Mumbai: मुंबईत पाणीबाणी, एप्रिल-मेमध्ये परिस्थिती गंभीर होण्याची भीती

मुंबई: ऐन उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच मुंबईच्या पाणीपुरवठ्यावर मोठे संकट उभे राहिले आहे. १५ मार्च २०२६ पर्यंतच्या अधिकृत आकडेवारीनुसार, मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरणांमधील पाणीसाठा निम्यापेक्षा कमी झाला आहे. वाढत्या उष्णतेमुळे पाण्याचे बाष्पीभवन वेगाने होत असून, पालिकेच्या पाणीपुरवठा विभागावर याचा मोठा ताण येत आहे.



पाणीसाठा कमी होण्याची मुख्य कारणे


मुंबईत मागील काही दिवसांपासून तापमानाचा पारा ३५°C च्या वर गेल्याने धरणांमधील साठा वेगाने घटत आहे. कडक उन्हामुळे तलावांमधील पाण्याचे बाष्पीभवन वाढले आहे. मार्च महिन्यात उष्णता वाढल्याने नागरिकांकडून पाण्याचा वापरही मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. यंदाचा पाणीसाठा गेल्या वर्षीच्या तुलनेत लक्षणीयरीत्या कमी असल्याने पालिका प्रशासन चिंतेत आहे.



धरणांमधील सद्यस्थिती


भातसा- ३,३९,५५६
अप्पर वैतरणा- १,२५,४५७
मध्य वैतरणा - ८१,२६८
तानसा - ६०,६८३
मोडक सागर- ४९,३८८
विहार- १७,४८९
तुळशी- ४०३८



पालिकेचे पाणी जपून वापरण्याचे आवाहन


महापालिकेने अद्याप अधिकृत पाणी कपात जाहीर केली नसली तरी, एप्रिल आणि मे महिन्यात परिस्थिती अधिक बिकट होऊ शकते.


पाणी जपून वापरा


गाडी धुण्यासाठी किंवा फरशी पुसण्यासाठी पाण्याचा अपव्यय टाळावा.


गळती रोखा


घरात किंवा परिसरात कुठेही नळ गळती असल्यास त्वरित दुरुस्त करावा.


पाणी फेकू नका


शिळे पाणी फेकून देण्याऐवजी त्याचा झाडांसाठी किंवा इतर कामांसाठी वापर करावा.

Comments
Add Comment

महापालिका शाळांमधील वाचन कौशल्य पाहून आयुक्तही भारावले, मुलांच्या पाठीवर मारली कौतुकाची थाप

मुंबई: दादर येथील येथील भवानी शंकर मार्ग शाळेत महानगरपालिका आयुक्त आश्विनी भिडे यांनी पूर्व प्राथमिकसह

मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प ८०० कोटी रुपयांच्या अंतर्गत फेरफारीसह स्थायी समितीत मंजुर

मुंबई: मुंबई महापालिकेचा सन २०२६-२७च्या अर्थसंकल्पाला स्थायी समितीने मंजुरी दिली आहे. तब्बल ८०० कोटी रुपयांच्या

२०२९ चा संकल्प पूर्ण करण्यासाठी भाजपाचा कार्यकर्ता सज्ज; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांचा विश्वास

मुंबई: देशात आणि महाराष्ट्रात जनतेमध्ये भारतीय जनता पक्षाविषयी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी आणि

मुंबई मेट्रोच्या वेळापत्रकात ८ एप्रिलपासून बदल; लाईन ९ व २ बी सेवेत, प्रवाशांसाठी अधिक सुलभ व जलद सेवा

मुंबई: मुंबई महानगर प्रदेशातील मेट्रो जाळ्याच्या विस्ताराच्या पार्श्वभूमीवर, मुंबई महानगर प्रदेश विकास

Sunetra Pawar: 'बारामती हा केवळ मतदारसंघ नसून दादांचा श्वास होता आणि त्या श्वासाशी नाळ जुळलेली प्रत्येक व्यक्ती माझ्यासाठी महत्त्वाची'

बारामती: बारामती हा केवळ मतदारसंघ नसून दादांचा श्वास होता आणि त्या श्वासाशी नाळ जुळलेली प्रत्येक व्यक्ती

Chandrashekhar Bawankule: अजित दादांची सावली आता बारामतीत सुनेत्रा माऊली; बावनकुळेंनी जागवल्या ३२ वर्षांच्या ऋणानुबंधांच्या आठवणी

बारामती: "ज्यांच्या शब्दाला महाराष्ट्राच्या राजकारणात चांद्यापासून बांद्यापर्यंत वजन होतं, ज्यांनी उभं आयुष्य