समुद्री मार्ग खुले ठेवा, व्यापारात अडथळे नकोत; मोदींचे इराणच्या राष्ट्राध्यक्षांना शांततेचे आवाहन

नवी दिल्ली : पश्चिम आशियामध्ये इस्रायल, अमेरिका आणि इराण यांच्यातील तणाव शिगेला पोहोचला असताना, भारताने या वादात शांतता प्रस्थापित करण्यासाठी मोठे राजनैतिक पाऊल उचलले आहे. पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांनी शनिवारी इराणचे राष्ट्राध्यक्ष डॉ. मसूद पेजेश्कियन यांच्याशी फोनवरून सविस्तर चर्चा केली. गेल्या आठ दिवसांतील या दोन्ही नेत्यांमधील ही दुसरी चर्चा असून, भारताने या प्रदेशातील शांतता आणि स्थिरतेसाठी पुन्हा एकदा आग्रही भूमिका मांडली आहे. पंतप्रधान मोदींनी राष्ट्राध्यक्ष पेजेश्कियन यांना ईद-उल-फितर आणि इराणचे नवीन वर्ष नवरोज निमित्त शुभेच्छा दिल्या. ‘हा सण पश्चिम आशियात शांतता, स्थिरता आणि समृद्धी घेऊन येईल,’ अशी आशा पंतप्रधान मोदींनी यावेळी व्यक्त केली. या शुभेच्छांसोबत पंतप्रधान मोदींनी पश्चिम आशियात बिघडत चाललेल्या सुरक्षा व्यवस्थेवर तीव्र चिंता व्यक्त केली.


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या संवादादरम्यान पश्चिम आशियातील बिघडत चाललेल्या परिस्थितीवर भारताची भूमिका अत्यंत स्पष्टपणे मांडली. त्यांनी प्रामुख्याने प्रादेशिक सुरक्षा, जागतिक व्यापार आणि मानवी हित या तीन गोष्टींवर भर दिला.
पंतप्रधानांनी पश्चिम आशियातील महत्त्वाच्या पायाभूत सुविधांवर होणाऱ्या हल्ल्यांचा तीव्र निषेध केला. अशा हल्ल्यांमुळे केवळ प्रादेशिक स्थिरता धोक्यात येत नाही, तर जागतिक पुरवठा साखळी विस्कळीत होऊन जगाच्या अर्थव्यवस्थेवरही विपरीत परिणाम होतो, असे त्यांनी नमूद केले. तसेच होर्मुझची सामुद्रधुनी हा समुद्री मार्ग सुरक्षित राहणे अनिवार्य असल्याचे मोदींनी सांगितले. युद्धामुळे होणारी निष्पाप नागरिकांची जीवितहानी आणि मालमत्तेच्या नुकसानीबद्दल पंतप्रधानांनी खोलवर दुःख व्यक्त केले. या कठीण काळात इराणमधील भारतीय नागरिकांची सुरक्षा आणि त्यांचे हित ही भारताची सर्वोच्च प्राथमिकता असल्याचे त्यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केले.


भारताची जागतिक नेत्यांशी चर्चा


पश्चिम आशियातील संकट ओळखून पंतप्रधान मोदी सातत्याने जागतिक नेत्यांच्या संपर्कात आहेत. शुक्रवारी त्यांनी बहरीनचे राजे हमद बिन ईसा अल खलिफा यांच्याशी चर्चा केली होती. यापूर्वी त्यांनी कतारचे अमीर, जॉर्डनचे राजे आणि फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्याशीही संवाद साधला आहे. "कोणताही वाद हा केवळ संवाद आणि मुत्सद्देगिरीनेच सुटू शकतो," हे भारताचे अधिकृत धोरण असल्याचे सांगितले जात आहे.


वाढता तणाव आणि भारताची भूमिका


एकीकडे अमेरिका आणि इस्रायल इराणमधील सत्तापालटासाठी आक्रमक पवित्रा घेत आहेत, तर दुसरीकडे इराणचे नवीन सर्वोच्च नेते मोजतबा खामेनी यांनी शत्रूंसमोर न झुकण्याची शपथ घेतली आहे. अशा कठीण काळात भारत मध्यस्थाची भूमिका बजावत आहे.

Comments
Add Comment

Jalgaon Crime News : जमिनीच्या वादातून काकाला संपवलं, अपघाताचा बनाव रचला अन्...

Jalgaon Crime News : जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यात गारखेडा (Garkheda) येथे धक्कदायक घटना घडली आहे. जमिनीच्या वादातून सख्या

Dehradun School Case: १५ वर्षीय विद्यार्थ्यावर अत्याचार केल्याप्रकरणी प्रिन्सिपल आणि व्यवस्थापक अटकेत

देहरादून: उत्तराखंडची राजधानी देहरादूनमधून एक अत्यंत संतापजनक आणि लाजीरवाणी घटना समोर आली आहे. येथील एका

Kangana Ranaut : 'पंतप्रधान मोदी जगात सर्वात लोकप्रिय, त्यांनी राजीनामा का द्यावा?'; कंगना रनौत यांचा राहुल गांधींवर जोरदार हल्लाबोल!

नवी दिल्ली : सध्या देशात 'नीट' (NEET) परीक्षेच्या मुद्द्यावरून चर्चा सुरू आहे. विद्यार्थ्यांच्या भवितव्याबाबत

Nashik News : नाशिक विधानपरिषद निवडणुकीतील पैसे वाटपाची चौकशी करा!

केंद्रीय निवडणूक आयोगाचे नाशिकच्या जिल्हाधिकाऱ्यांना आदेश मुंबई : नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था प्राधिकार

FIFA 2026 : मेक्सिकन फुटबॉलचा सुवर्णकाळ संपला; दिग्गज गोलरक्षक गिलेर्मो ओचोआची २२ वर्षांच्या कारकिर्दीनंतर निवृत्ती!

मेक्सिको सिटी: फुटबॉल जगतातून एक अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. इतिहासातील सर्वोत्कृष्ट मेक्सिकन

BCCI : देशांतर्गत क्रिकेटमध्ये नो-बॉलचे नियम बदलले! बीसीसीआयकडून नवीन नियम जाहीर

मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजेच बीसीसीआयने देशांतर्गत क्रिकेटमधील नो-बॉलच्या नियमांमध्ये मोठे बदल