नोकरदारवर्गाच्या सॅलरी स्ट्रक्चरमध्ये बदल होणार, १ एप्रिलपासून पगारावर काय परिणाम होणार?

मुंबई: १ एप्रिल २०२६ पासून नवीन आर्थिक वर्षाच्या सुरुवातीसोबतच नोकरदारवर्गाच्या आयुष्यात मोठे बदल होणार आहेत. सरकार नवीन इनकम टॅक्स अ‍ॅक्ट २०२५ आणि लेबर कोड लागू करणार आहे. हे नियम लागू झाल्यानंतर पगार रचना, हातामध्ये येणारा पगार आणि निवृत्ती निधी यावर थेट परिणाम होईल.



काय आहे नवीन लेबर कोड?



नवीन लेबर कोडमधील सर्वात मोठा बदल बेसिक सॅलरीबाबत आहे. नवीन नियमांनुसार, कोणत्याही कर्मचाऱ्याचा मूळ पगार त्याच्या एकूण सीटीसीच्या (CTC) किमान ५० टक्के असणे आवश्यक आहे. सध्या अनेक कंपन्या कर वाचवण्यासाठी मूळ पगार कमी ठेवतात आणि एचआरए (HRA), ट्रॅव्हल अलाउन्स आणि स्पेशल अलाउन्स यासारखे भत्ते ७० ते ८० टक्क्यांपर्यंत वाढवतात. आता नवीन नियमानंतर, सर्व भत्ते एकूण पगाराच्या ५० टक्क्यांपेक्षा जास्त असू शकत नाहीत.



टेक-होम सॅलरीवर होणारा परिणाम



मूळ पगार वाढल्याचा थेट परिणाम तुमच्या टेक-होम म्हणजेच हातात येणाऱ्या पगारावर होईल. कारण पीएफ आणि ग्रॅच्युटीचा हिशेब मूळ पगाराच्या आधारावर केला जातो, त्यामुळे मूळ पगार वाढल्यास तुमचे पीएफ योगदानही वाढेल. पीएफ जास्त कापला गेल्यामुळे महिन्याच्या शेवटी हातामध्ये कमी पगार येऊ होऊ शकते. पण याची जमेची बाजू म्हणजे तुमचा निवृत्तीनंतरचा निधी पूर्वीच्या तुलनेत बराच जास्त असेल.



इनकम टॅक्सचे गणित



पगार रचनेत बदल झाल्यामुळे टॅक्सवरही परिणाम दिसून येईल. ज्या कर्मचाऱ्यांनी जुन्या कर प्रणालीचा (Old Tax Regime) पर्याय निवडला आहे, त्यांच्यासाठी मूळ पगार वाढल्यामुळे एचआरएवर मिळणारी कर सवलत कमी होऊ शकते. कारण एचआरए सवलतीचा एक हिस्सा मूळ पगाराच्या १० टक्के आधारावर ठरवला जातो. दुसरीकडे नवीन कर प्रणाली (New Tax Regime) निवडणाऱ्यांसाठी अडचण कमी आहे. कारण नवीन प्रणालीमध्ये वार्षिक १२.७५ लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावर कोणताही कर भरावा लागणार नाही.



कंपन्या आणि कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाच्या गोष्टी



कंपन्यांना आता आपली पेरोल सिस्टीम (Payroll System) नव्याने तयार करावी लागेल. जर एखाद्या कर्मचाऱ्याचा मूळ पगार सध्या एकूण पगाराच्या २० ते ३० टक्के असेल, तर कंपनीला तो वाढवून ५० टक्के करणे अनिवार्य असेल. यामुळे कंपनीवर ग्रॅच्युटी आणि पीएफ योगदानाचा आर्थिक बोजा देखील वाढणार आहे.

Comments
Add Comment

Maharashtra Revenue Department : महसूल विभागाच्या अभियानात ३,४३६ महिलांना शेतकरी दर्जा; ६ दिवसांत ४.३५ लाख नागरिकांना योजनांचा लाभ

मुंबई: महसूल विभागाच्या 'छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर' अभियानाला राज्यभरातून मोठा प्रतिसाद मिळत

Titamba Ashram School : टिटंबा आश्रमशाळेतील विषबाधाप्रकरणी अखेर 6 जणांविरोधात गुन्हा दाखल

अमरावती : मेळघाटातील टिटंबा येथील शासकीय आदिवासी निवासी आश्रमशाळेतील सुमारे ७० विद्यार्थ्यांना अन्नातून

SIR : 'एसआयआर' प्रक्रियेत नाव वगळल्यास मतदाराला मिळणार पुन्हा संधी

१७ ऑगस्टला प्रारूप यादी; १६ सप्टेंबरपर्यंत पुनर्नोंदणीची मुदत मुंबई : राज्यात सध्या सुरू असलेल्या मतदार

PMSBY : प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना, फक्त २० रुपयांत २ लाखांचा अपघात विमा

PMSBY : PMSBY म्हणजे प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना, ही भारतातील एक सरकारी अपघात विमा योजना आहे जी अपघाती मृत्यू आणि

Online Share Trading Fraud : ऑनलाईन शेअर ट्रेडिंग फसवणूक : प्रमुख बँकांना सुप्रीम कोर्टाची नोटीस

सर्वोच्च न्यायालयामुळे लाखो गुंतवणूकदारांच्या आशा पल्लवित नवी दिल्ली : ऑनलाईन शेअर ट्रेडिंग आणि डिजिटल

Rashtriya Krishi Vikas Yojana : राष्ट्रीय कृषी विकास योजनेच्या दुसऱ्या हप्त्यासाठी पात्र ठरणारे महाराष्ट्र पहिले राज्य

नवी दिल्ली : ठरवून दिलेल्या वेळेत राष्ट्रीय कृषी विकास योजना निधीचा एकूण 75 टक्क्यांपेक्षा जास्त प्रभावी वापर