धक्कादायक घटना, EV ने घेतला सात जणांचा बळी

इंदूर : मध्य प्रदेशमध्ये इंदूरच्या बंगाली स्क्वेअरजवळील बृजेश्वरी कॉलनीत एक धक्कादायक घटना घडली. मनोज पुगालिया यांनी घराजवळच असलेल्या कनेक्शनचा वापर करून ईव्हीचे चार्जिंग सुरू ठेवले होते. चार्जिंग सुरू असताना शॉर्टसर्किट झाल्यामुळे आग लागली. ईव्हीने पेट घेतला. आग वेगाने पसरली आणि थोड्याच वेळात पुगालिया यांच्या घरालाही आगीनं वेढले. घरातल्यांना सावरण्याची संधी मिळण्याआधीच आग घरात असलेल्या सिलेंडरच्या साठ्यापर्यंत पोहोचली. घरात दहा सिलेंडर ठेवले होते. हे सर्व सिलेंडर फुटल्यामुळे आगीची तीव्रता वाढली. या दुर्घटनेत एकाच कुटुंबातील सात जणांचा होरपळून मृत्यू झाला.


घरात एकूण दहा जण होते. यापैकी सात जणांचा होरपळून मृत्यू झाला तर तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.


मनोज पुगालिया यांनी रात्री झोपताना कनेक्शनचा वापर करून ईव्हीचे चार्जिंग सुरू ठेवले होते. हे चार्जिंग सुरू असताना पहाटे ४ च्या सुमारास शॉर्टसर्किट झाल्यामुळे आग लागली. आग वेगाने पसरली आणि घरातला सिलेंडरचा साठा मोठ्या दुर्घटनेला कारणीभूत ठरला. दुर्घटनेत पुगालिया यांच्या घराचा काही भाग कोसळला.


पोलीस आयुक्त संतोष कुमार सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, मनोज पुगालिया यांचा पॉलिमरचा व्यवसाय होता. व्यवसायानिमित्त त्यांनी घरामध्ये मोठ्या प्रमाणात ज्वलनशील रसायने साठवून ठेवली होती. कारची आग, गॅस सिलेंडरचे स्फोट आणि रसायने या तिन्ही घटकांमुळे घरात आगडोंब उडाला. घरात झोपलेल्या लोकांना बाहेर पडण्याची संधी मिळाली नाही.


घराला इलेक्ट्रॉनिक डिजिटल लॉक बसवण्यात आलं होतं. आगीमुळे घराचा वीजपुरवठा खंडित झाल्याने हे डिजीटल लॉक उघडलं नाही. परिणामी, कुटुंबातील सदस्य आतच अडकून पडले. अग्निशमन दलाच्या जवानांना घरात प्रवेश करण्यासाठी दरवाजे तोडावे लागले. तोपर्यंत सात जणांचा होरपळून मृत्यू झाला होता. या प्रकरणी पुढील पोलीस कारवाई सुरू आहे.

Comments
Add Comment

दिल्लीत चार मजली इमारतीला भीषण आग; एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू

नवी दिल्ली : दक्षिण-पश्चिम दिल्लीतील साध नगर, पालम परिसरात बुधवारी चार मजली इमारतीला आग लागल्याची घटना घडली. या

२८ फेब्रुवारीपासून आखाती देशांमधून किती भारतीय परतले ?, परराष्ट्र मंत्रालयाकडून खुलासा

नवी दिल्ली: अमेरिका आणि इस्रायलने इराणवर केलेल्या हल्ल्यानंतर बदललेल्या परिस्थितीत, आखाती देशांमधून मोठ्या

भारताकडून कठोर शब्दांत पाकिस्तानच्या हवाई हल्ल्याचा निषेध

- गुन्हेगारी कृत्याच्या दोषींविरुद्ध कारवाई करण्याची मागणी पाकिस्तानकडून काबुलमध्ये झालेल्या हवाई हल्ल्यात

'Nanda Devi' Ship : तब्बल ४६,५०० मेट्रिक टनहुन अधिक एलपीजी घेऊन ‘नंदा देवी’ जहाज भारतात दाखल

‘शिवालिक’नंतर आणखी एक एलपीजी टँकर भारतात दाखल झाला आहे. ‘नंदा देवी’ हे जहाज आज म्हणजेच मंगळवार १७ मार्च रोजी

एनआयएची मोठी कारवाई, युक्रेनच्या सहा आणि अमेरिकेच्या एका नागरिकाला अटक

नवी दिल्ली : कोलकाता विमानतळ येथे अमेरिकन नागरिकाला तर लखनऊ विमानतळ आणि दिल्ली विमानतळ येथे प्रत्येकी तीन

West Bengal ED Raid : पश्चिम बंगालमध्ये ईडीअँक्शन मोडवर; एकूण १० ठिकाणी छापेमारी

- अवैध कॉल सेंटरद्वारे फसवणुकीचे प्रकरण पश्चिम बंगालमध्ये अंमलबजावणी संचनालयाने (ईडी) सोमवारी (१६ मार्च) मोठी