उन्हाळी सुट्ट्यांसाठी मध्य रेल्वेकडून विशेष गाड्यांची घोषणा

मुंबई : उन्हाळ्यातील सुट्ट्या आणि लग्नसराईमुळे वाढलेल्या प्रवासी गर्दीच्या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेने प्रवाशांना मोठा दिलासा दिला आहे. वाढती मागणी लक्षात घेऊन लोकमान्य टिळक टर्मिनस – नागपूर आणि पुणे – नागपूर या मार्गांवर विशेष गाड्या चालविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.


लोकमान्य टिळक टर्मिनस – नागपूर विशेष गाडीच्या दोन फेऱ्या चालवल्या जाणार आहेत. गाडी क्रमांक ०१०२१ ही विशेष गाडी ३ एप्रिल २०२६ रोजी लोकमान्य टिळक टर्मिनस येथून रात्री १२:५५ वाजता सुटून त्याच दिवशी दुपारी ३:४५ वाजता नागपूर येथे पोहोचेल.परतीच्या प्रवासासाठी गाडी क्रमांक ०१०२२ ही विशेष गाडी ३ एप्रिल २०२६ रोजी नागपूर येथून रात्री ८ वाजता सुटून दुसऱ्या दिवशी सकाळी ११:४५ वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस येथे पोहोचेल. या विशेष गाडीला ठाणे, कल्याण, नाशिक रोड, मनमाड, जळगाव, भुसावळ, मलकापूर, शेगाव, अकोला, मूर्तिजापूर, बडनेरा, धामणगाव आणि वर्धा या स्थानकांवर थांबे देण्यात येणार आहेत.


गाडीची रचना एक वातानुकूलित द्वितीय श्रेणी, सहा वातानुकूलित तृतीय श्रेणी, नऊ शयनयान, चार सामान्य द्वितीय श्रेणी आणि एक सामान्य द्वितीय श्रेणी-सह-गार्ड ब्रेक व्हॅन अशी असेल. प्रवाशांच्या सोयीसाठी आणि वाढत्या गर्दीचे व्यवस्थापन करण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे मध्य रेल्वेने स्पष्ट केले आहे.

Comments
Add Comment

MHADA Lottery: मुंबईसह ठाण्यात बंपर लॉटरी, पाच हजार घरांची लॉटरी कोणत्या प्राईम लोकेशनवर?

मुंबई: मुंबई-ठाणे या शहरात हक्काचे घर घेणे सामान्यांच्या आवाक्या बाहेर आहे मात्र याच शहरात तुमचं घर होणारं.

Mumbai Metro: मेट्रो प्रवाशांसाठी महत्त्वाची अपडेट; आता मेट्रोमध्ये मोबाईल पूर्णपणे बंद राहणार

मुंबई : मेट्रोने दररोज प्रवास करणाऱ्यांसाठी एक आश्चर्यजणक बातमी समोर आलेली आहे. आता मेट्रोतून प्रवास करताना

Navi Mumbai: शिक्षिकेचं भयंकर कृत्य; दोन विद्यार्थ्यांनी संपवलं आयुष्य

नवी मुंबई: नवी मुंबईतील घणसोली परिसरात एक धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. येथील एका नामांकित शाळेतील

उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांची घेतली सांत्वनपर भेट

मुंबई : उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांनी आज देवगिरी शासकीय निवासस्थानी उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार

माजी उपमहापौर अलका केरकर यांचे निधन

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबईच्या माजी उपमहापौर आणि वॉर्ड क्रमांक ९८ च्या भाजपच्या विद्यमान नगरसेविका अलका

'जैन समाजाची सेवा, त्याग, अहिंसेची परंपरा समाजासाठी प्रेरणादायी'

मुंबई : जैन समाजाने समाजसेवा, दानधर्म, अहिंसा आणि त्याग या मूल्यांवर आधारित कार्यातून समाजासमोर प्रेरणादायी