई : राज्यात दुग्धजन्य पदार्थांतील भेसळ रोखण्यासाठी राष्ट्रीय डेअरी विकास बोर्डाने टेस्ट स्ट्रीप तयार केली

hydroelectric project : उदंचन जलविद्युत प्रकल्पासाठी तात्यासाहेब कोरे वारणा नवशक्ती निर्माण संस्थेबरोबर ५ हजार २०० कोटींचा करार

मुंबई : जलसंपदा विभाग आणि तात्यासाहेब कोरे वारणा नवशक्ती निर्माण संस्था मर्यादित यांच्यात मुख्यमंत्री

Panvel : पनवेलच्या आदई-नेवाळी दगडखाणीबाबत गावकऱ्यांच्या विश्वासाने तोडगा काढणार

मुंबई : रायगड जिल्ह्यातील पनवेल तालुक्यातल्या आदई आणि नेवाळी येथील दगडखाणींमुळे स्थानिक ग्रामस्थांना