राज्यसभा हुकलेल्या राहुल शेवाळेंवर लवकरच मोठी जबाबदारी?

मुंबई : राज्यसभा निवडणुकीत शिवसेनेने प्रवक्त्या ज्योती वाघमारे यांना संधी देऊन ‘धक्कातंत्र’ वापरल्याने नाराज झालेले माजी खासदार राहुल शेवाळे यांची मनधरणी करण्यासाठी पक्ष नेतृत्वाने हालचाली सुरू केल्या आहेत. राज्यसभेची संधी हुकलेल्या शेवाळे यांच्यावर लवकरच केंद्रात पक्षाची मोठी संघटनात्मक जबाबदारी सोपवली जाण्याचे संकेत मिळत असून, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दिल्ली दौऱ्यात याबाबत महत्त्वाची चर्चा झाल्याचे समजते.


राज्यसभेसाठी माजी खासदार गजानन कीर्तिकर, आनंद अडसूळ आणि राहुल शेवाळे यांसारखे दिग्गज नेते इच्छुक होते. मात्र, ऐनवेळी अनपेक्षित उमेदवार दिला गेल्याने हे नेते, विशेषतः राहुल शेवाळे तीव्र नाराज होते. गेल्या आठवडाभरापासून ही नाराजी दूर करण्याचे प्रयत्न मंत्री उदय सामंत यांच्याकडून सुरू होते. अखेर मंगळवारी रात्री सामंत हे शेवाळेंना घेऊन दिल्लीला रवाना झाले. तिथे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्यासोबत झालेल्या प्रदीर्घ चर्चेत शेवाळेंना केंद्रातील महत्त्वाच्या जबाबदारीचे आश्वासन देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.


मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेनेला अपेक्षित यश मिळाले नाही, याचा फटका शेवाळेंना बसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. महापालिका निवडणुकीची सर्व धुरा शेवाळे यांच्यावर होती. उबाठा गटातील अनेक माजी नगरसेवक सोबत आल्याने ५० ते ६० नगरसेवक निवडून येतील असा कयास बांधला जात होता. मात्र, अपेक्षित निकाल न लागल्यानेच शेवाळे यांची राज्यसभेची उमेदवारी कापण्यात आल्याचे बोलले जात आहे.



कोणती जबाबदारी मिळणार?


दरम्यान, दिल्ली दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्यानंतर पत्रकारांशी बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी, "पक्षात काम करणाऱ्या प्रत्येकाचा योग्य सन्मान केला जाईल," अशी प्रतिक्रिया दिली. त्यामुळे शिवसेनेचे राष्ट्रीय सरचिटणीस असलेल्या शेवाळे यांच्याकडे आता दिल्लीतील कोणती संघटनात्मक जबाबदारी सोपवली जाते आणि त्यानंतर त्यांची नाराजी खरोखर दूर होते का, याकडे राजकीय धुरिणांचे लक्ष लागले आहे.

Comments
Add Comment

इराणकडून सौदीच्या यानबू बंदरातील समरेफ रिफायनरीवर हवाई हल्ला; जागतिक तेल बाजारात खळबळ

सौदी अरेबियाच्या लाल समुद्र किनाऱ्यावर असलेल्या यानबू बंदरगाहातील सौदी अरामको आणि एक्सॉनमोबिल यांच्या

‘गाळमुक्त धरण-गाळयुक्त शिवार'मुळे भागली ११ हजार गावांची तहान

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची संकल्पना; ७७ लाख टँकर क्षमतेचा पाणीसाठा पुनर्संचयित, ७.७३ कोटी घनमीटर गाळ

Jasprit Bumrah : आयसीसी टी-२० क्रमवारी जसप्रीत बुमराहची टॉप ५ मध्ये नोंद

मुंबई : भारताने ८ मार्च रोजी टी२० विश्वचषक जिंकल्यापासून एकही टी२० आंतरराष्ट्रीय सामना खेळलेला नाही आणि

Gudi Padwa 2026 : सचिन तेंडुलकर, सूर्यकुमार आणि अजिंक्य रहाणेने यांच्यासह अनेक खेळाडूंनी दिल्या गुढीपाडव्याच्या शुभेच्छा

गॉड ऑफ क्रिकेट सचिन तेंडुलकर, नुकताच भारताला टी-२० विश्वचषक जिंकून देणारा सूर्यकुमार यादव, माजी फिरकी गोलंदाज

दिल्लीत झळकलेला महाराष्ट्राचा मानाचा चित्ररथ आता गिरगावात!

- कर्तव्यपथावर झळकलेल्या महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवाचा मुंबईकरांना प्रत्यक्ष अनुभव मुंबई : नवी दिल्ली

SRH IPL 2026 : ईशान किशन आणि अभिषेक शर्मावर हैदराबाद संघाने टाकली मोठी जबाबदारी

इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) २०२६ च्या आधी, सनरायझर्स हैदराबादने एक मोठा निर्णय घेतला आहे. भारताच्या नुकत्याच