समुद्री मार्ग खुले ठेवा, व्यापारात अडथळे नकोत; मोदींचे इराणच्या राष्ट्राध्यक्षांना शांततेचे आवाहन

नवी दिल्ली : पश्चिम आशियामध्ये इस्रायल, अमेरिका आणि इराण यांच्यातील तणाव शिगेला पोहोचला असताना, भारताने या वादात शांतता प्रस्थापित करण्यासाठी मोठे राजनैतिक पाऊल उचलले आहे. पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांनी शनिवारी इराणचे राष्ट्राध्यक्ष डॉ. मसूद पेजेश्कियन यांच्याशी फोनवरून सविस्तर चर्चा केली. गेल्या आठ दिवसांतील या दोन्ही नेत्यांमधील ही दुसरी चर्चा असून, भारताने या प्रदेशातील शांतता आणि स्थिरतेसाठी पुन्हा एकदा आग्रही भूमिका मांडली आहे. पंतप्रधान मोदींनी राष्ट्राध्यक्ष पेजेश्कियन यांना ईद-उल-फितर आणि इराणचे नवीन वर्ष नवरोज निमित्त शुभेच्छा दिल्या. ‘हा सण पश्चिम आशियात शांतता, स्थिरता आणि समृद्धी घेऊन येईल,’ अशी आशा पंतप्रधान मोदींनी यावेळी व्यक्त केली. या शुभेच्छांसोबत पंतप्रधान मोदींनी पश्चिम आशियात बिघडत चाललेल्या सुरक्षा व्यवस्थेवर तीव्र चिंता व्यक्त केली.


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या संवादादरम्यान पश्चिम आशियातील बिघडत चाललेल्या परिस्थितीवर भारताची भूमिका अत्यंत स्पष्टपणे मांडली. त्यांनी प्रामुख्याने प्रादेशिक सुरक्षा, जागतिक व्यापार आणि मानवी हित या तीन गोष्टींवर भर दिला.
पंतप्रधानांनी पश्चिम आशियातील महत्त्वाच्या पायाभूत सुविधांवर होणाऱ्या हल्ल्यांचा तीव्र निषेध केला. अशा हल्ल्यांमुळे केवळ प्रादेशिक स्थिरता धोक्यात येत नाही, तर जागतिक पुरवठा साखळी विस्कळीत होऊन जगाच्या अर्थव्यवस्थेवरही विपरीत परिणाम होतो, असे त्यांनी नमूद केले. तसेच होर्मुझची सामुद्रधुनी हा समुद्री मार्ग सुरक्षित राहणे अनिवार्य असल्याचे मोदींनी सांगितले. युद्धामुळे होणारी निष्पाप नागरिकांची जीवितहानी आणि मालमत्तेच्या नुकसानीबद्दल पंतप्रधानांनी खोलवर दुःख व्यक्त केले. या कठीण काळात इराणमधील भारतीय नागरिकांची सुरक्षा आणि त्यांचे हित ही भारताची सर्वोच्च प्राथमिकता असल्याचे त्यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केले.


भारताची जागतिक नेत्यांशी चर्चा


पश्चिम आशियातील संकट ओळखून पंतप्रधान मोदी सातत्याने जागतिक नेत्यांच्या संपर्कात आहेत. शुक्रवारी त्यांनी बहरीनचे राजे हमद बिन ईसा अल खलिफा यांच्याशी चर्चा केली होती. यापूर्वी त्यांनी कतारचे अमीर, जॉर्डनचे राजे आणि फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्याशीही संवाद साधला आहे. "कोणताही वाद हा केवळ संवाद आणि मुत्सद्देगिरीनेच सुटू शकतो," हे भारताचे अधिकृत धोरण असल्याचे सांगितले जात आहे.


वाढता तणाव आणि भारताची भूमिका


एकीकडे अमेरिका आणि इस्रायल इराणमधील सत्तापालटासाठी आक्रमक पवित्रा घेत आहेत, तर दुसरीकडे इराणचे नवीन सर्वोच्च नेते मोजतबा खामेनी यांनी शत्रूंसमोर न झुकण्याची शपथ घेतली आहे. अशा कठीण काळात भारत मध्यस्थाची भूमिका बजावत आहे.

Comments
Add Comment

Nitesh Rane : कोकणातील महामार्ग आता रंगीबेरंगी फुलांनी बहरणार

पालकमंत्री नितेश राणे यांनी घेतला आढावा; देवगड-निपाणी, विजयदुर्ग-कासार्डे मार्गावर 'एशियन चेरी', 'ताम्हण'ची

Mumbai Local News : मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी! आता बोरिवलीहून थेट पनवेलपर्यंत लोकलने प्रवास

मुंबई : मुंबईकरांच्या दैनंदिन प्रवासातील सर्वात मोठ्या समस्यांपैकी एक असलेली गाड्या बदलण्याची कसरत आणि

Mahayuti : महायुती 'अ‍ॅक्शन मोड'मध्ये! आगामी निवडणुकांसाठी बंडखोरांना ताकीद; भुसे-सामंत यांच्याकडून संघटनात्मक फेरबदल सुरू

मुंबई : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि जागावाटपाच्या पार्श्वभूमीवर महायुतीने अत्यंत सावध आणि

Nashik Accident : मुंबई-आग्रा महामार्गावर भीषण अपघात; आजोबा अन नातवाचा मृत्यू

चांदवड : मुंबई-आग्रा महामार्गावरील राहुड घाटात (Rahud Ghat) मंगळवारी (दि.२) दुपारच्या सुमारास चार वाहनांमध्ये झालेल्या

Minister Shivendrasinghraje Bhosale : एअर इंडिया इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडिट होणार

मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे निर्देश; मंत्रालयातील कार्यालयांच्या स्थलांतरणाआधी कार्यवाही पूर्ण

Siddhivinayak :सिद्धिविनायक मंदिरात भाविकांची अलोट गर्दी! अधिक महिन्यातील संकष्टी चतुर्थीला गणरायाच्या चरणी हजारो भाविक नतमस्तक

मुंबई : अधिक महिन्यातील संकष्टी चतुर्थीचे औचित्य साधून आज मुंबईच्या प्रभादेवी येथील जगप्रसिद्ध श्री