मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; महाराष्ट्रातील १० हजार गावांसाठी...

अहिल्यानगर: हवामानातील सतत होणारे बदल हे कृषी क्षेत्रासमोर मोठे आव्हान बनले असून त्याचा थेट परिणाम शेती उत्पादनावर होत आहे. या परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी कृषी क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढवणे आवश्यक असल्याचे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले. राज्य सरकार जागतिक बँकेच्या सहकार्याने राज्यातील १० हजार गावांमध्ये ‘क्लायमेट प्रूफ’ शेतीचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प राबवणार असल्याची घोषणाही त्यांनी केली आहे.


राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या ३९ व्या पदवीप्रदान समारंभात ते बोलत होते. या कार्यक्रमाला राज्यपाल जिष्णू देव वर्मा अध्यक्षस्थानी उपस्थित होते.


हवामान बदलाशी जुळवून घेणाऱ्या शेतीची गरज
मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की, हवामानातील बदलामुळे पारंपरिक पद्धतीची शेती अधिक जोखमीची बनत आहे. त्यामुळे कृषी संशोधन संस्थांनी बदलत्या वातावरणात टिकून राहणारी आणि स्थिर उत्पादन देणारी नवीन पीकवाणे विकसित करण्यावर भर द्यावा. तसेच शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञान, सिंचन व्यवस्था आणि हवामानानुसार शेती पद्धती याबाबत मार्गदर्शन देणेही तितकेच महत्त्वाचे असल्याचे त्यांनी नमूद केले.


यावेळी बोलताना त्यांनी शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावरही भाष्य केले. कर्जमाफी ही शेतकऱ्यांना दिलासा देणारी तात्पुरती उपाययोजना असली तरी ती कायमस्वरूपी समाधान देऊ शकत नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. कर्जमाफीमुळे शेतकऱ्यांना पुन्हा कर्ज मिळण्याचा मार्ग मोकळा होतो; मात्र शेतकरी कायमस्वरूपी कर्जाच्या दुष्टचक्रातून मुक्त व्हावेत यासाठी शाश्वत शेती पद्धती विकसित करणे आवश्यक आहे.


या संदर्भात कृषी संशोधक आणि कृषी विद्यापीठांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. हवामान बदलाचा विचार करून नवीन तंत्रज्ञान, संशोधन आणि टिकाऊ शेती मॉडेल विकसित करण्याची जबाबदारी कृषी संशोधन संस्थांवर असल्याचेही त्यांनी सांगितले.


यापूर्वीच्या काळात सरकारचा दृष्टिकोन कृषी क्षेत्राकडे प्रामुख्याने ‘रिलीफ’ आणि ‘रिहॅबिलिटेशन’पुरता मर्यादित होता. नैसर्गिक आपत्ती आल्यानंतर मदत देणे एवढीच भूमिका घेतली जात होती, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी नमूद केले.


मात्र सध्याच्या सरकारने कृषी क्षेत्रातील पायाभूत सुविधांमध्ये गुंतवणूक वाढवून शेती अधिक सक्षम करण्यावर भर दिला असल्याचे त्यांनी सांगितले. सिंचन, तंत्रज्ञान, प्रक्रिया उद्योग आणि बाजारपेठेची उपलब्धता यावर लक्ष केंद्रित करून शेती अधिक टिकाऊ आणि नफ्याची बनवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचेही त्यांनी सांगितलं आहे.

Comments
Add Comment

Chhatrapati Sambhajinagar: आर्थिक व्यवहारातून सेवानिवृत्त प्राध्यापकाची हत्या; अखेर थरारक प्रकार उघड

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरमध्ये आर्थिक व्यवहारातून सेवानिवृत्त प्राध्यापकाचा खून केल्याची

पुण्यात मेट्रोचे २०० किमीचे जाळे उभारणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

पुणे मेट्रो भवनचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन पुणे :  पुणे मेट्रो प्रकल्पामुळे शहरातील

'नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्यात फक्त हिंदूंचीच दुकानं हवी'

नाशिक : नाशिक जिल्ह्यात २०२७ मध्ये होणार असलेल्या सिंहस्थ कुंभमेळ्यात फक्त हिंदूंचीच दुकानं हवी. कुंभमेळ्याला

शालेय पोषण आहार पुरवणाऱ्या संस्था येत्या ३० एप्रिलपर्यंत गॅस सिलिंडरचा पुरवठा

मुंबई: प्रधानमंत्री पोषणशक्ती निर्माण योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना शिजविलेला आहार पुरवठा करणा-या महिला

Missing Link' Project: मुंबई-पुण्यातील अंतर कमी होणार, 'मिसिंग लिंक'चं काम पूर्ण; लवकरच प्रवाशांसाठी खुला

मुंबई: बहुप्रतीक्षित मुंबई-पुणे 'मिसिंग लिंक' प्रकल्पाचं काम पूर्ण झालं आहे. या प्रोजेक्टशी संबंधित असलेल्या एक

कागलमध्ये ३५७.९९ कोटींचा एलिव्हेटेड कॉरिडॉर मंजूर; मुख्यमंत्र्यांकडून पंतप्रधान व केंद्रीय मंत्री गडकरींचे आभार व्यक्त

कोल्हापूर: कोल्हापूरच्या कागल येथे राष्ट्रीय महामार्ग-48 वर 6-लेन एलिव्हेटेड कॉरिडॉरला मंजुरी मिळाली आहे.३५७.९९